Post views: counter

सत्याग्रह पर्वाला प्रारंभ

लोकमान्य टिळकांना अखेरच्या काळात, भारतीय राष्ट्रीय चळवळीत महात्मा गांधीचे आगमन झाले. भारतीय जनतेच्या ब्रिटिश शासनाविरुध्दच्या असंतोषाला त्यांनी सत्याग्रह व व्यापक जनआंदोलनाव्दारे वाचा फोडली. इ.स. १९२० मध्ये गांधीजींच्या नेतृत्वाखाली भारताच्या स्वातंत्र्यलढयाच्या नव्या पर्वाची सुरवात झाली.
  • सुरवातीचे सत्याग्रह

भारताच्या राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी गांधीजीनी दक्षिण आफ़्रिकेतील गौरवणीय सरकारच्या वर्णव्देषी धोरणाविरूध्द सत्याग्रहाच्या तंत्राचा प्रथमत: आणि यशस्वीरीत्या वापर केला. दक्षिण आफ़्रिकेतून परत
आल्यानंतर १९१७ साली चंपारण्य येथील नीळ-उत्पादक शेतकर्‍यांच्या आणि गुजरातमधील दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या अहिंसात्मक आंदोलनाद्वारा गांधीजीनी आपले सत्याग्रहाचे तंत्रउपयुक्त असत्याचे दाखवून दिले. त्यांनी याच तंत्राचा यशस्वी उपयोग १९१८ साली खेडा जिल्हयात साराबंदीच्या चळवळीत आणि अहमदाबादच्या गिरणी कामगारांच्या संपात केला.
  • जालियनवाला बाग हत्याकांड


Jaliyanwala bag Hatyakand

पहिल्या महायुदधानंतर आर्थिक दैन्य, शासनाची बेपवाई वाढती दडपशाही इत्यादी समस्यांनी भारतीय जनता त्रस्त झाली होती. १९१९ साली भारतीय जनतेतील वाढता असंतोष दडपण्याबाबत उपाययोजना रौलेट समितीने सुचवली. त्यानुसार कोणत्याही व्यक्तीला अटक करण्याचा आणि खटला न चालवता स्थानबदध करण्याचा अधिकार शासनास मिळाला. गांधीजीनी या काळया कायदयाचा निषेध करण्यासाठी भारतीय जनतेला ६ एप्रिल १९१९ रोजी हरताळ पाळण्याचे आवाहन केले. १३ एप्रिल १९१९ रोजी जनरल डायरप्रणीत जालियनवाला बागेतील हत्याकंड घडले. या घटनेने व्यथित झालेल्या गांधीजींनी ब्रिटिश शासनाशी असहकार करण्याचा निर्धार व्यक्त केला. तर रवींद्रनाथ टागोरांनी सर पदवीचा त्याग केला. भारतीय जनतेने या घटनेचा सार्वत्रिक निषेध केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा