Post views: counter

Current Affairs March 2015 Part- 2

चालू‬ घडामोडी मार्च २०१५ 


  • रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) पुन्हा एकदा रेपो दरात कपात केली असून, रेपो दर ०.२५ टक्क्यांनी कमी करत किती टक्के केला आहे?
== ७.५० टक्के
  • रिझर्व्ह बँकेचे नव्या आर्थिक वर्षांतील(२०१५-१६) पहिले पतधोरण कधी जाहीर होणार आहे?
== ९ एप्रिल २०१५
  • रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात केल्यामुळे मुंबई शेअर बाजार निर्देशांक कोणत्या ऐतिहासिक पातळीवर पोहोचला.
== ३० हजार(३०,०२४.७४)-(०४ मार्च २०१५)

  • बीबीसीने घेतलेल्या ‘निर्भया’ प्रकरणातील कोणत्या आरोपीच्या मुलाखतीने वाद निर्माण झाला आहे?
== मुकेश सिंग
  • ड्रग्ज प्राइझ कंट्रोल ऑर्डर- २०१३ (डीपीसीओ) च्या आदेशानुसार ६२८ औषधांपैकी ५०९ जीवनावश्यक औषधांच्या किंमती कोणी याआधी निश्चित केल्या आहेत?
== राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरण (एनपीपी)
>५०९ औषधांपैकी १२७ औषधांच्या किंमतीत ४० टक्क्यांहून अधिक कपात
>३४ औषधांच्या किंमती ३५-४० टक्क्यांपर्यंत कपात
औषध मूल्य नियंत्रकाकडून ३० औषधांच्या किंमतीत ३० ते ३५ टक्क्यांपर्यंत कपात
>५७ औषधांच्या किंमतीत २५ ते ३० टक्के आणि ६५ औषधांच्या किंमतीत २० ते २५ टक्क्यांपर्यंत कपात
  • २०१४ वाघ मृत्यू:-
  1. २०१४ -७८ 
  2. २०१३-६८ 
  3. २०१२-८९
  •  लोकसभा निवडणूक-२०१४ जमा-खर्च(सर्व आकडे कोटी रुपयांमध्ये)
जमा निधी:-
  1. भाजप ५८८.४५ कोटी
  2. काँग्रेस ३५०.३९ कोटी
  3. राष्ट्रवादी काँग्रेस ७७.८५ कोटी
  4. सीपीआय९.५२ कोटी
खर्च:-
  1. भाजप ७१२.४८ कोटी
  2. काँग्रेस ४८६.२१ कोटी
  3. राष्ट्रवादी काँग्रेस ६४.४८ कोटी
  4. सीपीआय ६.७२ कोटी
  •  भारताचे पाकिस्तानातील उच्चायुक्त कोण आहेत?
== टी.सी.ए राघवन
  • फोर्ब्स अब्जाधीश देश:-
  1. अमेरिका-५३६ 
  2. चीन-२१३
  3. जर्मनी-१०३ 
  4. भारत-९०

  •  भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीने ११३ डावात २० शतके केली.होती त्याचा हा विक्रम दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर हाशिम आमला किती डावांत २० शतके साकारत मोडला आहे?
== १०८ डावांत(१११ सामन्यांत)
जलद २० शतके करणारे खेळाडू
  1. १०८ – हाशिम आमला
  2. १३३ – विराट कोहली
  3. १७५ – एबी डेविलियर्स
  4. १९७ – सचिन तेंडुलकर
  5. २१४ - सौरव गांगुली
  • अर्जेंटिना ओपनचे जेतेपद पटकाविणारा खेळाडू कोण?
== राफेल नदाल
  • आदर्श सोसायटी गैरव्यवहार प्रकरणातील आरोपींच्या यादीतून आपले नाव वगळण्यासाठी माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण यांनी दाखल केलेली याचिका कोणत्या न्यायालयाने फेटाळली आहे?
== मुंबई उच्च न्यायालय
  • शहरी भागात राहणाऱ्या गरिबांना माफक दरामध्ये जेवणाची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून ओडिशा राज्य सरकार १ एप्रिलपासून कोणती योजना सुरु करणार आहे?
== आहार योजना
योजनेअन्वये कटक भुवनेश्‍वर, संभळपूर, बेहरामपूर आणि राऊरकेला पाच जिल्ह्यांमधील नागरिकांना पाच रुपयांमध्ये डाळ-भात उपलब्ध करून दिला जाईल.
  • अल्बिडो म्हणजे काय?
== सूर्याचा प्रकाश ग्रहाच्या पृष्ठभागावर पडून त्यापैकी काही ऊर्जा परावर्तित होते. हे त्या ग्रहाच्या पृष्ठभागाच्या परावर्तनाचे मापक असते. तसेच, क्ष किरणांमध्ये दिसणाऱ्या अवकाशातील घटकांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रामध्ये (इन्फ्रारेड ऍस्ट्रॉनॉमी) एच बॅंड म्हणजे, 1.65 मायक्रॉनवर असलेली ट्रान्समिशन विंडो. या भागात येणारे घटक पृष्ठभागापासून कोणताही अडथळा न येता येतात. त्यामुळे त्यांच्या अभ्यासाने पृष्ठभागाबद्दल माहिती मिळू शकते.
(भारताच्या मंगळयानाला नुकतीच त्या ग्रहावरील परावर्तित ऊर्जा (अल्बिडो) दिसली)
  • "इसिस‘ या दहशतवादी संघटनांच्या समर्थकांनी ट्‌विटरच्या कर्मचाऱ्यांसह संस्थापक असलेल्या कोणत्या व्यक्तीला जिवे मारण्याची धमकी दिली आहे?
== जॅक डोर्सी (JustPaste.it या छायाचित्र शेअरिंग साइटवरून)
  • भारत आणि पाकिस्तान यांच्यात सात महिन्यांच्या खंडानंतर चर्चा सुरू झाली असून, सध्या सार्क यात्रेवर असलेले भारताचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव असलेल्या कोणत्या अधिकार्याची भेट घेतली?
== एझाज चौधरी
  • स्वाइन फ्लूचे निदान करण्यासाठीच्या पहिल्या स्वदेशी किटला केंद्र सरकारने मंजुरी दिली असून बेंगळुरू येथील कोणत्या कंपनीने हे किट विकसित केले आहे?
== मोल्बिओ डायग्नॉस्टिक्स (किंमत ८५० रुपये)
  • स्वाइन फ्लू (एच १ एन १), सीझनल फ्लू (एच ३ एन २) आणि टाइप बी यांसारख्या विषाणूंवरील कोणती लस पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमार्फत मार्चच्या शेवटच्या आठवड्यात बाजारात उपलब्ध केली जाणार आहे?
== ट्राय व्हॅक्सिन
  • केंद्र सरकारने किती एनजीओंना विदेशातून भारतात निधी आणण्यास बंदी घातली आहे?
== ६९
  • विदेशातील काळा पैसा परत आणण्यात सरकार अपयशी झाल्यामुळे आणण्यात आलेल्या सुधारणा विधेयकात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावात विरोधकांनी सुचवलेल्या दुरुस्त्या सभागृहात मंजूर झाल्या आहेत,या दुरुस्त्या कोणी सुचविल्या होत्या?
== सीताराम येचुरी आणि पी. राजीव (सीपीएम-CPM)
(दुरुस्तीवर मतदान घेण्यात आले व ११८ विरुद्ध ५७ मतांनी ती स्वीकारली गेली़)
  • राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावात विरोधकांनी सुचवलेल्या दुरुस्त्या सभागृहात चौथ्यावेळी मंजूर झाली आहे.यापूर्वी असे कधी झाले होते?
  1. ३0 जानेवारी १९८० मध्ये जनता पार्टीच्या शासनकाळात
  2. २९ डिसेंबर १९८९ मध्ये व्ही़ पी़ सिंह यांच्या सरकारमध्ये 
  3. १२ मार्च २००१ मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारमध्ये

1 टिप्पणी: