Post views: counter

Current Affairs March 2015 part - 5

चालू‬ घडामोडी मार्च २०१५
Current Affairs

  • २७ मार्च हा दिवस महाराष्ट्र अवयवदान दिन म्हणून पाळण्यात येतो. २७ मार्च १९९७ रोजी कोठे पहिले कॅडॅव्हर किडनी ट्रान्सप्लान्ट ऑपरेशन झाले होते?
== सायनच्या लोकमान्य टिळक हॉस्पिटलमध्ये
  • अन्न सुरक्षा कायद्याच्या कक्षेत असलेल्या देशातील ६७ टक्के कुटुंबांची संख्या ४० टक्क्यांवर आणण्याची शिफारस कोणत्या समितीने केली असून असून रेशनव्यवस्थेला पर्याय म्हणून रोख पैसे थेट हस्तांतरण करावे, असेही सुचवले आहे?
== शांताकुमार समिती
>समितीने तांदूळ व गव्हाचा भाव जो आज अनुक्रमे ३ रु. व २ रु. प्रतिकिलो आहे, तो किमान हमी भावाच्या निम्म्या किमतीपर्यंत वाढवण्याचीही सूचना केली आहे.
  •  राज्यातील शालेय पोषण आहार योजनेसाठी कोणती योजना लागू करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे?
== मध्यवर्ती स्वयंपाकघर


  1. हायकोर्टाने सदर योजनोमधून शिक्षकांचा सहभाग वगळण्याचे आदेश दिले आहेत.
  2. परंतु शालेय पोषण आहार योजनेमध्ये शिक्षकांचा सहभाग आवश्यक आहे. त्यामुळे राज्य सरकारने मुंबई हायकोर्टाच्या या निर्णयाविरुध्द सुप्रीम कोर्टात विशेष अनुमती याचिका दाखल केली आहे.
  3. हे प्रकरण सध्या सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे, त्यामुळे कोर्टाच्या निर्णयानंतरच याबाबत विचार करता येईल
  • राज्यातील १७ जिल्ह्यांतील ४ हजार ९०९ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक तर ९०७ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे.यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे अर्ज दाखल करताना सादर कराव्या लागणाऱ्या जातवैधता प्रमाणपत्रास किती महिन्यांची मुदतवाढ देण्यात येणार आहे?
== ६ महिन्यांची
  • नौदलाच्या गस्तीपथकातील कोणते विमान गोवा किनारपट्टीपासून नैऋत्येस २५ सागरी मैल अंतरावर समुद्रात कोसळले?
== डॉर्निअर
  • पहिल्या भारतीय स्त्री-डॉक्टर आनंदीबाई जोशी- २०१५ -शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्ष(१५० वर्षे)
  • राज्यातील गड किल्ल्यांचे जतन आणि संवंर्धन करण्यासाठी समिती:-
>अध्यक्षः विनोद तावडे, सांस्कृतिक कार्यमंत्री,
>प्रमुख मार्गदर्शकः निनाद बेडेकर, पांडुरंग बलकवडे,
>सदस्यः ऋषिकेश यादव, राजेंद्र टिपरे, राजेंद्र शेळके, प्रमोद पाटील, भगवान चिले, वी. रा. पाटील, प्र. के. घाणेकर, सचिन जोशी, प्रफुल्ल माटेगावकर, संकेत कुलकर्णी
  • महाराष्ट्र आग प्रतिबिंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम, २००६ या विधेयकात सुधारणा करणारे नवे विधेयक विधानसभेने संमत केल्याने आता हॉस्पिटले, आरोग्यधाम व शुश्रुषागृहे यांच्या इमारतींची उंची किती मीटरपर्यंत वाढविता येणार आहे?
== ४५ मीटर
>यापूर्वीच्या कायद्यान्वये ही उंची ३० मीटर
  • राज्यातील ७ हजार ७६८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तर १ हजार ७२८ ग्रामपंचायतींमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीसाठी २२ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
  • राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया
    - निवडणूक नोटीस प्रसिद्धीचा दिनांक: ३० मार्च
    - नामनिर्देशनपत्रे देणे व स्वीकारणे: ३१ मार्च ते ७ एप्रिल
    - नामनिर्देशनपत्रांची छाननी: ८ एप्रिल
    - नामनिर्देशनपत्रे मागे घेणे: १० एप्रिल
    - निवडणूक चिन्हांचे वाटप: १० एप्रिल
    - मतदान: २२ एप्रिल
    - मतमोजणी: २३ एप्रिल
  • माहिती-तंत्रज्ञान कायद्यातील कोणते कलम हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणते असे ठरवत सुप्रीम कोर्टाने रद्द केले आहे?
== कलम '६६ अ'
  • राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचा अहवाल:-
  1. २०१३मध्ये २ हजार ५१२ व्यक्तींचे खून झाले होते
  2. 'ऑनर किलिंग'चे तब्बल २२० प्रकार 
  3. वैयक्तिक वैरामुळे २०७, मालमत्तेच्या वादातून १६२, हुंडाबळी ८१, वैयक्तिक हितासाठी ६७ जणांच्या हत्या.
  • जातीअंतर्गत दहशतवाद असलेल्या जातपंचायतींचा बिमोड करण्यासाठी महाराष्ट्रात सुरू झालेल्या जातपंचायतविरोधी मूठमाती अभियानाची दखल घेत आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्रातील जातपंचायतींची मक्तेदारी कशी संपुष्टात आली याचे विस्तृत वृत्त कोणत्या वाहिनीने प्रसिध्द केले आहे?
== बीबीसी
  • राज्यात गुटखाबंदी असतानाही गुटख्याची विक्री करणाऱ्यांविरोधात कोणत्या कलम अन्वये अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येईल?
== भा.दं.वि.कलम ३२८
  • ब्राह्मण सभा,मुंबई संस्थेच्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात श्रद्धानंद पुरस्कार' व 'उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार' कोणास प्रदान करण्यात आला?
== श्रद्धानंद पुरस्कार' डॉ. प्रकाश आमटे तर 'उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार' डॉ. मंदाताई आमटे
  • बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यातंर्गत गुन्हा दाखल झालेल्या महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेचे महासंचालक असलेल्या कोणत्या अधिकार्यास सरकारी सेवेतून निलंबित करण्यात आले आहे?
== एम. एच. सावंत
  • २०१५:- गीतरामायण हीरकमहोत्सवी वर्ष(६० वर्षे)
>गीतरामायण हे एप्रिल,इ.स.१९५५ ते एप्रिल,इ.स.१९५६ या कालावधीत गजानन दिगंबर माडगूळकर(गदिमा) यांनी वाल्मिकी रामायणाचा आधार घेऊन रचलेले, सुधीर फडके यांनी संगीत दिलेले, आणि आकाशवाणीच्या पुणे केद्रावरून प्रसारित झालेले मराठी सुश्राव्य भावगीतकाव्य आहे.(एकूण ५६ गीते)
  • जगभरातील रंगकर्मींना एका व्यासपीठावर आणण्यासाठी ‘युनेस्को’च्या वतीने स्थापन झालेल्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटचे केंद्र भारतात कोठे सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत?
== पुणे

  • ‘ई रेशनकार्ड सेवा‘ सर्वप्रथम सुरु करणारे राज्य कोणते?
== दिल्ली(२८ मार्च २०१५ पासून)
  • दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी सुरू असलेल्या जलयुक्त शिवार अभियानासाठी या वेळी कॉर्पोरेट क्षेत्रातील विविध उद्योगांनी किती गावे दत्तक घेऊन त्यासाठीची आर्थिक मदत मुख्यमंत्र्यांकडे हस्तांतरित केली आहे?
== ४०० गावे
  • ‘पाणीवाले बाबा‘ म्हणून उल्लेख केला जाणारे प्रसिध्द जलतज्ञ कोण?
== राजेंद्र सिंग

  • प्रतिष्ठेच्या महात्मा गांधी शांतता पुरस्कार २०१४ साठी कोणत्या संस्थेची निवड करण्यात आली आहे?
== भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो)
>एक कोटी रु. आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप
  • स्वदेशी बनावटीचा "आयआरएनएसएस-१डी‘ हा दिशादर्शक उपग्रह प्रक्षेपणासाठी सज्ज झाला असून, २८ मार्चला श्रीहरिकोटा येथून कोणत्या प्रक्षेपकाच्या साहाय्याने या उपग्रहाचे प्रक्षेपण होणार आहे?
== "पीएसएलव्ही-सी २७‘
  • उपग्रह प्रेक्षपण:-"आयआरएनएसएस-१ए‘ हा उपग्रह ०१ जुलै २०१३ रोजी, तर ‘आयआरएनएसएस-१बी‘ हा ०४ एप्रिल २०१४ आणि "आयआरएनएसएस-१सी‘ हा १६ ऑक्टोपबर २०१४ प्रेक्षपित करण्यात आले.
  • फ्रान्समधील पर्वतरांगांत जर्मनविंगचे कोणते विमान कोसळले होते?
== एअरबस ए ३२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा