Post views: counter

लॉर्ड कॉर्नवॉलिस ( १७८६ - १७९३)

लॉर्ड कॉर्नवॉलिस ( १७८६ - १७९३) च्या काळातील महत्वाच्या घटना 


 कंपनीमध्ये प्रशासन कार्यक्षम बनविण्यासाठी सर्वांगीण सुधारणा घडविण्यासाठी प्रयत्न

प्रशासकीय व अंतर्गत सुधारणा -
  1. संचालक मंडळीच्या आप्त स्वकीयांना दिली जात असलेली अनेक अनावश्यक पदे रद्द केली .
  2. १७७८ - व्यापाऱ्यांऐवजी प्रतिनिधींशी खरेदीचे करार .
  3. जमीन महसुल रक्कम कायम करण्यात आली व ती गोळा करुन भरण्याची जबाबदारी जमीनदारांकडे सोपवली.
  4. जमीन व महसुल बाबत लहान - सहान तंटे सोडविण्याचे काम जमीनदारांकडे सोपवले.
  5. जिल्हाधिकारीचे महसुलसंबंधी न्यायदानाचे अधिकार काढून घेऊन ते महसुल मंडळाकडे सोपविण्यात आले .
  6. कंपनीच्या अमलाखालील प्रदेशाची एकूण ३५ जिल्ह्यांची विभागणी २३ वर आणली .
  7. जिल्हाधिकारी प्रमुख असून तो महसुल मंडळाला प्रत्यक्षपणे जबाबदार व तो युरोपियन असला पाहिजे असा दंडक केला .
  8. कॉर्नवॉलिसने शासनाच्या प्रत्येक खात्याचे कामकाज विशिष्ट पद्धतीने होण्यासाठी तपशीलाने नियम तयार केले .
  9. जिल्हाधिकारी हा जिल्हा व केंद्र सरकार यातील प्रमुख दुवा म्हणून शासकीय कार्याचा केंद्रबिंदू .
  10. १७९० गव्हर्नर जनरलचे पद स्विकारल्यानंतर कॉर्नवॉलिसने टिपू विरूद्ध युद्ध पुकारले.मार्च १७९२ श्रीरंगपट्टणचा तह इंग्रज व टिपू सुलतान यांच्यात झाला .
  11. अवधच्या नवाबाकडून इंग्लिश फौजेकरिता ५० लाख रुपये रक्कम वसूल केले
  12. युरोपियनांना दिल्या जाणाऱ्या व्यापारी सवलती रद्द केल्या .
 न्याय खात्यात सुधारणा
  1. दिवाणी अदालत नावाची मुलकी न्यायालये जिल्हाधिकारीचे कार्यक्षेत्रात असण्याची व्यवस्था कॉर्नवॉलिस ने केली .
  2. जिल्हा न्यायालयांच्याव र कोलकाता , ढाका , पाटणा , मुर्शिदाबाद येथे चार प्रांतिक  न्यायालये स्थापन केली .
  3. खालच्या स्तरावर प्रत्येक जिल्ह्यात एक फौजदारी न्यायालय स्थापन केले .
  4.  जिल्ह्याची लहान लहान क्षेत्रात विभागणी करुन त्या प्रत्येक भागावर एका दरोग्याची नियुक्ती केली .
  5. सर्व दरोग्यांवर जिल्ह्याच्या ठिकाणी नेमलेल्या कंपनी अधिकाऱ्याची देखरेख व नियंत्रण असे .
१७९३ - लॉर्ड कॉर्नवॉलिस निवृत्त 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा