Post views: counter

Current Affairs Aug 2015 Part - 3

  • केंद्र सरकारचा "अमृत योजना‘ राबविण्याचा निर्णय
टंचाईग्रस्त शहरांसाठी शाश्‍वत पाणीपुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारने "अमृत योजना" राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी राज्यातील 43 शहरांचा समावेश होणार असला तरी, मुंबई, ठाण्यासारख्या शहरापेक्षा सोलापूर, लातूरसह अन्य शहरांना प्राधान्य देण्यात येणार आहे. यासाठी येत्या 20 ऑगस्टपासून केंद्र सरकारचे पथक राज्याच्या दौऱ्यावर येत असून, तीनदिवसीय कार्यशाळेनंतर शहरांची नावे निश्‍चित करण्यात येणार असल्याची माहिती नगरविकास विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. राज्य सरकारची "जलयुक्‍त शिवार योजना" यशस्वी झाली असली तरी, ही योजना ग्रामीण भागात राबविण्यात येत आहे. 2 हजार कोटींची "अमृत योजना" राबविण्यासाठी राज्यातील 43 शहरांची निवड करण्यात आली असली तरी, पाणीटंचाईच्या शहरांचा प्राधान्याने विचार करण्यात येणार आहे.
अमृत योजनेसाठी निश्‍चित केलेली शहरे : मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, नाशिक, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, औरंगाबाद, नवी मुंबई, सोलापूर, मीरा-भाईंदर, भिवंडी, अमरावती, नांदेड, कोल्हापूर, इचलकरंजी, उल्हासनगर, सांगली-मिरज-कुपवाड, मालेगाव, जळगाव, अकोला, लातूर, धुळे, नगर, चंद्रपूर, परभणी, जालना, अंबरनाथ, भुसावळ, पनवेल, बदलापूर, बीड, गोंदिया, सातारा, बार्शी, यवतमाळ, अचलपूर, उस्मानाबाद, नंदुरबार, वर्धा आणि उदगीर.
  • फेसबुक लवकरच "ब्रेकिंग न्युज" नवे ऍप सादर करणार
लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईट फेसबुक लवकरच "ब्रेकिंग न्युज"बाबत माहिती देण्यासाठी नवे ऍप सादर करणार आहे. सध्यातरी या ऍपची चाचणी सुरु असून लवकरच ती सर्व युजर्ससाठी उपलब्ध होणार आहे.
 या ऍपद्वारे फेसबुकसोबत करार असलेल्या प्रकाशकांच्या विविध महत्वाच्या बातम्या, लेख आदींबाबत युजरला सूचित करण्यात येणार आहे. तसेच सोबत

Current Affairs Aug 2015 Part -2

  • माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील श्रीमंत व्यक्तींची यादी
जगभरातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील श्रीमंतव्यक्तींची यादी फोर्ब्जने जाहीर केली आहे. यामध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी आणि विश्वविख्यात मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक बिल गेट्‌स प्रथम क्रमांकावर आहेत.
फोर्ब्जने ५ ऑगस्टला जाहीर केलेल्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील श्रीमंतांच्या यादीत शंभर व्यक्तींपैकी जवळजवळ ५१ व्यक्ती या अमेरिकेतील आहेत, तर  ३३ व्यक्ती या आशियातील  आणि ८ युरोपमधील आहेत.या शंभर व्यक्तींची एकूण संपत्ती ८४२.९ अब्ज डॉलर इतकी असल्याचे या यादीत म्हटले आहे. यामध्ये बिल गेट्‌स यांची संपत्ती ७९.६ अब्ज डॉलर इतकी आहे, तर त्यांच्यापाठोपाठ ओरॅकलचे संस्थापक लॅरी इल्लीसन यांचा क्रमांक असून त्यांची संपत्ती ५० अब्ज डॉलर इतकी आहे.तिसऱ्या नंबरवर अमॅझोनचे जेफ्फी बेझोस असून त्यांची संपत्ती ४७.८ अब्ज डॉलर आहे. सोशल मिडियात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या फेसबुक या संकेतस्थळाचे सहसंस्थापक मार्क झुकरबर्गसुद्धा चौथ्या क्रमांकार आहेत. मार्क झुकरबर्गची संपत्ती ४१.२ अब्ज डॉलर आहे. यानंतर या यादीत गुगलचे लॅरी पेज आणि सर्गेई ब्रिन आणि अलीबाबाचे अध्यक्ष जॅक मा यांचाही समावेशआहे.गेल्या काही दिवसापूर्वी फोर्ब्जने सर्वाधिकश्रीमंत दाम्पत्य म्हणून बिल गेट्‌स व त्यांच्या पत्नी मेलिंडा यांचे नाव जाहीर केले होते.

  • मोदी गेलेल्या देशांतून २० अब्ज डॉलर्स 'एफडीआय'
गेल्या आर्थिक वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट दिलेल्या देशांकडून भारतात २० अब्ज डॉलर्सची थेट परकी गुंतवणूक करण्यात आलीआहे.२०१४ -१५ या कालावधीत भारताकडून बाहेर ६.४२ अब्ज डॉलर्सची परकी गुंतवणूक करण्यात आली तर भारतात एकूण ७५.७१ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक झाली, असे वाणिज्य मंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यसभेत लेखी स्वरूपात सांगितले आहे.याच काळात भारतातील कंपन्यांनी भूतान, ब्राझील, नेपाळ, जपान, अमेरिका, म्यानमार, ऑस्ट्रेलिया, सेशेल्स, मॉरिशस, फिजी, श्रीलंकाव सिंगापूर या देशांमध्ये ३.४२ अब्ज डॉलर्सचीथेट परकी गुंतवणूक केली आहे.या कालावधीत भारतातील थेट विदेशी गुंतवणुकीत २७ टक्क्यांची वाढ झाली असून हे प्रमाण आता ३०.९२ अब्ज डॉलर्स झाले आहे.

Current Affairs Aug 2015 part - 1

  • मुंबई-नागपूर द्रुतगती महामार्ग बांधण्याची घोषणा : 

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या धर्तीवर आता मुंबई-नागपूर द्रुतगती महामार्ग बांधण्याची घोषणा करण्यात आली आहे.
 तब्बल 30 हजार कोटी रुपयांत उभारला जाणारा हा महामार्ग 2019 पर्यंत बांधला जाणार असून, या महामार्गावर ऑप्टिक फायबरचे जाळे असेल.
 घोटी, औरंगाबाद, अमरावती या मार्गांवरून पुढे जाणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला "कम्युनिकेशन सुपर एक्‍स्प्रेस हायवे" संबोधले जाणार आहे.
 महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे राबवल्या जाणाऱ्या या प्रकल्पाची मुख्यमंत्री फडणवीस यांनी घोषणा केली.
प्रकल्प माहिती :
मुंबई ते नागपूर सहापदरी द्रुतगती मार्ग
 अंतर दहा तासांत पार होणार
 मागास भागातून जाणाऱ्या या रस्त्यावर आयटी पार्क, स्मार्ट सिटी, शैक्षणिक संकुले

  • आता फेसबुक करणार प्रसार :
जगातील आघाडीची सोशल नेटवर्किंग साइट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फेसबुक आता इंटरनेटचा प्रसार करणार असून, यासाठी प्रथमच सौरऊर्जेवर उड्डाण करणाऱ्या ड्रोनची निर्मिती करण्यात आली आहे.
 यामुळे इंटरनेट कनेक्‍शनपासून दूर असणाऱ्या विकसनशील देशातील दुर्गम भागात लेसरच्या माध्यमातून वायरलेस इंटरनेट उपलब्ध होऊ शकेल.
 फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी आज या ड्रोनच्या निर्मितीची प्रक्रिया पूर्ण झाल्याची घोषणा केली.
 "इंटरनेट डॉट ओरजी"च्या सहकार्याने फेसबुकने हा प्रकल्प राबविला आहे.
 "ऍक्विला" असे या ड्रोनचे नाव असून, त्याच्या पंखांचा विस्तार
Post views: counter

जिल्हा परिषद

जिल्हा परिषद


                   जिल्हा परिषद ही पंचायतराजमधील महत्वाची संस्था असून त्यातील शिखर संस्था म्हणून ओळखली जाते. नाईक समितीच्या शिफारशिनुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समितीअधिनियम 1961 कलम क्र.6 नुसार प्रत्येक जिल्हयासाठी नागरी जिल्हे सोडून एक जिल्हा परिषद स्थापन करण्यात आली. महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची स्थापना 1 मे, 1962 रोजी करण्यात आली.
  • रचना -प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये एक अध्यक्ष आणि जिल्हापरिषद सदस्य मिळून एक जिल्हापरिषद निर्माण करण्यात येईल.

पंचायत समिती

पंचायत समिती 


महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961, कलम क्र. 56 नुसार प्रत्येक तालुक्यासाठी एक पंचायत समिती निर्माण करण्यात आली आहे.

पंचायत राज्यातील मधला स्तऱ म्हणून पंचायत समितीला ओळखले जाते.
  • निवडणूक : प्रत्येक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने राज्य निवडणूक आयोग घेते.
  • सभासदांची पात्रता :
  1. तो भारताचा नागरिक असावा
  2. त्याच्या वयाची 21 वर्ष पूर्ण झालेली असावीत.
  3. त्या तालुक्यातील मतदान यादीत त्याचे नाव असावे.
  • आरक्षण :
महिलांना : 50 %
अनुसूचीत जाती/जमाती : लोकसंख्येच्या प्रमाणात (महिला 50%)
इतर मागासवर्ग : 27% (महिला 50%)

ग्रामपंचायत


ग्रामपंचायत

 
  • कायदा - 1958 (मुंबई ग्रामपंचायत अधिनियम - १९५८ )
मुंबई ग्रामपंचायत अधिनियम - १९५८ कलम 5 मध्ये प्रत्येक गावासाठी एक ग्रामपंचायत स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे. परंतु एखाद्या गावामध्ये 600 लोकसंख्या असेल त्याठिकाणी गट ग्रामपंचायत स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
  • सभासद व त्यांची विभागणी - कमीत-कमी 7 व जास्तीत जास्त 17
लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची सभासद संख्या -लोकसंख्या :
  1. 600 ते 1500 - 7 सभासद
  2. 1501 ते 3000 - 9 सभासद
  3. 3001 ते 4500 - 11 सभासद
  4. 4501 ते 6000 - 13 सभासद
  5. 6001 ते 7500 - 15 सभासद
  6. 7501 त्यापेक्षा जास्त - 17 सभासद

वेलस्लीची कारकिर्द (१७९८ - १८०५) :

वेलस्लीची कारकिर्द (१७९८ - १८०५)


                      र्लॉड वेलस्नलीची कारकिर्द अनेक लढाया व त्यात त्याने मिळविलेले विजय व त्यांच्या मुत्सद्देगीरीने गाजली. हिंदी राजांना आपल्या वर्चस्वाखाली आणण्यासाठी व त्यांचा जास्तीत जास्त प्रदेश आपल्या ताब्यात आणण्यासाठी त्याने तैनाती फौजेची पध्दत राबवली या योजनेत त्यास फार मोठे यश मिळाले.
  • तैनाजी फौजेची पध्दतीच्या धोरणाचे स्वरूप :
तैनाती फौज स्वीकारणार्‍या शासनकत्र्यास पुढील अटी स्वीकारव्या लागत असत.
(१) परराज्यांशी इंग्रजांच्या परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारचा संबंध ठेवता येणार नाही.
(२) मोठया राज्यांना शांतता व सुव्यवस्थेसाठी ंकंपनीची मोठी फौज ठेवावी लागेल. या फौजेचे नियंत्रण इंग्रज अधिकार्‍यांच्या हातात राहील. या फौजेच्या खर्चासाठी आपल्या राज्यातील काही मुलुख कंपनीला कायमचा तोडून द्यावा लागेल. लहान राज्ये यात दरवर्षी कंपनीस ठरावीक रक्कम देतील.

वॉरन हेस्टिंग्जची कारकिर्द (१७७२ ते १७८५)

वॉरन हेस्टिंग्जची कारकिर्द (१७७२ ते १७८५)

                      १७७२ वॉरन हेस्टिंग्ज बंगालचा गव्हर्नर म्हणून भारतात आला. त्या वेळी कंपनीची आर्थिक स्थिती खूप खालावली होती. खजिना रिकामा पडला होता. कंपनीच्या अधिकार्‍यात लाचलुचपत वाढली होती. बंगालमध्ये अराजकाता वाढली होती. शहा आलम बादशहाने मराठयांचा आश्रय घेतला होता. मराठे व हैदर यांच्या सज्ञ्ल्त्;ाा या काळात प्रबळ होत्या. हेस्ंिटग्जने अनेक महत्वाच्या सुधारण केल्या. त्यांने व अयोध्येच्या बेगमांचे प्रकरण यात भाषांतरांवरूनरष्ट मार्गाचा अवलंब करुन त्याने कंपनीस प्रचंड पैसा मिळवून दिला. पण त्यामुळे कंपनीची बदनामी झाली.
                    वॉरन हेस्टिग्जंच्या काळात पहिले इंग्रज मराठा युध्द (१७७८ ते १७८२) उदभवले. नारायणराव पेशवे यांच्या खुनानंतर राघोबादादा इंग्रजांच्या आश्रयास गेले.

मानवी हक्क संरक्षण कायदा- 1993

मानवी हक्क संरक्षण कायदा- 1993 


 
मानवी हक्क संरक्षण कायदा- 1993 (प्रकरण 1)
  • प्रकरण-1  प्रारंभिक(या कायद्यामध्ये एकूण 43 कलम आहेत )
1. संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ :
  1. या अधिनियमाला मानवी हक्क संरक्षण कायदा असे संबोधण्यात येईल.
  2. याचा विस्तार जम्मू-काश्मीर सोडून संपूर्ण भारतभर असेल.
  3. तो दिनांक 28 सप्टेंबर 1993 रोजी अंमलात आल्याचे मानण्यात येईल.
2. व्याख्या :
  1. सशस्त्र दले याचा अर्थ नौदल, भुदल, हवाईदल आणि त्यामध्ये संघातील इतर कोणत्याही सशस्त्र दलाचा समावेश होतो.
  2. अध्यक्ष म्हणजे आयोगाच्या किंवा राज्य आयोगाच्या अध्यक्ष्यस्थानी असलेली व्यक्ति होय. 
  3. आयोग म्हणजे कलम 3 नुसार राष्ट्रीय मानवी हक्क आयोग होय.

Current Affairs july 2015 Part-5

  • 'मलाला युसुफझाईने लेबनॉनमधील सीरियाच्या निर्वासित मुलींसाठी केली शाळा सुरू : 
नोबेल पुरस्कार मिळवणारी जगातील सर्वांत लहान वयाची व्यक्ती ठरलेल्या मलाला युसुफझाई हिने आपला अठरावा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला.हा वाढदिवस तिने लेबनॉनमधील सीरियाच्या निर्वासितांबरोबर साजरा करत तेथील मुलींसाठी शाळा सुरू केली आहे.द मलाला फंड या स्वयंसेवी संस्थेतर्फे ही शाळा सीरियाच्या सीमेनजीक असलेल्या लेबनॉनमधील निर्वासितांच्या छावणीत सुरू झाली आहे. या शाळेचा सर्व खर्च मलालानेच सुरू केलेल्या द मलाला फंड उचलणार आहे.तसेच या शाळेमध्ये 14 ते 18 या वयोगटातील दोनशे मुलींना प्रवेश दिला जाणार आहे.

  • क्रायोजेनिक इंजिनच्या शक्तिशाली आवृत्तीची यशस्वी चाचणी :
भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) 20 जुलै रोजी भारतीय अंतराळवीरांना अवकाशात उड्डाण करण्यासाठी आवश्यक असलेल्या क्रायोजेनिक इंजिनच्या शक्तिशाली आवृत्तीची यशस्वी चाचणी घेतली.
 या नव्या इंजिनमुळे जागतिक व्यावसायिक स्पर्धेत उतरलेल्या इस्रोला आठ टन वजनाचे सॅटेलाइट अवकाशात सोडणे शक्य होणार आहे.

Curent Affairs july 2015 Part- 4

  • भारत, पाकिस्तानला ‘एससीओ’चे सदस्यत्व

भारत आणि पाकिस्तानने शांघाय सहकार्य परिषदेमध्ये (एससीओ) सहभागी होण्यास रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी मान्यता दिली आहे.पश्चिमेकडील देशांच्या आघाडीप्रमाणेच ‘एससीओ’चेही महत्त्व असून, त्यावर रशिया आणि चीनचे अधिपत्य आहे. ‘एससीओ’तील सदस्यत्वामुळे भारताला मध्य आशियातील ऊर्जास्रोतांचा लाभ होणार आहे.आतापर्यंत भारत आणि पाकिस्तानाला ‘एससीओ’च्यानिरीक्षकांचा दर्जा प्राप्त होता.दक्षिण आशियाई देशांच्या परिषदेसाठी भारताचेपंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या रशियामध्ये आहेत.
शांघाय सहकार्य परिषद
स्थापना : २६ एप्रिल १९९६
संस्थापक सदस्य : चीन, रशिया, कझाकिस्तान, किरगिझस्तान, ताझिकिस्तान उझबेकिस्तान १५ जून २००१ पासून सदस्य.
उद्देश : मध्य आशियामध्ये संरक्षणासाठी सहकार्याला प्रोत्साहन देणे.
  • विंबल्डन स्पर्धा आणि भारत :


भारतीयांसाठी यंदाची विंबल्डन स्पर्धा सर्वाधिक यशाची ठरली आहे.महिला दुहेरीत सानिया मिर्झा, मुलांच्या दुहेरीत सुमीत नागल आणि मिश्र दुहेरीत लिअँडर पेस  यांनी आपापल्या साथीदारांसह विजेतेपद मिळविले.
 रविवारी झालेल्या अंतिम लढतीत पेसने स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीसच्या साथीत ऍलेक्‍झांडर पेया (ऑस्ट्रिया) आणि टिमेआ बाबोस (हंगेरी) यांचा 6-1, 6-1 असा चाळीस मिनिटांत पराभव केला आहे.
 हिंगीसला या स्पर्धेत दुसरे विजेतेपद मिळाले. तर तिने शनिवारी भारताच्याच सानिया मिर्झाच्या साथीत महिला दुहेरीचे विजेतेपद मिळविले होते. पेस आणि हिंगीस जोडीचे हे मोसमातील दुसरे ग्रॅंड स्लॅम विजेतेपद ठरले.
 त्यांनी या वर्षी ऑस्ट्रेलिया स्पर्धेतही विजेतेपद मिळविले आहे. तसेच पेसचे हे सोळावे ग्रॅंड स्लॅम विजेतेपद ठरले.
 यामध्ये पुरुष दुहेरीत त्याने ऑस्ट्रेलिया (2012), फ्रेंच

अनुसूचीत जाती व जमाती कायदा : 1989

अनुसूचीत जाती व जमाती कायदा : 1989

अनुसूचित जाती व जमाती (कायदा 1989 ) - (भाग 1) (अत्याचार प्रतिबंधक)
या कायद्यात एकूण कलमे 23 आहेत
  • कायदा - 1989
                      युनोने मानवी हक्क जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर आणि भारताला स्वातंत्र्य मिळून चार दशके झाल्यावर आपल्याला अनुसूचित जाती- जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा 1989 आपल्या देशबांधवांसाठी करावा लागला या कायद्यान्वये त्यांना त्यांच्याविरुद्ध होणारे गुन्हे, अपमान,छळ आणि बदनामी यापासून संरक्षण मिळाले, राज्यघटनेच्या प्रस्तावनेत उल्लेख केलेल्या सर्वांना न्याय आणि आत्मसन्मान या संकल्पने बाबतीत आपण अपयशी ठरलो.
  • उद्दिष्टे -
अनुसूचीत जाती आणि जमतीतील व्यक्तींवर होणारे अत्याचार व त्यांच्याविरुद्ध होणारे गुन्हे थांबविणे. अशा गुन्ह्यांसाठी विशिष्ट न्यायालयांची तरतूद करणे. अशा गुन्ह्यांना बळी पडलेलयांना मदत देने व त्यांचे पुनर्वसन करणे.
  • भाग - 1  प्रारंभिक
1) या कायद्याला अनुसूचीत जाती व अनुसूचीत जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा 1989 असे संबोधण्यात येईल .
2) याचा विस्तार जम्मू-काश्मीर सोडून संपूर्ण भारतभर असेल.