Post views: counter

लोकसभा

लोकसभा 


                        लोकसभेची निर्मिती ब्रिटन आणि कॅनडाच्या कॉमन सभागृहाच्या धर्तीवर करण्यात आली आहे. सभासदांची संख्या : घटनेच्या 81 व्या कलमामध्ये लोकसभेच्या सभासदांची संख्या निर्धारित करण्यात आली आहे. 1974 च्या 31 व्या घटनादुरुस्तीनुसार घटकराज्यांच्या सभासदांची संख्या 525 तर केंद्रशासीत प्रदेशांची सभासद संख्या 20 इतकी करण्यात आली आहे. परंतु लोकसभेत जास्तीत जास्त 552 इतके सभासद सांगितले आहेत. त्यामध्ये 530 घटकराज्य. 20 केंद्रशासीत प्रदेश

नद्या व उपनद्या :


१) गोदावरी :-
• उजव्या तिराने :- दारणा, प्रवरा, मुळा, बोरा, सिंदफणा, (बिंदुसरा), कुंडलिका, सरस्वती.
• डाव्या तिराने :- कादवा, शिवना, खाम, खेळणा

२) भीमा नदी :-
• उजव्या तिराने :- भामा, इंद्रायणी, मुळा-मुठा, पवना, वेळ, क-हा, नीरा, माण, बोर.
• डाव्या तिराने :- कुकडी, पुष्पावती, मीना, घोड, भोगावती, बोर

३) कृष्णा नदी :- 
• गोदावरी & कावेरी यादरम्यानची प्रमुख नदी.
• उगम : धोम - महाबळेश्वर.
• उजव्या तिराने :- कोयना, वारणा, पंचगंगा [कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती व सरस्वती (गुप्त)], दुधगंगा, वेदगंगा, घटप्रभा, ताम्रपणी..
• डाव्या तिराने :- येरळा, नंदला, अग्रणी

पुणे करार

पुणे करार 



                    विधिमंडळातील अस्पृश्यांच्या राखीव जागांसंबंधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व म. गांधी यांच्यात २४ सप्टेंबर १९३२ रोजी झालेला करार. १९३१ च्या अखेरीस झालेल्या दुसऱ्या गोलमेज परिषदेत अल्पसंख्यांकांच्या प्रतिनिधित्वाचा विचार झाला . मुसलमान व शीख यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याचे आधीच मान्य झाले होते. मुसलमान वगळता उरलेल्या सवर्ण हिंदूंकरवी अस्पृश्यांना योग्य प्रतिनिधित्व व रास्त राजकीय हक्क मिळणे अशक्य वाटल्यावरुन डॉ. आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या राखीव जागांचा व विभक्त मतदारसंघाचा आग्रह धरला. म. गांधींनी त्यास विरोध केला. याचा निर्णय ब्रिटिश पंतप्रधान जेम्स मॅकडोनल्ड यांच्याकडे सोपविण्यात आला.

Post views: counter

काश्मिर : जागतिक गुंता

काश्मिर-केंद्री जागतिक गुंता






                           पूर्वी ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे अमेरिका २०१४ च्या अखेरीला अफगाणिस्तानातून माघारी जाणार असेल, तर तिथपासूनच्या २४ तासांत भारतामध्ये दहशतवादाचा स्फोट होईल. त्याचं दहशतवाद्यांकडून सांगितलं जाणारं कारण आणि केंद्रस्थान सुद्धा, काश्मिर असेल. हे १९८९ मध्ये घडलंय. त्याच्या आधी १० वर्षं अफगाणिस्तानात, आता निवर्तलेल्या सोव्हिएत रशियाचं सैन्य होतं. शीतयुद्धाच्या डावपेचाचा अटळ भाग म्हणून अमेरिकेनं सोव्हिएतविरोधी मुजाहिदीन उचलून धरले, पाकिस्तानद्वारा त्यांना पैसा, प्रशिक्षण, शस्त्रास्त्रं, दारूगोळा पुरवला. (ते सर्व सातत्यानं भारताविरुद्ध सुद्धा वापरलं गेलं.) तालिबानची स्थापना अमेरिकेच्या देखरेखीखाली आणि आधी झिया-उल्- हक् अन् नंतर बेनझीर भुट्टोंच्या सूत्रसंचालनानुसार झाली. झिया-उल्- हक् यांच्या कारकीर्दीपासून (१९७८ पासून) पाकिस्तानचं, ऐतिहासिक- सैद्धांतिक दृष्ट्या, जवळजवळ अपरिहार्य म्हणावं-असं ‘तालिबानीकरण’ही तेव्हापासूनच झालं. मग सोव्हिएत रशियाचा दूरदर्शी पण यथावकाश अपयशी ठरलेला अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यानं अफगाणिस्तानातून सोव्हिएत सैन्य मागे घेण्याचं वेळापत्रक

भारतीय राज्यपद्धती : महत्त्वाचे आयोग


                           स्पर्धा परीक्षा एमपीएससीची असो किंवा यूपीएससीची भारतीय राज्यपद्धती व प्रशासन हा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. यूपीएससीच्या दोन (सी-सॅट) परीक्षेत या घटकावर सुमारे २५ ते ३० प्रश्न विचारले होते. जर राज्यसेवेचा विचार केला तर राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेत सामान्य अध्ययनाचा पेपर-२ याच घटकावरन आहे.

                        भारतीय राज्यपद्धतीचा अभ्यास करताना सर्वप्रथम राज्यघटना व्यवस्थित समजून घ्यावी, राज्यघटनेचा अभ्यास करताना ब्रिटिशकालीन महत्त्वाचे कायदे समजून घ्यावेत. उदा. रेग्युलेटिंग अॅक्ट-१७७३, पीट्स कायदा-१७८४, चार्टर अॅक्ट-१८१७, चार्टर अॅक्ट-१८५३ इ. याशिवाय १९०९ चा मोल्रे-िमटो, १९१९चा मॉटेग्यू चेम्सफर्ड कायदा, १९३५चा भारतसरकारचा कायदा. याशिवाय भारतीय राज्यघटनेची निर्मिती, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्व, केंद्रीय कायदे मंडळ ज्यात भारतीय संसद, लोकसभा, राज्यसभा, भारतीय संसदेचे अधिकार, तसेच केंद्रीय कायदे मंडळात- राष्ट्रपती त्यांची निवडप्रक्रिया, पात्रता, त्यांचे अधिकार, उपराष्ट्रपती यांचा अभ्यास करावा.

महत्वाच्या घटना दुरुस्त्या


पहिली घटनादुरुस्ती (इ.स. १९५१) -  
भारतीय राज्यघटनेत इ.स. १९५१ मध्ये पहिली दुरुस्ती करण्यात आली. घटनेतील पहिली दुरुस्ती एवढय़ापुरतेच तिचे महत्त्व मर्यादित नाही. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या काही निकालांमुळे जमीन सुधारणाविषयक कायद्यांच्या अंमलबजावणीच्या मार्गात काही अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्या दूर करणे हा या घटनादुरुस्तीचा मुख्य उद्देश होता. पहिल्या घटनादुरुस्तीने राज्य घटनेच्या १९ व्या कलमात बदल करण्यात आले. त्यानुसार भाषण स्वातंत्र्य व अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांवर काही नवे र्निबध लादण्यात आले; तसेच या दुरुस्तीने राज्यघटनेत ३१-अ आणि ३१-ब ही दोन नवी कलमे जोडण्यात आली.

सातवी घटनादुरुस्ती (इ.स. १९५६) - 
भाषावर प्रांतरचना करण्याचा निर्णय झाल्यानंतर राज्यपुनर्रचनेची योजना अंमलात आणण्यासाठी इ.स. १९५६ मध्ये ही घटनादुरुस्ती करण्यात आली. इ.स. १९५६च्या राज्य पुनर्रचना कायद्याबरोबरच ही घटनादुरुस्तीही संमत केली गेली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतीय संघराज्यातील राज्यांचे 'अ', 'ब' आणि 'क' अशा तीन प्रकारांत किंवा गटांत वर्गीकरण करण्यात आले होते. या घटनादुरुस्तीने हे वर्गीकरण रद्द ठरविण्यात आले आणि संघराज्यातील सर्व घटकराज्यांना समान दर्जा देण्यात आला. याशिवाय काही केंद्रशासित (संघ)प्रदेश निर्माण करण्यात आले. सातव्या घटनादुरुस्तीनंतर अस्तित्वात आलेल्या घटकराज्यांची व केंद्रशासित प्रदेशांची संख्या अनुक्रमे १४ व ६ इतकी झाली. या घटनादुरुस्तीने आणखीही काही महत्त्वाचे बदल घडवून आणले. घटकराज्यांच्या विधानसभेची सभासद संख्या जास्तीत जास्त ५०० व कमीत कमी ६० इतकी असेल अशी व्यवस्था करण्यात आली. दोन किंवा अधिक घटकराज्यांसाठी एकाच राज्यपालाची नियुक्ती करणे, दोन किंवा अधिक घटकराज्यांसाठी एकाच उच्च न्यायालयाची स्थापना करणे, भाषिक अल्पसंख्यांकाना संरक्षण मिळवून देण्याविषयीची व्यवस्था करणे यांसारख्या तरतुदीही या घटनादुरुस्तीअन्वये करण्यात आल्या.

हायड्रोजन

हायड्रोजन 
उदजन → He

उदजन (हायड्रोजन) (अणुक्रमांक: १) 

हे एक रासायनिक मूलद्रव्य आहे. रसायनशास्त्रात उदजन H ह्या चिन्हाने दर्शवितात. सामान्य तापमानाला आणि दाबाला उदजन वायुरूपात असतो. उदजन हा रंगहीन, गंधहीन, चवरहित व अतिशय ज्वलनशील वायू आहे. स्थिर स्वरूपात असताना उदजनचे रेणू प्रत्येकी २ अणूंनी बनलेले असतात. १.००७९४ ग्रॅ/मोल एवढा अणुभार असणारे उदजन हे सर्वांत हलके मूलद्रव्य आहे. उदजन हे विश्वात सर्वाधिक आढळणारे मूलद्रव्य आहे. विश्वात आढळणाऱ्या सर्व पदार्थांच्या वजनापैकी ७५ टक्के वजन उदजनचे आहे. विश्वातील बहुतेक ताऱ्यांमध्ये मुख्यत्वे उदजन हेच मूलद्रव्य प्लाज्मा ह्या स्वरूपात सापडते. पृथ्वीवर उदजन क्वचित मूलद्रव्य स्वरूपात आढळतो. उदजनचे औद्योगिकरीत्या उत्पादन मिथेनसारख्या कर्बोदकपासून केले जाते. बहूतकरून या मूलद्रव्य स्वरूपात तयार केलेल्या उदजनचा वापर संरक्षित पद्धतीने उत्पादनाच्या स्थळीच केला जातो. अशा उदजनचा वापर मुख्यत्वे खनिज- इंधनांच्या श्रेणीवाढीसाठी व अमोनियाच्या उत्पादनासाठी केला जातो. इलेक्ट्रॉलिसिस पद्धतीने पाण्यापासूनही उदजन तयार करता येतो, पण नैसर्गिक वायूपासून उदजन मिळवण्यापेक्षा ही पद्धत खूपच जास्त महाग पडते.

हेलियम

 हेलियम 


• नाव, चिन्ह, अणुक्रमांक- हेलियम, He, 2

दृश्यरू , परंगहीन वायू

रासायनिक श्रेणी निष्क्रीय वायू

• अणुभार- 4.002602ग्रॅ·मोल −१

• भौतिक गुणधर्म स्थिती- वायू

हेलियम हा एक रंगहीन, गंधहीन, चवरहीत, बिनविषारी, उदासीन वायू आहे. हेलियम हे २ अणूक्रमांकाचे रासायनिक मूलद्रव्य आहे.

हेलियमचा वितळण्याचा आणि वायूरूप होण्याचा बिंदु सर्व मूलद्रव्यात सर्वात कमी आहे. अतिशय पराकोटीच्या कमी तपमानाचा अपवाद सोडता हेलियम नेहेमी वायूरूपातच सापडतो.

लिथियम

 लिथियम 



• नाव, चिन्ह, अणुक्रमांक- लिथियम, Li, 3 दृश्यरूप

• रासायनिक श्रेणी- अल्कली धातू

• अणुभार- 6.941ग्रॅ·मोल −१

• भौतिक गुणधर्म-स्थिती- घन

(Li) ( अणुक्रमांक ३) अल्कली धातूरूप रासायनिक पदार्थ. ग्रीक भाषेतील शब्द लिथॉस म्हणजे दगड या अर्थाने या धातूस लिथियम नाव देण्यात आले आहे. १८१७ साली स्वीडिश रशायनशास्त्रज्ञ आर्फेडसन यांनी लिथियमचा शोध लावला. तर १८५५ साली जर्मन

बेरिलियम

 बेरिलियम 



• सर्वसाधारण गुणधर्म- दृश्यरूप

• अणुभार- ग्रॅ·मोल −१


(Be) (अणुक्रमांक ४) बेरिलियम (मराठीत बिडूर)हा एक असा धातू आहे की जो पाण्यात बुडत नाही, पोलादापेक्षाही ताकदवान आहे, रबरासारखा लवचिक, प्लॅटिनम सारखा कठीण आणि कायमचा टिकाऊ असे याचे गुण आहेत. उत्कृष्ट उष्णता वाहकता, उष्णता संचयनाची उच्च क्षमता आणि उष्णता रोधकता हे गुण बेरिलियमच्या अंगी असल्याने याचा वापर अवकाश अभियांत्रिकीत शक्य झाला. बेरिलियमपासून तयार होणारे भाग आपली तंतोतंत घडण आणि काटेकोर आकार
Post views: counter

कोयना धरण

कोयना धरण



•प्रवाह- कोयना नदी

•स्थान -कोयनानगर , पाटण, सातारा जिल्ह,महाराष्ट्र

•सरासरी वार्षिक पाऊस- ५००० मि.मी.

•लांबी -८०७.७२ मी

•उंची -१०३.०२ मी

•बांधकाम सुरू -१९५४-१९६७

•ओलिताखालील क्षेत्रफळ १२१०० हेक्टर

•जलाशयाची माहिती

निर्मित जलाशय शिवसागर जलाशय 

•क्षमता- २७९७.४ दशलक्ष घन

कोयना धरण हे कोयना नदीवर असलेले महाराष्ट्रातील सर्वांत मोठे धरण आहे.

•धरणाची माहिती-

SAARC सार्क




सार्क : हे साउथ एशिअन असोशिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन चे संक्षिप्त रूप


स्थापना८ डिसेंबर १९८५
मुख्यालयकाठमांडू, नेपाळ
सदस्यता
अधिकृत भाषाइंग्लिश
सरचिटणीसअर्जुन बहादुर थापा(डिसेंबर २०१५ )
संकल्पना :
बांगलादेशाचे राष्ट्राध्यक्ष झिया उर रहमान यांनी 1977 मध्ये मांडली.


सार्कची पहिली बैठक : 
ढाका ,1985 सुरुवातीस 7 सदस्य राष्ट्रे होती. : भारत , पाकिस्तान , बांगलादेश, नेपाळ , मालदीव , श्रीलंका ,भूतान अफगाणिस्तान चा समावेश 13 नोव्हेंबर 2005 रोजी झाला . 

तात्या टोपे

तात्या टोपे 


  • नाव : रामचंद्र पांडुरंग टोपेटोपणनाव: तात्या टोपे
  • जन्म: १८१४ येवला ( नाशिक)
  • मृत्यू: एप्रिल १८, १८५९ शिवपुरी, मध्य प्रदेश
  • चळवळ: १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध
  • धर्म: हिंदू
  • वडील: पांडुरंगराव टोपे
  • आई: रखमाबाई


रामचंद्र पांडुरंग टोपे ऊर्फ तात्या टोपे (१८१४ - एप्रिल १८ , १८५९ ) हे १८५७ च्या उठावामधील सेनानी होते.

जीवन-१८१४ मध्ये नाशिक जिल्ह्यातील येवल्यातला त्यांचा जन्म. पांडुरंग टोपे यांच्या आठ अपत्यांपैकी तात्या हे दुसरे अपत्य. त्यांचे मूळ नाव रघुनाथ. त्यांचे नाव रामचंद्र असेही

शिवराम हरी राजगुरू

शिवराम हरी राजगुरू 


  • जन्म: ऑगस्ट २४, इ.स. १९०८ राजगुरूनगर , पुणे जिल्हा , महाराष्ट्र, भारत
  • मृत्यू: मार्च २३, १९३१ लाहोर, पंजाब
  • चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा
  • संघटना: हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन
  • धर्म: हिंदू 

शिवराम हरी राजगुरू (ऑगस्ट २४, इ.स. १९०८; खेड, महाराष्ट्र - मार्च २३, १९३१ ; लाहोर, पंजाब ) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यात हौतात्म्य पत्करलेले क्रांतिकारक होते. ते हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी या संघटनेच्या क्रांतिकार्यात सहभागी झाले होते.

अनंत कान्हेरे

अनंत कान्हेरे 




  • जन्म: इ.स. १८९१
  • मृत्यू: एप्रिल १९, इ.स. १९१० ठाणे , महाराष्ट्र, भारत (फाशी)
  • चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा
  • संघटना: अभिनव भारत
  • धर्म: हिंदू
  • प्रभाव: विनायक दामोदर सावरकर
  • वडील:लक्ष्मण कान्हेरे


अनंत लक्ष्मण कान्हेरे (इ.स. १८९१ ; आयनी मेटे, रत्नागिरी जिल्हा , महाराष्ट्र - एप्रिल १९, इ.स. १९१०; ठाणे , महाराष्ट्र) हा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक सशस्त्र क्रांतिकारक होता. तो इ.स. १८९९ साली गणेश दामोदर सावरकर आणि विनायक दामोदर सावरकर यांच्या

खुदीराम बोस

खुदीराम बोस 




भारतातील सर्वात तरूण वयाचा क्रांतीकारक म्हणून ओळखला जाणारा हा वीर वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी शहीद झाला. त्याचा जन्म बंगाल मधल्या मेदिनीपूर जिल्ह्यातल्या बहुवेनी या गावात दि. ३ डिसेंबर १८८९ ला झाला. त्याच्या लहानपणीच आई (लक्ष्मीप्रियादेवी) आणि वडील (त्रैलोक्यनाथ) यांचा मृत्यु झाल्याने त्याची मोठी बहीण अनुरूपादेवी आणि तिचे पती अमृतलाल यांनी पालनपोषण केले.

गोदावरी नदी

गोदावरी नदी 




  • उगम- त्र्यंबकेश्वर १,६२० मी.
  • मुख- काकिनाडा (बंगालचा उपसागर )
  • लांबी- १,४६५ कि.मी.
  • देश- महाराष्ट्र, कर्नाटक , आंध्रप्रदेश ,मध्य प्रदेश, ओरिसा
  • उपनद्या- इंद्रावती , मंजिरा, बिंदुसरा
  • सरासरी प्रवाह- ३,५०५ मी³ /से
  • पाणलोट क्षेत्र- ३,१९,८१० किमी²
  • धरण- गंगापूर (नाशिक ), नांदूर मधमेश्वर ( नाशिक ), डौलेश्वरम



गोदावरी नदीची गणना भारतातील प्रमुख नद्यांमध्ये केली जाते. गोदावरी नदीची लांबी १,४५० किलोमीटर (९०० मैल) आहे. गोदावरीचा उगम नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर या ठिकाणी महाराष्ट्र राज्यात होतो. साधारणत: आग्नेय दिशेला वाहून गोदावरी राजमहेंद्रीजवळ बंगालच्या

नर्मदा नदी

नर्मदा नदी 




  • उगम-अमरकंटक ९०० मी.
  • मुख-अरबी समुद्र
  • लांबी-१,३१२ कि.मी.
  • देश-भारत ( मध्य प्रदेश , महाराष्ट्र, गुजरात)
  • पाणलोट क्षेत्र-१,००,००० किमी²
  • धरण-सरदार सरोवर धरण(केवडिया कॉलोनी)



नर्मदा नदी भारतातील प्रमुख नद्यांपैकी एक आहे. ही नदी भारताच्या मध्य प्रदेश (१०७७ कि.मी) , महाराष्ट्र (७६ कि.मी), गुजरात (१०० कि.मी.) या राज्यांतून वाहते. नर्मदा भारतीय उपखंडातील पाचव्या क्रमांकाची मोठी नदी असून सर्वांत मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे. नर्मदेला रेवा असेही एक नाव आहे. (इतर पश्चिम वाहिनी मोठ्या नद्या: तापी व मही).

पंचगंगा नदी

पंचगंगा नदी



  • उगम- प्रयाग संगम, चिखली, करवीर तालुका,कोल्हापूर.
  • मुख- नृसिंहवाडी (कृष्णा नदी)
  • लांबी- ८०.७ कि.मी.
  • देश- महाराष्ट्र
  • उपनद्या- कासारी , कुंभी , तुळशी , भोगावती
  • या नदीस मिळते- कृष्णा नदी


पंचगंगा नदी पश्चिम महाराष्ट्रातून जाणारी महत्त्वाची नदी आहे. पाच उपनद्यांच्या संगमापासून तयार झाल्याच्या दंतकथेनुसार पंचगंगा असे नाव पडले आहे.

स्रोत-पंचगंगा नदी कोल्हापूर शहराच्या सीमेवरून वाहते, ती प्रयाग संगमावरून ( चिखली गाव, करवीर तालुका ) ती सुरू होते. कुंभी, कासारी, तुळशी, आणि भोगावती

तापी नदी

तापी नदी



  • अन्य नावे -ताप्ती
  • उगम- मुलताईजवळ ७४९ मी.
  • मुख - अरबी समुद्र
  • लांबी- ७२४ कि.मी. कि.मी.
  • देश- मध्य प्रदेश , महाराष्ट्र , गुजरात
  • उपनद्या- पूर्णा, गिरणा नदी , वाघूर
  • पाणलोट क्षेत्र- ६५,१४५ किमी²


•धरण -
उकाई धरण, काकरापार धरण, हतनूर धरण तापी नदी ही भारताच्या पश्चिम भागातून वाहणारी नदी आहे. ही 'पश्चिमवाहिनी' नदी भारताच्या मध्य प्रदेश , महाराष्ट्र व गुजरात या राज्यांमधून वाहते. तापीच्या खोऱ्यात मध्यप्रदेशातील बेतुल जिल्हा , महाराष्ट्रातील विदर्भाचा पुर्व भाग, खानदेश , व गुजराथेतील सुरत जिल्हा समाविष्ट आहे.

गंगा नदी

गंगा नदी 




गंगा ही उत्तर भारतातील नदी जगातील सर्वात मोठ्या नद्यांपैकी एक आहे. गंगेचा उगम हिमालयात भागीरथीच्या रूपात गंगोत्री हिमनदीत उत्तराखंडमध्ये होतो. नंतर ती देवप्रयाग जवळ अलकनंदा नदीला मिळते. यानंतर गंगा उत्तर भारताच्या विशाल पठारावरून वाहत बंगालच्या उपसागराला बऱ्याच शाखांमध्ये विभाजित होऊन मिळते. यामध्ये एक शाखा हुगळी नदी आहे जी कोलकाता जवळून वाहते, दुसरी शाखा पद्मा नदी बांगलादेशात प्रवेश करते. गंगा नदीची पूर्ण लांबी जवळजवळ २५०७ किलोमीटर आहे.

प्रवरा नदी

प्रवरा नदी




  • अन्य नावे - अमृतवाहिनी
  • उगम- रतनगड ८५२ मी.
  • मुख- रत्नाबाईची गुहा
  • लांबी- २०० कि.मी.
  • देश - महाराष्ट्र
  • उपनद्या- मुळा, आढळा, म्हाळुंगी


प्रवरा ही महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातून उगम पावणारी नदी आहे. हिला मुळा , आढळा, म्हाळुंगी या उपनद्या असून ही नदी पुढे गोदावरीला जाऊन मिळते.

नवेगाव राष्ट्रीय उद्यान

नवेगाव राष्ट्रीय उद्यान 



हे महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रीय उद्यान आहे.

जंगलाचा प्रकार-
हे जंगल मुख्यत्वे मध्य भारतीय पानगळी प्रकारात मोडते. ऐन, हळदू, कलाम धावडा, बीजा, साग, सूर्या अशा प्रकारची झाडे या अरण्यात आढळतात.

भौगोलिक-उद्यानाचा मुख्य भाग हा डोंगराळ आहे डोंगराच्या पायथ्याशी नवेगाव नावाच्या तळ्याने वेढलेले आहे. इटिडोह धरण आणि नवेगाव बांध तलाव असे दोन मोठे जलाशय येथे आहेत. या जंगलाचा विस्तार सुमारे १३४ चौरस किलोमीटर आहे. माधव झरी, राणी डोह, कामझरी, टेलनझरी, अंगेझरी, शृंगार बोडी हे झरे आणि पाणसाठी येथे आहेत. हा विभाग पाणथळ आणि दलदल असलेला आहे.

Post views: counter

भारतीय प्रमाणवेळ



भारताची प्रमाण-वेळ ही वेळ युनिव्हर्सल कोऑर्डिनेटेड टाइमपेक्षा ५ तास ३० मिनिटे पुढे आहे. संपूर्ण वर्षाकरीता हा फरक स्थायी आहे. ही वेळ अलाहाबाद वेधशाळेत मोजली जाते. इतर देशांप्रमाणे ॠतूनुसारया वेळेत बदल केला जात नाही. पण १९६२ च्या चीन युद्धावेळी आणि १९६५ व १९७१ च्या पाकिस्तान युद्धांमध्ये असा बदल करण्यात आला होता.

भारताचे स्थान

भारताचे स्थान

भारत पूर्व गोलार्धात मध्यवर्ती स्थानी आहे, तर दुस– या प्रकारे तोउत्तर गोलार्धात येतो. भारताच्याप्रचंड आकारामुळे त्यास उपखंड म्हणतात. भारतीय उपखंडात भारत, मालदिव, पाकिस्थान भुतान, नेपाळ, बांग्लादेश व श्रीलंका यांचा समावेश होतो. भारताची मुख्य भुमी आशिया खंडाच्या दक्षिणेस ८ ० ४ उ. ते ३७ ० ६ उ. अक्षांश ६८ ० ७ पू. ते ९७ ० २५ पू. रेखावृत्तापर्यंत पसरलेली आहे. भारताचे अति दक्षिणेचे टोक म्हणजे इंदिरा पॉइंट ( ग्रेट निकोबार ) ६ ० ३० उत्तर अक्ष वृत्तावर आहे. कर्कवृत्त भारताच्या मध्यातून जाते. ( गुजरात, राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेश, झारखंड, प. बंगाल, त्रिपूरा, व मिझोराम ) भारताचे दक्षिण टोक विषुववृत्तापासुन ८७५ कि.मी. अंतरावर आहे. भारताची पूर्व – पश्चिम लांबी २९३३ कि.मी. असून उत्तर दक्षिण लांबी ३२१४ कि.मी. इतकी आहे.

अरवली पर्वतरांग

अरवली पर्वतरांग 




अरवल्ली पर्वतरांग ही पश्चिम भारतातील एक पर्वतरांग आहे. ही रांग मुख्यत्वे उत्तर गुजरात, राजस्थानच्या पूर्व भागात व मध्य प्रदेशाच्या पश्चिम भागात पसरली आहे. 

• भूविज्ञान-जगातील सर्वात प्राचीन पर्वतांमध्ये अरावलीचा समावेश होतो त्यामुळे भूवैज्ञानिक दृष्ट्या पर्वत महत्त्वाचा आहे. अंदाजे ६० कोटी वर्षांपूर्वी या पर्वताची जडणघडण झाली. राजस्थान आणि गुजरातच्या सीमेवरील माउंट अबू (उंची १७२० मी) हे या पर्वतरांगेतील सर्वोच्च ठिकाण आहे व ते थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते.

चांदोली राष्ट्रीय उद्यान

चांदोली राष्ट्रीय उद्यान 


महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील हे राष्ट्रीय उद्यान आहे. २००४ मध्ये याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळाला. चांदोली धरणाच्या तलावात नावेतूनही जंगल फिरता येते.दुर्गवाडीच्या उतरून पायी भटकता येते.दुर्गवाडीच्या डोंगरावरून चांदोली जलाशयाचा परिसर दिसतो.

• स्थान-सांगली जिल्ह्यात ३२ शिराळा तालुक्यात वारणा नदीवर\ चांदोली धरण आहे.त्याच्या पाणलोट क्षेत्रात चांदोली अभयारण्य आहे

• स्थापना- 

या अभयारण्याची स्थापना १९८५ साली झाली.

वाळवंट

 वाळवंट

  

वाळवंट हे अनेक भौगोलिक रचनांपैकी एक असून पृथ्वीचा बराच भूभाग वाळवंटांनी व्यापला आहे. तथापिवाळवंट हा शब्द केवळ वाळूने व्यापलेल्या प्रदेशालाच लागू होत नाही तर इतर काही भौगोलिक रचनादेखील वाळवंट या संज्ञेत येतात.

प्रकार- वाळवंटांची दोन मुख्य प्रकारांमध्ये विभागणी करता येते.
उष्ण वाळवंटे व शीत वाळवंटे 


वाळूने व्यापलेला प्रदेश ही व्याख्या केवळ उष्ण वाळवंटांसाठीच लागू होते. नावाप्रमाणे उष्ण वाळवंटातील तापमान अतिउष्ण ते शीत या पट्ट्यात येते.

• वैशिष्ट्ये - सर्वसाधारणपणे उष्ण वाळवंटाची पुढील वैशिष्टे सांगता येतील.

• भौगोलिक वैशिष्ट्ये-

  1. वाळूने व्यापलेला प्रदेश. वाळूच्या टेकड्या आणि त्यावरील वैशिष्ट्यपूर्ण अशा वळ्या
  2. हवेतील बाष्पाचे आणि जमिनीतील आर्द्रतेचे अत्यल्प प्रमाण
  3. वर्षभरातील पावसाची अत्यल्प सरासरी

नदी

 नदी 



नैसर्गिक पाण्याच्या रुंद प्रवाहाला नदी असे म्हणतात. नदीचा उगम हा तलाव , मोठा झरा, अनेक छोटे झरे एकत्रित येऊन किंवा बर्फाच्छादित पर्वतापासून होतो.

जगातील सर्वांत जास्त लांबीच्या १० नद्या पुढीलप्रमाणे आहेत.

  1. नाईल नदी ( ६,६९० कि.मी.)
  2. अॅमेझॉन नदी ( ६,४५२ कि.मी.)
  3. मिसिसिपी नदी- मिसूरी नदी ( ६,२७०कि.मी.)
  4. यांगत्झे नदी (चँग जिआंग ) ( ६,२४५ कि.मी.)
  5. येनिसे आंगारा नदी ( ५,५५० कि.मी.)
  6. ह्वांग हो नदी ( ५,५६४ कि.मी.)
  7. ऑब ईर्तीश नदी ( ५,४१० कि.मी.)
  8. आमूर नदी ( ४,४१० कि.मी.)
  9. काँगो नदी ( ४,३८० कि.मी.)
Post views: counter

एमपीएससी पेपर-१ : घटक पर्यावरण


पर्यावरणशास्त्र घटकाची तयारी




                           सामान्य क्षमता चाचणी पेपर १च्या दिलेल्या अभ्यासक्रमातील भाग- ६ म्हणजेच पर्यावरणशास्त्र. 



एमपीएससी राज्यसेवा पूर्व पेपर-१ ची तयारी

एमपीएससी राज्यसेवा पूर्व पेपर-१ ची तयारी 

डेल कारनेजीचे एक वाक्य खूपच छान आहे. तो म्हणाला होता,

'जगातील उत्तुंग यश त्यांनाच मिळाले, ज्यांना ते यश
मिळण्याची अजिबात शक्यता नसतानादेखील
यशासाठी त्यांनी प्रयत्न सुरू ठेवले.'

स्पर्धापरीक्षा म्हटली की, यश-अपयश, नराश्य हे आलेच. स्पर्धापरीक्षा हा एक कैफ आहे. यश मिळालं नाही तोपर्यंत किंवा अपयशी होऊन वयोमर्यादा संपत नाही, तोपर्यंत हा कैफ उतरत नाही.

 पूर्वपरीक्षेसाठी दोन पेपर असतील. त्यापकी पेपर पहिला हा सामान्य अध्ययनाचा असेल. सामान्य अध्ययनाचा सविस्तर अभ्यासक्रम आयोगाने दिला नाही. मात्र हा अभ्यासक्रम यू.पी.एस.सी.च्या पेपर-१मधील अभ्यासक्रमासारखाच आहे. हा बदल भविष्याच्या दृष्टीने नक्कीच चांगला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जो अभ्यासक्रम जाहीर केला आहे. तो खालीलप्रमाणे-

MPSC Prelim Paper घटक ३-महाराष्ट्राचा भूगोल




                      जर एम.पी.एस.सी. व यू.पी.एस.सी या दोन्ही परीक्षेच्या दृष्टीने बघितल्यास भूगोल हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे.गेल्या दोन वर्षांतील परीक्षेचा अभ्यास केल्यास, असे लक्षात येते की, या घटकावर साधारण 15ते 17प्रश्न विचारले होते. एम.पी.एस.सी.च्या नवीन अभ्यासक्रमात (जो अभ्यासक्रम 'यूपीएससी'सारखाच आहे.) काही बदल करण्यात आले आहेत.

                     उदा. नवीन अभ्यासक्रमात जगाचा भूगोल हा नव्याने समाविष्ट केलेला घटक आहे. जुन्या अभ्यासक्रमानुसार जर कृषिशास्त्राचाही विचार केला तर या भागावर जवळजवळ ३५ ते ४० प्रश्न विचारले जात असत, आपण पीएसआय / एसटीआय / असिस्टंट पूर्व या परीक्षांचाही विचार केला तर या घटकावर साधारणत: 15ते 17प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र लोक सेवा आयोग



महाराष्ट्र लोक सेवा आयोग 


MAHARASHTRA PUBLIC SERVICE COMMISSION




महाराष्ट्र राज्य/ शासनाच्या प्रशासकीय सेवेमध्ये जाण्याकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध स्पर्धा परीक्षा घेण्यात येतात. भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 नुसार 'महाराष्ट्र लोक सेवा आयोग' निर्माण केला असून घटनेच्या कलम 320 नुसार सेवकभरती व त्यासंबंधी सल्ला देण्याचे कार्य आयोगातर्फे होते.

• महाराष्ट्रामध्ये ' महाराष्ट्र लोक सेवा आयोग' १ मे १९६० रोजी स्थापन करण्यात आला.

महाराष्ट्र लोक सेवा आयोगातर्फे विविध सेवाकारिता भरती परीक्षा घेण्यात येते.
Post views: counter

आफ्रिका खंड Africa



राज्य सेवा पूर्वपरीक्षेच्या पेपर -१ मधील अभ्यासक्रमांत भूगोल या घटकाअंतर्गत भारताचा, महाराष्ट्राचा व जगाचा भूगोल अंतर्भूत केला आहे. जगाचा भूगोल अभ्यासताना अॅॅटलास (नकाशा) सोबत असणे आवश्यक आहे. एखादा भाग पाठांतर करण्यापेक्षा तो नकाशात कुठे आहे हे जर शोधले तर अभ्यास लवकर लक्षात राहील व अभ्यास मनोरंजक होईल. भूगोलाचे काही प्रश्न सरळ नकाशावर विचारले जातात, म्हणून नकाशावाचन करण्याची सवय असेल तर असे प्रश्न सोडवणे जास्त सोपे जाते.


आफ्रिका खंड 


  1. जगातील प्राचीन संस्कृतीपकी इजिप्शियन संस्कृतीचा विकास या खंडात झाला.
  2. प्राकृतिक रचना - या खंडाच्या वायव्येस अॅटलास पर्वत आहे.
  3. अॅटलास पर्वत व इथियोपियाचे पठार यांच्या दरम्यान सहारा वाळवंट पसरलेले आहे.
  4. या खंडाच्या मध्यभागी कांगो नदीचे विशाल खोरे आहे.
  5. या खंडाच्या पूर्व भागात दक्षिणोत्तर पसरलेली सुमारे ५००० कि.मी.ची खचदरी आहे. ही खचदरी झांबियामलावी, टांझानिया, केनिया व इथिओपियापासून तांबडय़ा समुद्रामाग्रे इस्रायल व जॉर्डन समुद्रापर्यंत पसरलेले आहेत.

सह्याद्री पश्चिम घाट


जागतिक वारसा

२००६ साली भारताने यूनेस्को कडे पश्चिम घाटाला जागतिक वारसा स्थानांमध्ये समाविष्ट करण्यासाठी विनंती केली आहे. यामध्ये एकंदर सात उपक्षेत्रे असतील.

  1. अगस्त्यमलाई उपक्षेत्र - यामध्ये अगस्त्यमलाई संरक्षित जैविक क्षेत्र (९०० वर्ग कि.मी.) ज्यामध्ये तमिळनाडूतील कलक्कड मुंडणथुराई व्याघ्र प्रकल्प (८०६ वर्ग कि.मी.) व नेय्यार अभयारण्य  , पेप्पारा तसेच शेंदुर्णीव त्याच्या आसपास असणारे आचेनकोईलचे क्षेत्र , थेन्मला, कोन्नी  , पुनलुर , तिरुवनंतपुरम आणि अगस्त्यवनम, केरळ यांचा समावेश आहे.
  2. पेरियार उपक्षेत्र - यामध्ये केरळमधील पेरियार राष्ट्रीय उद्यान (७७७ वर्ग कि.मी.), रान्नी , कोन्नी व आचनकोविल इथली जंगले. पूर्वेला श्रीविल्लीपुत्तुर अभयारण्य व तिरुनवेली इथली जंगले यांचा समावेश आहे.
  3. अनामलाई उपक्षेत्र - यामध्ये चिन्नार अभयारण्य , एराविकुलम राष्ट्रीय उद्यान (९० वर्ग कि.मी.), इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान, ग्रास हिल्स राष्ट्रीय उद्यान व करियन शोला राष्ट्रीय उद्यान (एकूण ९५८ वर्ग कि.मी.) तसेच तमिळनाडूमधील पलानी पर्वतरांग राष्ट्रीय उद्यान (७३६.८७ वर्ग कि.मी.) व केरळमधील परांबीकुलम अ भयारण्य (२८५ वर्ग कि.मी.) यांचा समावेश आहे. निलगिरी उपक्षेत्र - यामध्ये निलगिरी संरक्षित जैविक क्षेत्र तसेच करीम्पुझा राष्ट्रीय उद्यान (२३० वर्ग कि.मी.), सायलंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान (८९.५२ वर्ग कि.मी.) व केरळमधील वायनाड अभयारण्य (३४४ वर्ग कि.मी.) आणि तमिळनाडूमधील बंदीपूर राष्ट्रीय उद्यान (८७४ वर्ग कि.मी), मुकुर्थी राष्ट्रीय उद्यान (७८.४६ वर्ग कि.मी.), मुदुमलाई राष्ट्रीय उद्यान (३२१ वर्ग कि.मी.) तसेच अमरांबलमचे संरक्षित जंगल (६,००० वर्ग कि.मी.) यांचा समावेश आहे.

एम.पी.एस.सी. मुख्य परीक्षा - पेपर ३ ( मानव संसाधन विकास )




मानव संसाधन विकास या घटकाअंतर्गत आयोगाने लोकसंख्या हे स्वतंत्र प्रकरण नमूद केलेले आहे. परीक्षेच्या दृष्टीने हे महत्त्वाचे प्रकरण असून सर्वप्रथम २०१२च्या मुख्य परीक्षेत लोकसंख्या घटकावर कोणते प्रश्न विचारले आहेत, ते समजून घ्यावेत आणि अभ्यासाला सुरुवात करावी.

२०१२ च्या मुख्य परीक्षेत खालील प्रश्न विचारले गेले होते-

१) लोकसंख्या धोरण २००० नुसार कोणत्या वर्षांपर्यंत लोकसंख्या स्थिरीकरणाचे उद्दिष्ट साध्य होईल?
अ) २०३५ 

ब) २०४५
क) २०५५ 

ड) २०५०

२) लोकसंख्या अंदाज अहवाल २००१ नुसार खालीलपकी कोणत्या राज्यातील िलगगुणोत्तर २००१ च्या तुलनेत २०२६ मध्ये चांगले राहील?
अ) गुजरात 

ब) बिहार
क) राजस्थान 

ड) पंजाब

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ( International Monetary Fund )



आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ( International Monetary Fund ) … 


  • स्थापना - २७ डिसेंबर, १९४५
  • उद्देश्य - आंतरराष्ट्रीय व्यापारातील देवाण-घेवाणीत समतोल राखणे.
  • मुख्यालय - वॉशिंग्टन, डी.सी. , अमेरिका
  • अधिकृत भाषा - इंग्लिश , फ्रेंच आणि स्पॅनिश
  • व्यवस्थापकीय संचालक - क्रिस्टीन लेगार्ड( 2015 )

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (इंग्लिश International Monetary Fund लघुरूप IMF, आयएमएफ) ही सदस्य राष्ट्रांना मुख्यतः विनिमय दरावर आणि देवघेवींच्या ताळेबंदावर प्रभाव टाकणार्या बृहत-अर्थशास्त्रीय धोरणांबाबत पाठपुरावा करावयास लावून जागतिक वित्तीय

प्राकृतिक भूगोल

प्राकृतिक भूगोल 

पृथ्वीचे अंतरंग

पृथ्वीच्या अंतर्गत रचना जाणून घेण्याचा शास्त्रज्ञांनी आतापर्यंत जो प्रयत्न केला, त्यात प्रत्यक्ष माहितीपेक्षा अप्रत्यक्ष माहितीवर भर देण्यात आला. प्रत्यक्षात अंतरंगात जाऊन त्याची पाहणी करणे वा एखादे यंत्र पाठवून निरीक्षण करणे हे शक्य नाही, म्हणून भूगर्भशास्त्रज्ञांनी पुढील गोष्टींचा वा निरीक्षणांचा आधार घेऊन पृथ्वीचे अंतरंग स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला.

  • पृथ्वीच्या अंतरंगातील तापमान
  • पृथ्वीच्या अंतरंगातील दाब
  • पृथ्वीच्या अंतरंगातील घनता
  • ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर पडणारे पदार्थ
  • उल्कांच्या रचनेचा अभ्यास इ.

भूपृष्ठापासून भूकेंद्रापर्यंतचे अंतर ६३७१ कि.मी. आहे. भूपृष्ठापासून भूकेंद्रापर्यंत पृथ्वीच्या अंतरंगाच्या स्वरूपात बदल होत जातो. या बदलत्या गुणधर्मानुसार