Post views: counter

Current Affairs May 2016 Part - 2


  • आता स्थानिक संस्थांना जादा अधिकार :

केंद्र सरकार आणत असलेल्या नवीन बांधकाम नियमावलीमध्ये बांधकाम विषयक जादा अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात येणार असल्याचे केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी सांगितले.
 मुंबई महापालिकेच्या वतीने आयोजित व्यावसायिक सुलभता (ईज ऑफ डुइंग बिझनेस) अंतर्गत इमारत बांधकाम प्रस्ताव मंजुरीबाबतच्या कार्यशाळेत ते बोलत होते.
 मानवी हस्तक्षेप कमी केल्याशिवाय नागरिकांना चांगली सेवा देता येणार नाही.
 तसेच त्यामुळे मुंबई महापालिकेने इमारत बांधकाम परवानगीची प्रक्रि या पारदर्शक व सुलभ व्हावी, यासाठी ती संपूर्णपणे डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
 मुंबई महापालिकेने इमारत बांधकाम मंजुरीच्या प्रक्रियेत आणलेली सुलभीकरण हे देशाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल आहे, यामुळे कामामध्ये पारदर्शकता येण्यास मदत होईल.
 बांधकामांसाठी पर्यावरण, वन, ग्राहक संरक्षण, संरक्षण, नागरी वाहतूक मंत्रालय, रेल्वे मंत्रालय, उद्योग मंत्रालय आदी विविध विभागाच्या परवानग्या लागतात, त्या एकाच ठिकाणी व ऑनलाईन मिळाव्यात, यासाठी केंद्र शासन प्रयत्नशील आहे.
 नव्या नियमावलीमध्ये बांधकाम परवान्याचे काही अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात येणार आहेत, त्यामुळे प्रक्रिया सुलभ होऊन तीस दिवसाच्या आत परवाने मिळतील.
 तसेच अनिधकृत बांधकामास संबंधित अधिकाऱ्यास जबाबदार धरण्याची तरतूद करण्यात येणार आहे.
 महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी महापालिकेने बांधकाम मंजुरीच्या सुलभीकरणात केलेले बदल सांगितले.
  • स्टार्टअप गुगलने खरेदी केले ‘सिनर्जाइज’ :

वरुण मल्होत्रा या भारतीय वंशाच्या उद्योजकाने तयार केलेले ‘सिनर्जाइज’ हे टेक्नोलॉजी स्टार्टअप गुगलने खरेदी केले आहे.
 गुगलच्या विविध अॅपचा वापर कसा करावा, याचे प्रशिक्षण देण्यासाठी 2013 मध्ये त्यांनी ‘सिनर्जाइज’ तयार केले होते.
 
तसेच याबाबत अधिकृतपणे करार झाला असून या माध्यमातून गुगल अ‍ॅप्सचे प्रशिक्षण ग्राहकांना दिले जाईल.
 गुगल अ‍ॅप्सचा आभासी प्रशिक्षक म्हणून सिनर्जाइज कंपनीच्या सेवेचा वापर केला जाणार आहे.
 आवाज व टेक्स्ट यांच्या आंतर प्रतिसादात्मकतेचा उपयोग यात केला जाणार असून त्यांच्या मदतीने अ‍ॅपची निवड करता येईल.
 सिनर्जाइज आता गुगलचा भाग म्हणून काम करील व गुगल अ‍ॅप्सचा एकात्मिक भाग म्हणून ते वापरण्याचे प्रशिक्षणही दिले जाईल.
  • लंडनच्या महापौरपदी सादिक खान याची निवड :

लंडनच्या महापौरपदी सादिक खान यांच्या रुपात पहिल्यांदाच मुस्लिम व्यक्ती महापौर झाली आहे.
 पाकिस्तानी वंशाचे असलेले सादीक खान यांनी लेबर पक्षाच्या तिकीटावर लंडनच्या महापौरपदाची निवडणूक लढवली होती.
 इंग्लंड, स्कॉटलंड आणि वेल्समध्ये महापौर, विधिमंडळ आणि संसदीय निवडणुकांसाठी झालेल्या मतदानात त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी कंझर्व्हेटीव्ह पक्षाचे उमेदवार झॅक गोल्डस्मिथ यांचा दारुण पराभव केला.
 कंझर्व्हेटीव्ह यांनी हिंदू आणि शिख मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाचा वापर केला होता हे विशेष.
 लंडनच्या महापौरपदाची लढाई सर्वाधिक प्रतिष्ठेची मानली जाते.
 माजी मानवाधिकार कार्यकर्ते आणि 2005 पासून लेबर पक्षाचे खासदार असणारे सादीक खान (45) यांनी यंदाच्या निवडणुकीत बाजी मारती आहे.
 माजी पंतप्रधान गॉरडन ब्राऊन यांच्या सरकारमध्ये 2009-10 मध्ये सादीक खान वाहतूक मंत्री होते.
  • उत्तराखंडमध्ये होणार शक्तिपरीक्षा :

उत्तराखंडमध्ये मोदी सरकारने लादलेली राष्ट्रपती राजवट अखेर सर्वोच्च न्यायालयाने नाकारली असून (दि.10) रोजी विधानसभेत मुख्यमंत्री हरीश रावत यांना विश्वासदर्शक ठराव मांडून बहुमत सिद्ध करण्याचा आदेश दिला आहे.
 तसेच या मतदानाचा तपशील बंद लिफाफ्यात सर्वोच्च न्यायालयाकडे द्यावा लागणार असून नंतर 11 मे रोजी न्यायालय अंतिम निकाल देण्यात येईल.
 विश्वासदर्शक ठरावापुरतेच केवळ दोन तास राज्य विधानसभेचे अधिवेशन होईल, असे आदेशात नमूद करताना सर्वोच्च न्यायालयाने  विधानसभेच्या प्रधान सचिवांच्या देखरेखीखाली या संपूर्ण कामकाजाचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यासही सांगितले आहे.
 विश्वासदर्शक ठरावावर मतदान होईल त्या दोन तासांपुरती राज्यातील राष्ट्रपती राजवट स्थगित राहून राज्यपाल हे राज्याचे प्रभारी असतील, असा आदेश न्या. दीपक मिश्रा व न्या. शिवकीर्ती सिंग यांच्या खंडपीठाने दिला.
 तसेच या मतदानाचा निकाल आणि कार्यवाहीचा व्हिडीओ यासह सर्व दस्ताऐवज 11 मे रोजी बंद लिफाप्यात आपल्यासमोर ठेवावेत, असाही आदेश त्यांनी विधानसभेच्या प्रधान सचिवांना दिला.
  • इंग्लंडचा कसोटी कर्णधार अ‍ॅलेस्टर कूकची विश्वविक्रमाकडे वाटचाल :

जागतिक क्रिकेटमध्ये अनेक विश्वविक्रमांना गवसणी घातलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या सर्वात कमी वयात कसोटी क्रिकेटमध्ये 10 हजार धावा फटकावण्याचा विश्वविक्रम मोडण्यास इंग्लंडचा कसोटी कर्णधार अ‍ॅलेस्टर कूक सज्ज आहे.
 तसेच हा विश्वविक्रम रचण्यासाठी त्याला अवघ्या 36 धावांची आवश्यकता असून, ‘जर ही किमया केली तर ती आपल्यासाठी विशेष बाब असेल,’ असे मत कूकने व्यक्त केले आहे.
 कूक कसोटी क्रिकेटमध्ये वैयक्तिक 10 हजार धावांचा टप्पा पार करण्यासाठी 36 धावांनी दूर आहे.
 विशेष म्हणजे आगामी 19 मे पासून श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या मालिकेत तो हा कीर्तिमान नक्की रचू शकतो.
 त्याचबरोबर या विक्रमासह इंग्लंडकडून 10 हजार कसोटी धावा करणार पहिला फलंदाज म्हणूनही कूक ओळखला जाणार आहे.
  • *चलनविषयक धोरण समिती*

* ही समिती रिझर्व्ह बँकेचे बेंचमार्क व्याज दर आणि महागाई लक्ष्यनिश्चित करेल.
* ही समिती रिटेल चलनवाढ नियंत्रित करण्यासाठी व्याजदर सुद्धा ठरवेल.[ सद्य स्थिती ]
* सध्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आणि त्याच्या अंतर्गत समिती चे चलनविषयक धोरणावर पूर्ण नियंत्रण आहे.
* एक तांत्रिक सल्लागार समिती चलनविषयक धोरणा बाबत रिझर्व्ह बँकेला सल्ला देते.
* रिझर्व्ह बँकेला तांत्रिक सल्लागार समितीच्या शिफारसी स्वीकारणे बंधनकारक नाही आहे.
* चलनविषयक धोरण समिती या प्रणाली पुनर्स्थित करेल.[ रचना ]
* चलनविषयक धोरण समितीत सहा सदस्य असतील .
* त्यातील तीन सदस्य आरबीआय गव्हर्नर, चलनविषयक धोरणाचे प्रभारी डेप्युटी गव्हर्नर आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने नामांकित एका अधिकाऱ्याचा समावेश असेल.
* उर्वरित तीन सदस्य बाह्य निवड समिती द्वारा निवडले जातील.
* बाह्य निवड समितीत कॅबिनेट सचिव, आर्थिक व्यवहार खात्याचे सचिव, रिझर्व्ह बँक गव्हर्नरआणि अर्थशास्त्र किंवा बँकिंग क्षेत्रातीलतीन तज्ञ यांचा समावेश असेल.


  1. १) --------- योजनेचे उद्घाटन केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणी मध्य प्रदेश चे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ३० एप्रिल २०१६ रोजी केले: उजाला
  2. २) उत्तर प्रदेशमधील ------------ या] ठिकाणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने १ मे २०१६ रोजी उज्ज्वला या योजनेचा शुभारंभ केला: बलिया
  3. ३) मे २०१६ मध्ये -------------- हे राज्य जंगलात आग लागल्याने चर्चित आले :-उत्तराखंड
  4. ४) --------- या देशाशी हेलीकॉप्टार कंपनी ऑगस्टार वेस्टमलैंड संबंधित आहे : इटली
  5. ५) भारतीय नौसेने च्या -------------- या पाणबुडीचे 1 मे 2016 रोजी समुद्रात परीक्षण केले कलवरी
  6. ६) महाराष्ट्रातील पहिले आधेकृत इलेक्ट्रॉनिक कचरा गोळा करण्याचे केंद्र----------------- येथे सुरु झाले? :-अंधेरी
  7. ७) क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी -------------ची शिफारस करण्यात आली आहे :- विराट कोहली
  8. ८) एस अगेन्स्ट ऑडस " हे आत्मचरित्र ------------------- या खेळाडूचे आहे :-सानिया मिर्झा
  9. ९) 2015-16 याआर्थिक वर्षात रोजगारनिर्मितीत महाराष्ट्राचा क्रमांक --------------- वा लागतो :-दुसरा
  10. १०) यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठच्या वतीने दिल्या जाणारया कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कारासाठी --------------- यांची निवड करण्यात आली :-डॉ विष्णू खरे
  11. ११) भारतीय ऑलिंपिक संघटनेने (आयओए) रिओ ऑलिंपिक स्पर्धेसाठी ------------- यांची सदिच्छा दूत (गुडविल ऍम्बेसिडर) म्हणून निवड केली आहे. :- सलमान खान सचिन तेंडुलकर अभिनव बिंद्रा
  12. १२) . भारत हा वर्षांला साधारणत: १,००० टन सोने आयात करणारा चीननंतरचा जगातील ---------- वा देश आहे.:- दुसरा
  13. १३) "टाइम्स‘ या संस्थेने जगातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या विद्यापीठांची या वर्षासाठीची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत ---------- विद्यापीठाने प्रथम क्रमांक पटकाविला :-हार्वर्ड
  14. पठाणकोटमधील हवाई दलाच्या तळावरील दहशतवादी हल्ल्याबद्दल चौकशी करण्यासाठी--------- यांच्या अध्यक्षतेखाली संसदीय समितीची स्थापना केली :-पी. भट्टाचार्य
  15. -------------- हे राज्य देशातील पहिले हागणदारीमुक्त राज्य ठरणार आहे. :- आंध्र प्रदेश
  16. केंद्रीय शालेय शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) नीट या परीक्षांचे या वर्षीपासून आयोजन होत असून, ती फक्त इंग्रजी आणि हिंदी या भाषांमध्येच देणे बंधनकारक आहे. -------------यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय समिती या प्रवेश परीक्षांच्या आयोजनावर नियंत्रण ठेवणार आहे. :- आर. एम. लोढा
  17.  महाराष्ट्रातील पहिले आधेकृत इलेक्ट्रॉनिक कचरा गोळा करण्याचे केंद्र----------------- येथे सुरु झाले? :-अंधेरी
  18. क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी -------------ची शिफारस करण्यात आली आहे. :-विराट कोहली
  19. ------------- याने २०१६ या वर्षातील जागतिक स्नूकर चैंपियनशिप स्पर्धा जिंकली- मार्क सेल्बी
  20. आईसीसी च्या टेस्ट रैंकिंग मध्ये भारत कितव्या स्थानावर आहे :- दुसऱ्या
  21.  --------------- यांची राष्ट्रीय सांख्यिकी आयोग च्या अध्यक्षपदी निवड झाली :-डॉ. राधा बिनोद बर्मन
  22. ----------- आयोगाच्या शिफारिशी नुसार १जून २००५ रोजी भारत सरकारने राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचीस्थापना केली :-सी रंगराजन
  23. मराठवाडय़ातील दुष्काळाची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी ---------- व ------या दोन नद्या जोडण्यात येणार आहे :- भीमा व मांजरा
  24. सध्याचे नौदलप्रमुख ऍडमिरल आर के धोवन हे येत्या 31 मे रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. यानंतर --------- हे भारताचे नौदलप्रमुख होणार आहेत :-सुनील लांबा
  25. भारतातील कोणत्या राज्याने चंद्रण्णा, विमा योजना " सुरु केली आहे :-आंध्र प्रदेश
  26. आत्ताच प्रकाशित झालेली “The Slashed Canvas ही कांदबरी कोणी लिहलेली आहे ? :-देव संजय दत्ता

  • '112' हा राष्ट्रीय आपत्कालीन क्रमांक म्हणून घोषित :

कोणत्याही प्रकारची आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास केवळ एकाच क्रमांकावर दुरध्वनी करुन मदत मिळविण्याची सोय आता 1 जानेवारीपासून उपलब्ध होणार आहे.
अमेरिका, कॅनडा व ब्रिटनमध्ये ज्याप्रमाणे आपत्कालीन क्रमांक अस्तित्वात आहे, त्याचप्रमाणे भारतातही ‘112‘ हा राष्ट्रीय आपत्कालीन क्रमांक म्हणून घोषित करण्यात आला आहे.
दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) सरकारी दूरसंचार समितीने मंजुरी दिली.
दूरसंचार मंत्रालयाने एकच आपत्कालीन क्रमांक ठेवण्याचा प्रस्ताव मान्य केला आहे.
अमेरिका आणि कॅनडामध्ये '911' आणि ब्रिटनमध्ये '999' हा क्रमांक राष्ट्रीय आपत्कालीन क्रमांक म्हणून वापरला जातो.
तसेच या धर्तीवर भारतातही ट्रायने राष्ट्रीय स्तरावर एक क्रमांक आपत्कालीन स्थितीत नागरिकांना वापरता यावा, यासाठी विचार केला होता.
भारतात 100 (पोलिस), 101 (अग्निशामन), 102 (रुग्णवाहिका) आणि 108 (आपत्ती व्यवस्थापन) या क्रमांकांचा वापर करण्यात येतो.
पण, आता या सर्व सुविधा '112' क्रमांकावर उपलब्ध होणार आहेत.
  • जगभरात 'पासवर्ड दिन' साजरा :

जगभरात 5 मे हा दिवस 'पासवर्ड दिन' म्हणून साजरा केला जातो.
चांगला आणि सुरक्षित पासवर्ड वापरण्याच्या सवयी नेटकरांमध्ये रुजवणे, हा यामागील उद्देश आहे.
स्मार्टफोनच्या मोठ्या प्रमाणावरील वापरामुळे आता इंटरनेट वापरणाऱ्या ग्राहकांचा टक्का चांगलाच वाढला आहे.
पण ग्राहकांच्या नियमित आणि चुकीच्या सवयींमुळे अनेकदा माहिती चोरीला जाणे, अकाउंट हॅक होणे यासारखे प्रकार सुरूच आहेत.
2016 या वर्षातील कमकुवत पासवर्डची यादी नुकतीच जाहीर झाली आहे.
  • ऋषिकेश श्रीवासची महाराष्ट्र हॉकी संघात निवड :

मणिपूरमधील इम्फाळ येथे 8 ते 16 मे या कालावधीत आयोजित राष्ट्रीय हॉकी स्पर्धेकरिता अकोला येथील ऋषिकेश आनंद श्रीवास याची निवड झाली आहे.
ऋषिकेश स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे.
पुणे येथे 27 ते 30 मार्च या कालावधीत महाराष्ट्र हॉकी असोसिएशनच्या वतीने महाराष्ट्र संघ निवड चाचणी आयोजित केली होती.
तसेच यामधून नोएल स्कूलचा विद्यार्थी व अकोला हॉकी असोसिएशनचा खेळाडू ऋषिकेश श्रीवास याने उत्कृष्ट खेळप्रदर्शन करीत महाराष्ट्र संघात आपले स्थान निश्‍चित केले.
महाराष्ट्र संघाचे राष्ट्रीय स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबिर 27 एप्रिल ते 7 मे या कालावधीत पुणे येथे आयोजत केले होते.
ऋषिकेशने याआधी राष्ट्रीय व राज्यस्तर हॉकी स्पर्धा गाजविल्या आहेत.
  • माद्रिद मास्टर्स टेनिस स्पर्धेत सिमोना हालेपला विजेतेपद :

जागतिक टेनिसमधील सातव्या क्रमांकाची रोमानियाच्या सिमोना हालेपने चमकदार कामगिरी करताना माद्रिद मास्टर्स टेनिस स्पर्धेत महिलांच्या एकेरी गटाचे विजेतेपद उंचावले.
अंतिम सामन्यात एकहाती वर्चस्व राखताना हालेपने स्लोवाकियाच्या डोमिनिका सिबुकोवाचे आव्हान 2-0 असे सहजपणे परतावले.
सुमारे दीड तास रंगलेल्या अंतिम सामन्यात हालेपने सिबुकोवाला आपला खेळ करण्याची क्वचितच संधी दिली.
आक्रमक व ताकदवर फटक्यांची बरसात करताना हालेपने सिबुकोवाचा पराभव करताना 6-2, 6-4 असा दणदणीत विजय मिळवला.
विशेष म्हणजे मागील 14 महिन्यांत हालेपचे हे पहिलेच डब्ल्यूटीए विजेतेपद ठरले.
तसेच हालेपने कारकिर्दीत एकूण 12 वे जेतेपदही पटकावले.
  • 8 मे पासून ‘जलमित्र अभियान’ ला सुरुवात :

सध्याची पाणीटंचाई लक्षात घेता वर्तमान आणि भविष्यासाठी पाण्याचा थेंब अन् थेंब वाचविणे गरजेचे असून, यासंदर्भात ‘लोकमत’चे वाचक आणि नागरिकांमध्ये जनजागरण करण्यासाठी ‘लोकमत’ने हाती घेतलेल्या राज्यव्यापी जलमित्र अभियानास रविवार दि. 8 मेपासून प्रारंभ झाले.
सहा आठवड्यांच्या या मोहिमेत सर्वसामान्य नागरिकांसह व्यावसायिक, विद्यार्थी आणि सेलिब्रिटीज सहभागी होणार आहेत.
महाराष्ट्रातील बहुतांश भाग आणि देशातील 40 टक्के प्रदेशावर सध्या जलसंकट ओढावले आहे.
तसेच या स्थितीत पाण्याची बचत करणे अत्यंत महत्त्वाचे आहे; पण समाजात आजवर यासंदर्भात नेमकेपणाने जागरुकता निर्माण केली गेली नाही.
या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने जलसाक्षरतेसाठी जलमित्र अभियानाच्या माध्यमातून पुढाकार घेतला आहे.
सहा आठवड्यांच्या या अभियानात पहिल्या सप्ताहामध्ये ‘लोकमत’ च्या अंकात पाण्याचे महत्त्व आणि जलसाक्षरतेबाबत जनजागरण करणाऱ्या जाहिराती प्रसिद्धी करण्यात येणार आहेत.
‘लोकमत डॉट कॉम’ आणि सोशल मीडिया विशेषत: फेसबुक, टिष्ट्वटरवरून जलबचतीसाठी जागृती करण्यात येईल.
  • वासुदेव कामत यांना पुरस्काराने सन्मानित :

जागतिक ख्यातीचे भारतीय चित्रकार वासुदेव कामत यांना पोर्ट्रेट सोसायटी ऑफ अमेरिका या संस्थेने सिग्नेचर स्टेट्स मेंबरशिप हा पुरस्कार दिला आहे.
जे चित्रकार पोर्ट्रेट पेंटर म्हणून अविरतपणे निर्मिती करीत आहेत, या विषयाचे प्रशिक्षण देत आहेत, अशांना पोर्ट्रेट सोसायटी ऑफ अमेरिकेतर्फे सिग्नेचर स्टेट्स मेंबरशिप हा पुरस्कार देण्यात येतो.
चित्र व शिल्पकला क्षेत्रात पोर्ट्रेटला प्रोत्साहन देणारी ही आंतरराष्ट्रीय संस्था असून, जगभरातील अनेक नामवंत पेंटर्स या संस्थेचे सभासद आहेत.
दर चार वर्षांनी होणाऱ्या या संस्थेच्या परिषदेत जगातील 700 ते 800 कलाकार सहभागी होत असतात.
तसेच त्यातील आंतरराष्ट्रीय पोर्ट्रेट स्पर्धेतही हजारो कलाकारांचा सहभाग असतो. त्यातील अंतिम विजेत्यांची चित्रे प्रदर्शनात प्रदर्शित केली जातात.
कामत यांच्या माय वाइफ या पोर्ट्रेटला 2006 साली ड्रेपर ग्रँड प्राइझ या पुरस्काराने गौरवले होते.
तसेच यंदा एप्रिलमध्ये झालेल्या परिषदेत त्यांना सिग्नेचर स्टेट्स मेंबरशिप या पुरस्काराने गौरविले.
  • नोवाक जोकोविचला माद्रिद ओपन मास्टर्स किताब :

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या सर्बियाच्या नोवाक जोकोविचने ब्रिटनच्या अ‍ॅण्डी मरेलाचा अंतिम फेरीत पराभव करून 29 वेळा माद्रिद ओपन मास्टर्स किताब जिंकण्याची कामगिरी केली आहे.
 अंतिम फेरीत जोकोविचने मरेला 6-2, 3-6, 6-3 असे नमवून जेतेपदावर मोहोर उमटवली.
 जोकोविचचे या वर्षातील हे पाचवे जेतेपद ठरले आहे. यापूर्वी कतार ओपन, इंडियन वेल्स, मियामी ओपन व ऑस्ट्रेलियन ओपन किताब संपादन केला होता.
 मरेने उपांत्य फेरीत स्पेनच्या राफेल नदालला, तर जोकोविचने केई निशिकोरी याला नमवून अंतिम फेरी गाठली होती.
 नदालला विजेतेपदाचा दावेदार मानण्यात येत होते. मात्र, मरेने त्याचे आव्हान परतवून लावत आपणच किताब राखणार असल्याचे संकेत दिले.
  • देशातील 56 हजार गावे मोबाईलने जोडली जाणार :

दूरसंचार विभाग देशातील 55 हजार 669 गावांमध्ये मार्च 2019 पर्यंत टप्प्याटप्प्याने मोबाईल सेवा पुरवणार आहे.
 दूरसंचार विभागाकडून नुकत्याच जाहीर झालेल्या अहवालातून ही माहिती मिळाली आहे.
 युती सरकारला दोन वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने दूरसंचार विभागातील प्रगतीचा आढावा घेण्यासाठी हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.
 तसेच या अहवालानुसार ईशान्य भारतात आठ हजार 621 गावांमध्ये 321 मोबाईल मनोऱ्यांच्या मदतीने सप्टेंबर 2017 पर्यंत मोबाईल सेवा पुरवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
 ईशान्य भारतातील मोबाईल कनेक्‍टिव्हिटीसाठी आतापर्यंत पाच हजार 336 कोटींची दूरसंचार विकास योजना याआधीच मंजूर करण्यात आली आहे.
 ग्रामीण भारताला हायस्पीड ब्रॉडबॅण्डसोबत कनेक्‍ट करण्यासाठी 48 हजार 199 ग्रामपंचायती एप्रिल 2016 अखेरपर्यंत ऑप्टिक फायबरने जोडण्यात आल्या आहेत.
 अतिशय दुर्गम भागातील इंटरनेट कनेक्‍टिव्हिटीसाठी केंद्र सरकारने भारतनेट प्रकल्प मिशन मोड म्हणून हाती घेतला आहे.
 तसेच त्यामध्ये अडीच लाख ग्रामपंचायतीमधील सुमारे साठ कोटी नागरिक "डिजिटली कनेक्‍ट" होतील.
 भारतनेटच्या माध्यमातून ई-गव्हर्नन्स सेवा, ई-कॉमर्स, टेली मेडिसीन, टेली एज्युकेशन, आर्थिक व्यवहार यांसारख्या सेवा तळागाळातील व्यक्तीपर्यंत पोचतील.
 डिजिटल कनेक्‍टिव्हिटीमुळे रोजगाराच्या संधीदेखील ग्रामीण पातळीवर मिळणे शक्‍य होईल, असा विश्वास दूरसंचार विभागाने अहवालातून व्यक्त केला आहे.
  • अद्भुत खगोलीय दृश्य सूर्यावर काळा डाग :

बुधाचा काळा ठिपका सूर्याच्या पृष्ठभागावरून सरकत असल्याचे अनोखे खगोलीय दृश्य (दि.9) बघायला मिळाले.
 दहा वर्षांच्या कालखंडानंतर आलेली बुध पारगमन किंवा अधिक्रमणाची ही दुर्मीळ घटना खगोलप्रेमींसाठी अनोखी मेजवानी ठरली.
 काय असते बुधाचे अधिक्रमण -
 (दि.9) संध्याकाळी 4.40 वाजता बुधाच्या पारगमनाला प्रारंभ झाला.
 तसेच हे दृश्य शतकातून केवळ 13-14 वेळा दिसते.
 भारतात 10 वर्षांनंतर हा दुर्मीळ योग जुळून आला.
 युरोप, आफ्रिका, ग्रीनलँड, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, आर्क्टिक, उत्तर अटलांटिक महासागर आणि प्रशांत महासागराच्या (पॅसिफिक) भागातही हे दृश्य दिसले.
 बुधाचे अधिक्रमण -
 15 नोव्हेंबर 1999
 7 मे 2003
 8 नोव्हेंबर 2006
  • जगातील पहिला होलोग्राफिक स्मार्टफोन :

त्रिमिती दृश्यचित्रफिती व प्रतिमा कुठलाही चष्मा किंवा अन्य साधनाचा वापर न करता बघता येतील, असा होलोग्राफिक स्मार्टफोन जगात प्रथमच तयार करण्यात आल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. हा स्मार्टफोन लवचिक आहे.
 होलोफ्लेक्स असे या स्मार्टफोनचे नाव असून त्याच्या मदतीने कुठलेही बाह्य़ साधन न वापरता त्रिमिती प्रतिमा व चित्रपट पाहता येतात.
 होलोफ्लेक्समुळे स्मार्टफोनबरोबरच्या आंतरक्रिया बदलणार असून त्यामुळे वापरकर्त्यांच्या हालचालींना मर्यादा राहणार नाहीत, असे कॅनडातील क्विन्स विद्यापीठाचे रोएर व्हेर्टेगाल यांनी सांगितले.
 होलोफ्लेक्स स्मार्टफोनमध्ये 1920 गुणिले 1080 इतके उच्च विवर्तन असून त्यातील लाइट एमिटिंग डायोड लवचिक आहेत.
 तसेच त्यांना फ्लेक्सिबल ऑरगॅनिक लाइट एमिटिंग डायोड असे म्हणतात. त्यांचा वापर स्पर्श पडद्यात करण्यात आला आहे.
 होलोफ्लेक्समध्ये लवचिक सेन्सर असून त्यामुळे वापरकर्ते फोन वाकवू शकतात, झेड अक्षावर वस्तू फिरत असल्याचा आभास त्यात होईल.
 व्हेरटेगाल यांनी सांगितले की, होलोफ्लेक्स तंत्रज्ञानाचे अनेक उपयोग आहेत.
 त्रिमिती प्रारूपे वापरून त्याप्रमाणे वस्तू तयार करणे शक्य होणार आहे.
 विशिष्ट कॅमेरा वापरून होलोग्राफिक व्हिडिओ कॉन्फरन्सेस घेता येतील.
  • गांधीलमाशीच्या नव्या प्रजातीस ब्रॅड पीट्सचे नाव :

वैज्ञानिकांनी भारत व दक्षिण आफ्रिकेत गांधीलमाश्यांच्या दोन नवीन प्रजाती शोधल्या असून त्यातील एका प्रजातीला हॉलिवूड अभिनेता ब्रॅड पीट याचे नाव देण्यात आले आहे.
 गांधील माश्यांच्या नव्या प्रजातीचे नाव कोनोब्रेगमा ब्रॅडपिटी असे ठेवले असून या माश्या पतंग व फुलपाखरांच्या अळ्यांवर वाढतात.
 तसेच या माश्या त्यांच्या यजमानाच्या शरीरात अंडी घालतात व नंतर त्यापासून नवीन माश्या तयार होऊन त्या ममीभूत अळीतून बाहेर पडतात.
 या गांधीलमाश्यांचे वर्तन प्राणघातक असले तरी त्या शेतीसाठी फार उपकारक असतात. त्यांच्यामुळे जैवनियंत्रणाची क्रिया साधली जाते.
 संतोष श्रीविहार व अवुनजीकट्टू परामबिल रणजिथ या केरळच्या कालिकत विद्यापीठातील दोघांनी माश्यांच्या या प्रजाती शोधल्या आहेत.
 तसेच त्यांनी शोधलेली आणखी दुसरी एक प्रजाती आहे ती परोपजीवीच असून भारतात या प्रजातीतील उपप्रजातीची ही माशी प्रथमच सापली आहे.
 नवीन माशीला नाव शोधत असताना थायलंडच्या चुलालोंगकोर्न विद्यापीठातील भूंतिका ए ब्यूटचर यांनी ब्रॅड पीटचे नाव देण्याचे ठरवले.
  • यंत्रमानवही विद्यापीठ प्रवेश परीक्षा देणार :

यंत्रमानवाला कृत्रिम बुद्धिमत्ता प्रदान करता येते त्याला काही मर्यादा असल्या तरी विविध क्षेत्रांत त्यांचा वापर वाढत आहे.
 चीनमध्ये यंत्रमानवाला राष्ट्रीय महाविद्यालय प्रवेश परीक्षेसाठी बारावीच्या विद्यार्थ्यांबरोबर बसवले जाणार आहे.
 विद्यापीठ प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या या प्रवेश परीक्षेस बसण्याची संधी त्याला पुढील वर्षी दिली जाणार आहे.
 विशिष्ट पद्धतीने तयार केलेला हा यंत्रमानव गणित, चिनी भाषा, मुक्त कलांची र्सवकष चाचणी अशा तीन परीक्षा देणार असून त्यात इतिहास, राज्यशास्त्र व भूगोल हे विषय असणार आहेत, असे चेंगडू येथील कृत्रिम बुद्धिमत्ता कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी लिन हुई यांनी म्हटले आहे.
 यंत्रमानवाला इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच ठराविक वेळेत उत्तरे लिहून पूर्ण करावी लागणार आहेत, बंद खोलीत परीक्षा घेतली जाणार असून, त्या वेळी महाविद्यालयाचे पर्यवेक्षक व नोटरी यांची उपस्थिती राहील.
 यंत्रमानव एका प्रिंटरला जोडलेला असेल, त्याला इलेक्ट्रॉनिक पद्धतीची प्रश्नपत्रिका दिली जाईल.
 अर्थात, ती इतर मुलांना मिळेल तेव्हाच त्यालाही लोड केली जाणार आहे.
 यंत्रमानवाचा इंटरनेटशी काही संबंध असणार नाही, त्यामुळे कॉपी करण्याचा प्रश्न राहणार नाही.
 हा यंत्रमानव त्याच्या कृत्रिम बुद्धिमत्ता आज्ञावलीच्या मदतीने प्रश्नांची उत्तरे देईल असे चायना डेलीने म्हटले आहे.
  • शशांक मनोहर यांनी दिला BCCI चा राजीनामा 

 परिषदेच्या (ICC) अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यासाठी शशांक मनोहर यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
  यांच्या राजीनाम्यामुळे शरद पवार आणि अजय शिर्के यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा येण्याची शक्यता आहे.
  नियमांनुसार ICC च्या अध्यक्षपदावर असणाऱ्या व्यक्तीला राष्ट्रीय वा राज्यस्तरीय क्रिकेट संघटनेच्या पदावर राहता येणार नाही.
 महिना अखेरीपर्यंत नवे अध्यक्ष निवडले जातील.
 हे BCCI आणि ICC या दोन्ही संघटनांचे अध्यक्षपद बजावत होते, त्यामुळे त्यांनी भारतीय संघटनेच्या राजीनामा दिला.
  त्यामुळे ICC च्या अध्यक्षदावर पुन्हा निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

 हे दुसऱ्यांदा ‘बीसीसीआय’च्या अध्यक्षपदी विराजमान झाले होते.
  • दिल्लीत होणार क्षेपणास्त्ररोधक यंत्रणा 

शत्रूच्या क्षेपणास्त्राच्या हल्ल्याला समर्थपणे तोंड देण्यासाठी राजधानी दिल्लीत क्षेपणास्त्ररोधक यंत्रणा (मिसाइल शील्ड) पुढील वर्षी कार्यान्वित होईल, अशी माहिती संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी लोकसभेत दिली.
रशियाकडून मिळणारी 'मिसाइल शील्ड' यंत्रणेची प्रतीक्षा भारत करीत आहे.
जमिनीवरून आकाशात मारा करणाऱ्या लांब पल्ल्याची 'एस-400 एलआरएसएएम'ची पाच क्षेपणास्त्रे हवाई दलाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.
तेराव्या पंचवार्षिक योजनेत म्हणजे 2017-22 या कालावधीत ही प्रक्रिया पूर्ण होईल.
लष्करी संपादन मंडळाची बैठक गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झाली होती. त्या वेळी ही क्षेपणास्त्र खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
'एस- 300'पेक्षा 'एस-400'प्रणालीमध्ये काय फरक आहे, या प्रश्‍नाला उत्तर देताना पर्रीकर म्हणाले की, जास्त व कमी पल्ल्याच्या लक्ष्यासंदर्भात जुन्या प्रणालीची कामगिरी नव्यापेक्षा चांगली होती.
  • यूपीएससीमध्ये योगेश कुंभेजकर राज्यात प्रथम 

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (यूपीएससी) 2015 मध्ये घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.
 दिल्लीची टीना दाबी ही देशात प्रथम आली असून, सोलापूरच्या योगेश कुंभेजकर याने राज्यात प्रथम तर देशात आठवा क्रमांक मिळविला.
राज्यातील 100 हून अधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षेत यश संपादन केले आहे.
श्रीकृष्णनाथ पांचाळ याने राज्यात दुसरा आणि देशात 16 वा क्रमांक मिळवला, तर सौरभ गहरवार याने राज्यात तिसरा आणि देशात 46 वा क्रमांक मिळविला आहे.
यूपीएससीतर्फे 2015 च्या परीक्षेत यश संपादन केलेल्या 1 हजार 78 उमेदवारांची यादी (दि.10) जाहीर करण्यात आली.
 तसेच या उमेदवारांची इंडियन अ‍ॅडमिनिस्ट्रेशन सर्व्हिस, इंडियन फॉरेन सर्व्हिस, इंडियन पोलीस सर्व्हिस आणि सेंट्रल सर्व्हिस ग्रुप ‘ए’ आणि ग्रुप ‘बी’ या पदांसाठी शिफारस करण्यात आली आहे.
 दरवर्षी राज्यातील सुमारे 8 ते 10 टक्के विद्यार्थी यूपीएससीमध्ये यश संपादन करतात. यंदाही 10 टक्के विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे.
  • पृथ्वीच्या आकाराचे आणखी 100 ग्रह 

आकाशगंगेमध्ये पृथ्वीच्या आकाराचे 100 पेक्षा अधिक ग्रह असलेल्याचा शोध अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासाने लावला आहे.
नासाच्या केप्लर दुर्बिणीने पृथ्वीच्या आकाराएवढ्या शंभर ग्रहांचा शोध लावला आहे.
तसेच या शोधामध्ये नासाने आपल्या सूर्यमालिके बाहेरील 1284 ग्रहांचा शोध लावला असून यामधील काही ग्रह अधिवासक्षम क्षेत्रात आहेत
यात 550 लहान ग्रह असून त्यापैकी काही ग्रह खडकाळ आहेत.
आकाशगंगेतील अधिवासक्षम ग्रहांचा शोध घेत असून असे अब्जावधी ग्रह असण्याची शक्यता आहे, अशी माहिती केपलर प्रकल्पाच्या डॉ. नताली बताल्हा यांनी दिली.
 केप्लरच्या या नव्या शोधामुळे आकाशगंगेमध्ये अनेक छोटे ग्रह असल्यावर शिक्कामोर्तब झाले असल्याचे शास्त्रज्ञ नताली बताल्हा यांनी सांगितले.
मोठ्या ग्रहांच्या तुलनेत छोट्या ग्रहावर जीवसृष्टीची शक्‍यता जास्त असल्याचे मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे.
  • गुगलतर्फे देशातील 5 रेल्वेस्थानकांवर मोफत वायफाय सेवा :

देशातील पाच रेल्वेस्थानकांवर विनामुल्य हाय-स्पीड वायफाय सेवा सुरू करण्याची घोषणा गुगलतर्फे (दि.9) करण्यात आली.
उज्जैन, जयपूर, पाटणा, गुवाहाटी आणि अलाहाबाद रेल्वेस्थानकांवर गुगलने ही सेवा सुरू केली.
वर्षाखेरपर्यंत देशातील 100 रेल्वेस्थानकांवर विनामुल्य वायफाय सेवा सुरू करण्याची योजना असल्याचे गुगलने एका निवेदनाद्वारे जाहीर केले.
वरील पाच स्थानकांवर सुरू करण्यात आलेली ही सुविधा याच योजनेचा भाग असून, लवकरच रेल्वेमंत्री सुरेश प्रभू या सुविधेचे लोकार्पण करतील.
 गुगलने आपल्या या सेवेसाठी भारतीय रेल्वेच्या रेलटेल या फायबर नेटवर्कचा वापर केला आहे.
तसेच या पाच रेल्वे स्थानकांची भर पडताच देशभरातील 15 रेल्वेस्थानकांवर ही सेवा उपलब्ध असेल.
मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावरील या सुविधेला येत असलेला चांगला प्रतिसाद पाहून कंपनी दादर, वांद्रे, चर्चगेट, ठाणे, कल्याण, पनवेल, वाशी, कुर्ला, छत्रपती शिवाजी टर्मिनस, बोरिवली आणि इतर अनेक रेल्वेस्थानकांवर ही सेवा सुरू करणार आहे.
         
  • भारतीय नौदलात ऐतिहासिक क्षणांची नोंद :

नौदलात तीस वर्षे सेवेत असलेल्या सी-हॅरिअर्सची जागा (दि.11) नव्या दमाच्या मिग-29 के लढाऊ विमानांनी घेतली.
भारतीय नौदलाच्या इतिहासात यावेळी ऐतिहासिक क्षणांची नोंद झाली.
दाबोळी येथील आयएनएस हंसा तळावर सी-हॅरिअर्सला निरोप देऊन मिग-29 के विमानाचे स्वागत करण्यात आले.
सी-हॅरिअर्स आणि मिग-29 के विमानांचे नेत्रदीपक संचलन झाले.
‘मिग-29 के’ हे अत्याधुनिक लढाऊ विमान आहे.
प्रतिमिनिट साठ हजार फुटांवरून उड्डाण करण्याची त्याची क्षमता आहे.
तसेच मल्टिमोडल रडारवर ते येत नाही. एका मिनिटात शून्य ते एक हजार प्रति किलोमीटर नॉटिकल मैल या वेगाने झेपाविण्याची या विमानाची क्षमता आहे.
  • भारत-बांगलादेश चर्चेला प्रारंभ :

भारत-बांगलादेश दरम्यानच्या पाचदिवसीय चर्चेला प्रारंभ झाला.
 अमली पदार्थ, जनावरांची तस्करी तसेच सीमाभागातून होणारी घुसखोरी आदी विषयांवर उभय देशांमध्ये विचारमंथन होणे अपेक्षित आहे.
 सीमा सुरक्षा दलाचे प्रमुख के. के. शर्मा यांच्या नेतृत्त्वाखालील 21 सदस्यांचे पथक ढाक्‍यात आले असून, बांगलादेश सीमारक्षक दलाच्या मुख्यालयामध्ये ही चर्चा सुरू आहे.
 बांगलादेश सीमारक्षक दलाचे प्रमुख मेजर जनरल अझीझ अहमद यांच्या नेतृत्त्वाखालील 23 सदस्यांचे पथक या चर्चेत सहभागी झाले आहे.
 मागील वर्षी डिसेंबर महिन्यामध्येच ही चर्चा होणार होती, पण सीमा सुरक्षा दलाच्या विमानास दिल्लीमध्ये अपघात झाल्याने ही चर्चा लांबणीवर पडली होती.
 तसेच या अपघातामध्ये 10 कर्मचारी मरण पावले होते.
 सीमेवरील चकमकी पूर्णपणे थांबविण्यात याव्यात आणि सुरक्षाविषयक प्रोटोकॉल्सची कडक अंमलबजावणी केली जावी, अशा मागण्या बांगलादेशकडून केल्या जाऊ शकतात, असे 'बीएसएफ'च्या सूत्रांनी सांगितले.
  • जगातील सर्वांत उंच पुतळा गुजरातमध्ये उभारला जाणार :

'स्टॅच्यू ऑफ युनिटी' येत्या दोन वर्षांत पूर्ण होणार असल्याचा विश्वास 91 वर्षीय पद्मश्री पुरस्कारविजेते राम व्ही. सुतार यांनी व्यक्त केला आहे.
 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून साकारला जाणारा सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वांत उंच पुतळा गुजरातमध्ये उभारला जाणार असून, 2014 मध्ये सरकारने हे काम सुतार यांच्याकडे सोपविले आहे.
 सुतार यांनी साकारलेले महात्मा गांधींचे पुतळे फ्रान्स, इटली, अर्जेंटिना, बाबार्डोस, रशिया आणि इंग्लंड या देशांना भेट देण्यात आले आहेत.
 संसद भवनातील 17 फूट उंच महात्मा गांधींचा ध्यानमुद्रेतील लक्ष वेधून घेणारा पुतळाही सुतार यांनी बनविला आहे.
 मध्य प्रदेशातील गांधीसागर धरणात 45 फूट उंच चंबळचे स्मारक उभारल्यानंतर सुतार प्रसिद्धिझोतात आले होते.
 देश विघटनाच्या वाटेवर असताना सरदार पटेल यांनी तो एकसंघ ठेवण्याचे काम केले.
  • महाराष्ट्राचा इतिहास कोशबद्ध होणार :

महाराष्ट्राच्या वाङ्‌मयीन, सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आदी क्षेत्रांमध्ये 1800 ते 1950 या दीडशे वर्षांच्या कालखंडात कोणकोणत्या घडामोडी घडल्या आणि त्यांचा परस्परांवर नेमका काय परिणाम झाला, याचा धांडोळा घेणाऱ्या पहिल्या मराठी कोशाचे काम लवकरच सुरू होणार आहे.
 मुंबईतील मराठी संशोधन मंडळाच्या या प्रकल्पाला साहित्य संस्कृती मंडळाने नुकताच हिरवा कंदील दाखवला आहे.
 विविध क्षेत्रातील तौलनिक नोंदी कालानुक्रमे मांडणारा आणि त्यांचा व्यापक आढावा घेणारा कोश संशोधक, अभ्यासक, विद्यार्थी आदींना उपयोगी ठरणार आहे.
 मध्ययुगीन महाराष्ट्राची पारंपरिक प्रतिमा 19 व्या शतकात मागे पडून आधुनिक महाराष्ट्राची नवी ओळख घडवली जाऊ लागली.
 ब्रिटिशांविरुद्धचा 1857 चा उठाव, त्याचबरोबर सुरू झालेली सामाजिक प्रबोधनाच्या आणि वैचारिक चळवळींनी महाराष्ट्राच्या राजकीय-सांस्कृतिक जीवनात नवे मन्वंतर घडून आले.
 वृत्तपत्रे, नियतकालिके यांचा आरंभ, देश-विदेशातील साहित्यकृतींची भाषांतरे, आधुनिक रंगभूमीचा उदय, मूकपट ते बोलपटांचा कालखंड, सार्वत्रिक शिक्षण-संस्था-मंडळांची स्थापना, विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील वसाहतवादोत्तर नवभारताच्या पुनर्निर्माणाचा कालखंड आदींच्या नोंदी, त्याचबरोबर त्यांचा परस्परांवर पडलेला प्रभाव आणि परिणामाचा एक प्रकारचा संशोधित संदर्भच या कोशाद्वारे हाती येणार आहे.
 मराठीत एकत्रित असा एकही कोश नाही.
 मराठी संशोधन मंडळाने चंद्रकांत भोंजाळ यांच्या सहकार्याने हा प्रकल्प हाती घेतला आहे.
  • आयसीसीच्या चेअरमनपदी परत शशांक मनोहर :

ज्येष्ठ क्रिकेट संघटक अ‍ॅड. शशांक मनोहर (दि.12) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) पहिले स्वतंत्र चेअरमन म्हणून बिनविरोध विराजमान झाले आहेत.
 दोन दिवसांपूर्वीच त्यांनी बीसीसीआय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.
 आयसीसीच्या पूर्ण सदस्यीय बोर्डाने प्रस्तावित घटनात्मक सुधारणेस मंजुरी प्रदान करताच 58 वर्षांचे मनोहर यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला.
 तसेच ते आयसीसीचे पहिले बिनविरोध स्वतंत्र चेअरमन आहेत. त्यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ लगेच सुरू झाला.
 आयसीसी निवडणूक प्रक्रियेअंतर्गत सर्व संचालकांना आजी किंवा माजी संचालकांमधून एका व्यक्तीचे नाव सुचविण्याची मुभा असते.
 निवडणूक लढविण्यासाठी अर्जावर दोन पूर्णकालीन सदस्यांची स्वाक्षरी अनिवार्य आहे.
 मनोहर हे या पदासाठी एकमेव उमेदवार होते. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
 निवडणूक प्रक्रिया सांभाळणारे ऑडिट समितीचे स्वतंत्र अध्यक्ष अदनान झैदी यांनी प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सांगून मनोहर यांच्या नावाची घोषणा केली.
  • भारतातील काही रहस्यमय ठिकाणे :

भारत देश त्याच्या रहस्यमय गोष्टींमुळे नेहमीच अख्ख्या जगाला भुरळ घालत असतो.
 भारतात अनेक राजे-रजवाडे होऊन गेले. अनेक महाल आणि रहस्यमय किल्ले इथं आजही स्वतःचं अस्तित्व टिकवून आहेत.
 तसेच ते किल्ले आणि ठिकाणांमधील रहस्यमयी गोष्टींचं कोडं उलगडण्यास विज्ञानालाही आजमितीस जमलं नाही.
 विज्ञानाच्या जोरावर मनुष्यानं चंद्रावर जरी झेप घेतली तरी काही रहस्यमय गोष्टींच्या बाबतीत त्याला झुकावेच लागले आहे.
 भारतात अशाच काही रहस्यमय जागा आहेत. ज्या आजच्या युगातही रहस्यांनी भारलेल्या आहेत. या ठिकाणांवरील रहस्य जाणून घेण्यासाठी दररोज देश-विदेशातील पर्यटक इथं आवर्जून भेट देतात.
  
  • काही रहस्यमय ठिकाणं पुढील प्रमाणे :

पक्ष्यांची सामूहिक आत्महत्या- आसाम
उंदरांचं मंदिर - करणी माता मंदिर, राजस्था
लोकतकचा तरंगता तलाव - मणिपूर
रुपकुंड तलाव - उत्तराखंड
कोलकात्यातील वडाचे झाड
चुंबकीय टेकडी - लडाख
कोडीन्ही गाव - केरळ
पंबन बेटावरचे तरंगते दगड - रामेश्वरम
लटकते खांब - लेपक्षी, आंध्र प्रदेश
  • #भारतनेट : डिजिटल कनेक्टिव्हिटी प्रकल्प

----------------------------------------------------------------------------
* अतिशय दुर्गम भागातील इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठी केंद्र सरकारने भारतनेट प्रकल्प मिशन मोड म्हणून हाती घेतला आहे. त्यामध्ये 2.50 लाख ग्रामपंचायतीमधील सुमारे 60 कोटी नागरिक ‘डिजिटली कनेक्ट‘ होतील. भारतनेटच्या माध्यमातून ई-गव्हर्नन्स सेवा, ई-कॉमर्स, टेली मेडिसीन, टेली एज्युकेशन, आर्थिक व्यवहार यांसारख्या सेवा व्यक्तीपर्यंत पोचतील. याचा फायदा मोबाईल ऑपरेटर, केबल टीव्ही ऑपरेटर यांसारख्या सेवा पुरवठादारांना नेक्स्ट जनरेशन सेवा पुरवण्यासाठी होईल. डिजिटल कनेक्टिव्हिटीमुळे रोजगाराच्या संधीदेखील ग्रामीण पातळीवर मिळणे शक्य होईल.
* महत्त्वाचे मुद्दे -
* ग्रामीण भारताला हायस्पीड ब्रॉडबॅण्डसोबत कनेक्ट करण्यासाठी 48,199 ग्रामपंचायती एप्रिल 2016 अखेरपर्यंत ऑप्टिक फायबरने जोडण्यात आल्या.
* दूरसंचार विभागाने जाहीर केलेल्या सुधारित योजनेनुसार देशातील 55,669 गावांमध्ये मार्च 2019 पर्यंत टप्प्याटप्प्याने मोबाईलसेवा पुरविली जाणार आहे.
* ईशान्य भारतात 8,621 गावांमध्ये 321 मोबाईल मनोर्यांखच्या मदतीने सप्टेंबर 2017 पर्यंत मोबाईल सेवा पुरवण्याचे उद्दिष्ट आहे. ईशान्य भारतातील मोबाईल कनेक्टिव्हिटीसाठी 5,336 कोटींची दूरसंचार विकास योजना मंजूर केली आहे.
  • चीनचा नेपाळसाठी नवा ट्रेड रूट, पहिली ट्रेन रवाना

 भारत आणि नेपाळमधील ताणलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर चीनने काठमांडूसाठी नवा व्यापार मार्ग सुरू केला आहे. या मार्गाद्वारे चीन नेपाळला सर्व गरजेच्या वस्तूंचा पुरवठा करणार आहे. या सर्व गोष्टींसाठी नेपाळ याआधी केवळ भारतावर अबलंबून होता. गतवर्षी झालेल्या मधेसी आंदोलनाने भारताकडून नेपाळला होणाऱ्या पुरवठ्यात व्यत्यय आला आणि नेपाळने चीनचा पदर पकडला. चीन आणि नेपाळदरम्यान यासाठी एक सामंजस्य करार करण्यात आला. याअंतर्गत चीन नेपाळला इंधन, खाद्य तेल आणि अन्य वस्तूंचा पुरवठा करणार आहे. याच्या पुर्ततेसाठी चीनने पावले उचलण्यास सुरवात केली असून, चीनमधून बुधवारी पहिली मालगाडी तिबेटमार्गे काठमांडूसाठी रवाना झाली. चीनचे हे पाऊल भारतीय कुटनीतीसाठी मोठा धक्का आहे.
  • जगातील सर्वात महाकाय विमान भारतात उतरले
# जगातील सर्वात मोठे कार्गो विमान अशी ख्याती असलेले ‘AN -225 Mriya’ हे विमान शुक्रवारी पहिल्यांदाच भारतात दाखल झाले. युक्रेनच्या अँटोनोव्हो या कंपनीचे हे विमान असून हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर हे विमान उतरले आहे. ‘AN -225 Mriya’ हे जगातील आतापर्यंत तयार झालेले सर्वात मोठे विमान आहे. हे विमान जवळपास ६ टर्बोफॅन इंजिनवर चालते. या विमानाचे वजन ६४० टन इतके प्रचंड आहे. विमानाची लांबी एअरबस ए३८० पेक्षाही ३७ फूट जास्त आहे. ‘AN -225 Mriya’ हे कार्गो विमान असून या विमानाची १८० ते २३० टन इतकी मालवाहू क्षमता आहे.
  • देशात लवकरच सौर रेल्वेगाडीची चाचणी

 रेल्वेचे इंधनावरील अवलंबित्व कमी करण्याच्या दृष्टीकोनातून भारतीय रेल्वे प्रशासन लवकरच ‘सोलर मिशन’च्या दिशने पहिले पाऊल टाकणार आहे. उत्तर-पश्चिम रेल्वे विभागाकडून जोधपूर येथे लवकरच सौर रेल्वेगाडीची चाचणी घेण्यात येणार आहे. या रेल्वेगाडीच्या डब्यांच्या वरील भागावर सौरऊर्जेचे पॅनल बसविलेले असतील. त्यातून रेल्वेतील उपकरांना वीज प्राप्त होईल.
  • टीकेनंतर चार कोटींचे बिल रेल्वेमंत्री सुरेभ प्रभूंकडून मागे

 तहानलेल्या लातूरकरांना रेल्वेने ६.२० कोटी लिटर पाणी दिल्यानंतर त्याच्या वाहतुकीचे चार कोटींचे बिल मध्य रेल्वेकडून लातूर जिल्हा प्रशासनाला पाठविण्यात आले होते. त्यावर सर्वस्तरांतून टीका होऊ लागल्यानंतर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी हे बिल मागे घेत असल्याचे नवी दिल्लीमध्ये सांगितले. पाण्याच्या वाहतुकीसाठी रेल्वेचा जो खर्च झाला, त्याचे बिल मध्य रेल्वेने पाठविले होते.
  • मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंह यांना क्लीन चीट 

 मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) क्लीनचीट दिली असून, यामुळे त्यांचा तुरुंगातून बाहेर पडण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयएकडून शुक्रवारी आरोपपत्र दाखल करण्यात आले. त्यामध्ये साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे नाव नाही.
त्यांच्यासह एकूण सहा जणांविरुद्ध सबळ पुरावे सापडले नसल्याचे एनआयएने आरोपपत्रात म्हटले आहे.
या प्रकरणात एकूण दहा जणांवर आरोपपत्र सादर करण्यात आले.
त्यामध्ये लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांचाही समावेश आहे.
विशेष म्हणजे प्रसाद पुरोहित यांच्यासह अन्य सर्व आरोपींवरील मोक्काही एनआयएकडून काढून टाकण्यात आला आहे. बेकायदा कृत्ये प्रतिबंधक कायदा आणि भारतीय दंडविधान संहितेतील इतर कलमांच्या आधारे आरोप ठेवण्यात आले आहेत.
  • ‘स्मार्ट सिटी’साठी सोलापुरात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प

 ‘स्मार्ट सिटी’ योजनेअंतर्गत सोलापूर शहरासाठी केंद्र सरकारकडून पहिल्या टप्प्यात १९३ कोटींचा निधी मंजूर होऊन राज्य शासनाकडे जमा झाला आहे.
या पाश्र्वभूमीवर स्मार्ट सिटी योजनेच्या पहिल्या टप्प्यात सांडपाणी प्रक्रिया करणारा ‘टर्सरी’ प्रकल्प उभारला जाणार आहे.
⚡या प्रकल्पात प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा पुनर्वापर सोलापूरजवळील एनटीपीसीच्या औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पासाठी करण्याचा प्रस्ताव आहे.
या प्रकल्पाचा खर्च एनटीपीसी उचलणार आहे.
  • माथेरानमध्ये साकारला आकाशदर्शन प्रकल्प

 रायगड जिल्हा वार्षकि योजनेअंतर्गत माथेरान येथे आकाशदर्शन प्रकल्प साकारण्यात आला आहे. पर्यटक आणि खगोलशास्त्राच्या अभ्यासकांसाठी उभारण्यात आलेला हा राज्यातील पहिला प्रकल्प ठरला आहे. त्यामुळे हिरव्यागार निसर्गासाठी प्रसिद्धीस आलेला माथेरान आता खगोल अभ्यासाचे केंद्र म्हणून नावारूपास येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा