Post views: counter

Current Affairs March Part - 1


  • जगातील सर्वांत सुंदर शहर :
डॅन्युब नदीच्या तीरावर वसलेली ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना हे जगातील सर्वांत सुंदर शहर ठरले आहे.
 तसेच या शहरातील उच्च प्रतीचे राहणीमान सर्व जगात चांगले असल्याचे एका सर्वेक्षणातून सिद्ध झाले आहे.
 मर्सर या संस्थेने हे सर्वेक्षण केले असून विविध कंपन्या, संस्था आणि नागरिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर त्यांनी जगातील 230 शहरांचा अभ्यास केला.
 तसेच यादी तयार करताना या संस्थेने राजकीय स्थैर्य, आरोग्यसुविधा, शिक्षण, गुन्हेगारी, वाहतूक व्यवस्था असे अनेक निकष लावले.
 व्हिएन्ना शहराची लोकसंख्या 17 लाख असून, शहरात असलेली विविध संग्रहालये, रंगभूमी, ऑपेरा आणि कॅफे संस्कृतीचा आनंद हे नागरिक घेत असतात.
 इतर पाश्‍चात्य देशांतील शहरांची तुलना करता येथील सार्वजनिक वाहतूकही बरीच स्वस्त आहे.
 एकेकाळी जागतिक व्यापाराचे केंद्र असलेले बगदाद दहशतवादाने होरपळल्याने या यादीत अखेरच्या स्थानावर आहे.
  • भारतीय कलाकाराला फ्रान्सचा नाइटहूड सन्मान :
आयुष्यभर कलेचा प्रसार करत असल्याबद्दल एका भारतीय वंशाच्या कलाकाराला फ्रान्स सरकारने नाइटहूड हा किताब देऊन त्याचा सन्मान केला आहे.
 दक्षिण आफ्रिकेत राहणाऱ्या इस्माईल महंमद यांचा फ्रेंच राजदूताने 'नाइट ऑफ द ऑर्डर ऑफ आर्टस अँड लिटरेचर' हा किताब दिला.
 फ्रान्सने केलेल्या सन्मानाबद्दल इस्माईल यांनी आभार मानले असून, कलेची राजधानी समजल्या जाणाऱ्या पॅरिसनेच हा गौरव केल्याची भावना व्यक्त केली आहे.

Current Affairs March Part - 2


  • राष्ट्रीय कौशल्य विकास योजना :
देशात कुशल मनुष्यबळ निर्माण व्हावे, तरुणांना आपल्या पायावर उभे राहता यावे व रोजगारनिर्मितीचे प्रमाण वाढावे यासाठीकेंद्र शासनाने राष्ट्रीय कौशल्य विकास योजना सुरूकेली.तसेच आतापर्यंत या योजनेअंतर्गत सुमारे76लाख तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
प्रशिक्षणाचे प्रमाण वाढावे व विविध प्रकारेकौशल्यासंदर्भात प्रशिक्षण घेता यावे यासाठी केंद्राकडून आणखी1 हजार 500‘मल्टिस्कील’प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याचे उद्दिष्ट असल्याचे जेटली यांनी स्पष्ट केले.
जुलै 2015मध्ये केंद्र शासनाकडूनराष्ट्रीय करिअर सेवासुरू करण्यात आली होती,याअंतर्गत देशभरातून35लाख रोजगारेच्छुक तरुणांनी नोंदणी केली होती.
2016-17या वर्षात100‘मॉडेल’करिअर केंद्र सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे, याशिवाय राष्ट्रीय करिअर सेवा‘प्लॅटफॉर्म’सोबत राज्य रोजगार केंद्र जोडण्याची बाबदेखील प्रस्तावित आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदीयांच्या महत्त्वाकांक्षी‘स्कील इंडिया’योजनेसंदर्भात केंद्रीय अर्थसंकल्पात पावलेउचलली आहेत.
पंतप्रधान कौशल्य विकास योजनेमार्फत पुढील3वर्षांत देशातील1 कोटीतरुणांना कौशल्य प्रशिक्षण देण्याची अर्थमंत्रीअरुण जेटलीयांनी घोषणा केली.
  • फर्स्ट ग्लोबल इम्पॅक्‍ट लिगसी ऑनर’ पुरस्कार :
‘सकाळ’चे व्यवस्थापकीय संचालक आणि ‘डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन’चे संस्थापक अध्यक्ष अभिजित पवार यांना ‘यंग प्रेसिडेंट्‌स ऑर्गनायझेशन’च्या ‘वर्ल्ड प्रेसिडेंट्‌स ऑर्गनायझेशन’चा (वायपीओ-डब्ल्यूपीओ) ‘फर्स्ट ग्लोबल इम्पॅक्‍ट लिगसी ऑनर’ हा सर्वोच्च पुरस्कार जाहीर झाला आहे.
 दुबई येथे (दि.9) होणाऱ्या शानदार समारंभात पवार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
 ‘वायपीओ-डब्ल्यूपीओ’च्या आंतरराष्ट्रीय समितीने नुकतीच ही घोषणा केली.

Current Affairs March Part - 3


  • भारतातील सौरऊर्जा वापरण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असले तरी यामध्ये बिहारचं नाव कुठेच नाही. आज ऊर्जा मंत्राल्याने जाहीर केलेल्या भारतातील २६ राज्याच्या यादीत बिहारचे नाव नाही. बिहार मध्ये सौरऊर्जा वीज उत्पन्न होत नाही. आज ऊर्जा मंत्राल्याने सौर ऊर्जा उत्पन्न करणाऱ्या जाहीर केलेल्या २६ राज्यामध्ये राज्यस्थान सर्वात अग्रेसर असून २०१५ मध्ये १२६४ मेगावॅट सौरउर्जा निर्माण केली आहे. तर गुजरात १०२४, मध्यप्रदेश ६७९, तमिळनाडू ४१९ यांचा क्रमांक लागतो. मागील वर्षी भारतात सौरउर्जेवर एकूण ५,१३० मेगावॅट विजेची निर्मीती करण्यात आली आहे. ती गेल्या वर्षाच्या तुलनेत १३८५ मेगावॅट ने वाढली आहे. भारत सरकार वर्ष २०२१-२२ पर्यंत राष्ट्रीय उर्जा मिशन मार्फत १०० गीगावॅट सौरऊर्जा निर्माण करणार आहे. त्यामधील ६० गीगावॅट जमानीवर तर ४० गीगावॅट घराच्या छतावर उत्पन्न करणार आहे.  सरकारचे चालू वर्षी २०१६ मध्ये २००० मेगावॅट तर पुढील वर्षी १२००० मेगावॅट सौरऊर्जा निर्मीती करण्याचे लक्ष आहे. ऊर्जा मंत्रालय ३१ मार्च पर्यंत १८०० मेगावॅट निर्मितीचा निवीदा काढणार आहे.
  • सेवा क्षेत्रात एफडीआय वाढ :
सरकारने व्यापार सुगमता वाढविल्याने आणि विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आल्याने सेवा क्षेत्रातील प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक (एफडीआय) एप्रिल ते डिसेंबर या अवधीत 85.5 टक्क्यांनी वाढून 4.25 अब्ज डॉलर झाली.
 औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभागाने (डीआयपीपी)च्या आकड्यांनुसार एप्रिल-डिसेंबर 2014 या कालावधीत एफडीआय 2.29 अब्ज डॉलरचा मिळाला होता.
 सेवा क्षेत्रात बँकिंग, विमा, आऊटसोर्सिंग, कुरिअर, माहिती-तंत्रज्ञान यांचा समावेश आहे.
 देशाच्या जीडीपीत सेवा क्षेत्राचे योगदान 60 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

Current Affairs March Part - 4

  • निमलष्करी दलात आता महिला लढाऊ :
निमलष्करी दलाच्या पोलिस दलामध्ये महिलांचे आरक्षण जाहीर केल्यानंतर आता पाचही केंद्रीय सशस्त्र दलांत (सीएपीएफ) मध्ये लढाऊ अधिकारी म्हणून महिलांचा समावेश होणार.
 केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंदर्भात नुकतेच नवीन नियम जाहीर केले असून, आयटीबीपीमध्ये महिलांना थेट लढाऊ अधिकारी म्हणून अर्ज करू शकतात.
 आयटीबीपीचे जवान भारत-चीन सीमेवर गस्त घालण्यासाठी तैनात असतात, अशा कठीण जबाबदारीमुळे महिलांना या दलात परवानगी दिली जात नाही.
 मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून केंद्रीय राखीव पोलिस दल आणि केंद्रीय औद्यागिक सुरक्षा दलामध्ये महिला उमेदवार थेट अधिकारी म्हणून यूपीएससीमार्फत प्रवेश करत आहेत.
 तसेच याशिवाय सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि सशस्त्र सीमा दलातही (एसएसबी) महिलांची भरती अनुक्रमे 2013 आणि 2014 पासून सुरू झाली.
 आयटीबीपीमध्ये भरती होण्यासाठी परवानगी दिल्याने महिलांसंदर्भातील लावण्यात आलेले निर्बंध उठविण्यात आले आहेत. सरकारच्या नव्या अधिसूचनेमुळे आता पाचही ठिकाणी लढाऊ अधिकारी किंवा जवान म्हणून महिलांचा समावेश होणार आहे.
 एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी अलीकडेच महिलांना 33 टक्के कॉन्स्टेबल दर्जाच्या जागा सीआरपीएफ आणि सीआयएसएफमध्ये आणि बीएसएफ, एसएसबी आणि आयटीबीपीमध्ये 15 टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
 तसेच त्यानुसार 'सीएपीएफ'च्या इतिहासात प्रथमच वरिष्ठ पदावर महिला नेमण्यात आली असून, सशस्त्र सीमा दलाच्या महासंचालक म्हणून आयपीएस अधिकारी अर्चना रामसुंदरम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 भारत आणि चीनच्या 3 हजार 488 किलोमीटरच्या सीमेवर आयटीबीपीचे जवान तैनात असून, सरकारने अलीकडेच या दलात 500 महिलांची तुकडी तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.
 सध्या आयटीबीपीमध्ये 80 हजार जवान कार्यरत असून, महिलांची संख्या दीड हजार म्हणजे एकूण संख्येच्या पावणेदोन टक्केच आहे.
  • महिला शरीरसौष्ठव सरितादेवी ‘मिस इंडिया’ :
मणिपूरच्या सरितादेवीने आपल्या अनुभवाच्या जोरावर अपेक्षित बाजी मारताना, पहिल्यांदाच झालेल्या महिलांच्या राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत ‘मिस इंडिया’ किताब पटकावला.
 तसेच त्याच वेळी तिला कडवी झुंज देणाऱ्या महाराष्ट्राच्या सिबालिका सहाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
 प्रथमच रायगड जिल्ह्यात (रोहे) झालेल्या या दिमाखदार स्पर्धेद्वारे, भारतीय शरीरसौष्ठव क्षेत्राची ताकद दिसून आली.

Current Affairs March Part - 5


  • कॉफीटेबल बुक ‘आयकॉन्स ऑफ पुणे (वुमेन)’ :
पुण्यातील विविध क्षेत्रांतील कर्तबगार महिलांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणाऱ्या ‘आयकॉन्स ऑफ पुणे (वुमन)’ या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन (दि.19) ज्येष्ठ अभिनेत्री खासदार जया बच्चन यांच्या हस्ते होणार आहे.
 तसेच लोकमत मीडिया प्रा. लि.चे चेअरमन विजय दर्डा अध्यक्षस्थानी असतील.
 पुण्यातील नारीशक्तीला ‘लोकमत’ने नेहमीच भरभक्कम पाठिंबा दिला आहे.
 महिलांच्या जीवनोन्मुखतेने त्यांच्या कर्तबगारीला नेहमीच वेगळा आयाम दिलेला आहे, याचेच प्रत्यंतर हे कॉफीटेबल बुक वाचताना येईल.
 दोन वर्षांपासून ‘लोकमत’ने ‘वीणादेवी दर्डा जीवनगौरव पुरस्कार’ आणि ‘सौ. ज्योत्स्नादेवी दर्डा कार्यगौरव पुरस्कार’ सुरू केले आहेत.
 असामान्य कर्तृत्व गाजविणाऱ्या तेजस्विनींचा जागर संपूर्ण राज्यभर व्हावा व त्यांच्या कार्यातून महिलांना उमेद मिळावी, हाच यामागचा उद्देश आहे.
 ‘लोकमत’च्या वतीने विविध क्षेत्रांतील कर्तृत्वशालिनींचा राज्य पातळीवरील ‘लोकमत सखी सन्मान पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात येणार आहे.
 तसेच यामध्ये सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक, कला, शौर्य, क्रीडा आणि उद्योग या क्षेत्रांत उत्तुंग कार्य करणाऱ्या महिलांचा समावेश आहे.
  • एअरबसची 275 कोटींची गुंतवणूक :
विमाननिर्मिती क्षेत्रातील प्रसिध्द युरोपियन कंपनी एअरबस भारताच्या हवाई वाहतूक क्षेत्रात लवकरच 4 कोटी डॉलर्स (सुमारे 275 कोटी रूपये) गुंतवणार आहे.
 तसेच या गुंतवणुकीतून दिल्ली राजधानी क्षेत्रात (एनसीआर) एक अद्ययावत पायलट प्रशिक्षण, तसेच विमान दुरुस्ती प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा एअरबसचा इरादा आहे.

राष्ट्रीय पुरस्कार 2016

  • बाहुबली सर्वोत्कृष्ट चित्रपट तर बिग बी सर्वोत्कृष्ट अभिनेता
सर्वोच्च मानाचे समजले जाणा-या ६३व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा झाली असून आबालवृद्धांना भुरळ घालणा-या 'बाहुबली' चित्रपटाची सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून निवड झाली आहे. तर चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांची सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून आणि बॉलवूडची 'क्वीन' कंगना राणeवतला दुस-यांदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. 
राष्ट्रीय पुरस्कार यादी :
वडील व मुलीदरम्यानचे नाते सांगणा-या 'पिकू' चित्रपटातील भूमिकेसाठी अमिताभ बच्चन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

महाराष्ट्र अर्थीक पाहणी अहवाल २०१५-१६

आर्थिक पाहणी अहवाल २०१५- १६
कृषी व सलग्न क्षेत्राच्या उत्पादनात २.७ % घट होऊंनही राज्याचा आर्थिक विकास दर ८% राहिल्याचे राज्य सरकारने २०१५- १६च्या आर्थिक पाहणी अहवालात म्हटले आहे .
आर्थिक पाहणी चे निष्कर्ष :-
  •  ३,३३,१६० कोटींचे कर्ज,
  •  दरडोई २९,६४० रुपये कर्ज
  •  दरडोई उत्प्पन्न :- १३४०८७ रु
  •  विकास दर ८%, दरडोई उत्पन्नात ७ टक्के वाढ
  • महसुली तुट ३हजार ७५७ कोटी रु.
  • राज्यातील निर्यातील घट

ऑस्कर पुरस्कार

ऑस्कर पुरस्कार (८८ वा ) २०१६

  •  ‘८८ व्या यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ‘द रिव्हनंट’, ‘स्पॉटलाईट’ आणि ‘मॅड मॅक्स फ्युरी रोड’ या चित्रपटांनी बाजी मारली. ‘
  • स्पॉटलाईट’ चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान पटकाविला. तर याच चित्रपटासाठी जॉश सिंगर आणि टॉम मॅकार्थी यांना सर्वोत्कृष्ट पटकथेचा सन्मान मिळाला.
  • सहावेळा ऑस्करने हुलकावणी दिल्यानंतर अखेर लिओनार्डो दि कॅप्रिओ’ला ‘द रिव्हनंट’ मधील मुख्य भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून ऑस्कर पुरस्काराने गौरविण्यात आले. तर अभिनेत्री ब्री लार्सनला ‘रुम’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

अर्थसंकल्प 2016 17

अर्थसंकल्प 2016-17 ठळक घडामोडी   


महाग  - कार, सोने, तंबाखू, सिगरेट, गुटखा, हिरे, ब्रँडेड कपडे
बजेट थोडक्यात -
१.कृषी, ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी भरघोस तरतूद.
२.रस्ते, रेल्वे सारख्या पायाभूत सुविधांना प्राधान्य.
३.कररचना जैसे थे.
४.श्रीमंतांवर वाढीव कर

कररचना
*उत्पन्न - अडीचलाखापर्यंत - कोणताही उत्पन्न कर नाही 
*अडीच लाख ते 5 लाख - 10 % + तीन हजारांची अतिरिक्त सूट
*5 लाख ते 10 % - 20% 
*दहा लाखांपेक्षा अधिक - 30 %

RTE Act 2009

Right To Education Act 2009
RTE- 2009 चे कलमे- सदर अधिनियमात एकूण ३८ कलम आहेत. त्या कलमांचे शीर्षक, कलम क्रमांकानुसार खालीलप्रमाणे.
  1. कलम क्रमांक १ = संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ.
  2. कलम क्रमांक २ = व्याख्या.
  3. कलम क्रमांक ३ = मोफत व सक्तीचे शिक्षण अधिकार.
  4. कलम क्रमांक ४ = वयानुरूप प्रवेश (थेट).
  5. कलम क्रमांक ५ = दाखला हस्तांतरण.
  6. कलम क्रमांक ६ = शाळा स्थापन.
  7. कलम क्रमांक ७ = आर्थीक व इतर जबाबदाऱ्या.
  8. कलम क्रमांक ८ = शासनाची कर्तव्ये.
  9. कलम क्रमांक ९ = स्थानिकप्राधिकरण कर्तव्ये.

प्रमुख नद्या आणि त्यांचा उगम

भारतातील काही महत्वाच्या नद्या आणि त्यांची उगमस्थाने :

  1. गंगा----------गंगोत्री ( उत्तराखंड )
  2. यमुना----------यमुनोत्री ( उत्तराखंड )
  3. सिंधू------------मानसरोवर (तिबेट )
  4. नर्मदा----------मैकल टेकडया , अमरकंटक ( मध्यप्रदेश )
  5. तापी------------सातपुडा पर्वत , बैतुल (मध्यप्रदेश )
  6. महानदी--------नागरी शहर( छत्तीसगड )
  7. ब्रम्हपुत्रा--------चेमायुंगडुंग( तिबेट )
  8. सतलज---------कैलास पर्वत( तिबेट )
  9. व्यास-----------रोहतंग खिंड ( हिमाचल प्रदेश )
  10. गोदावरी-------त्र्यंबकेश्वर , नाशिक
  11. कृष्णा----------महाबळेश्वर
  12. कावेरी----------ब्रम्हगिरी टेकड्या , कूर्ग ( कर्नाटक )
  13. साबरमती------उदयपूर , अरावली टेकड्या ( राजस्थान )
  14. रावी-----------चंबा ( हिमाचल प्रदेश )
  15. पेन्नर-----------नंदी टेकड्या , चिकबल्लापूर ( कर्नाटक

महाराष्ट्रातील प्रमुख कृषी संशोधन संस्था

महाराष्ट्रातील प्रमुख कृषी संशोधन संस्था
  1. मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, --------- पाडेगांव (सातारा) 
  2. गवत संशोधन केंद्र, ------------------- पालघर (ठाणे)
  3. नारळ संशोधन केंद्र, ------------------ भाटय़े (रत्नागिरी)
  4. सुपारी संशोधन केंद्र, ------------------ श्रीवर्धन (रायगड)
  5. काजू संशोधन केंद्र, -------------------- वेंगुर्ला (सिंधुदुर्ग)
  6. केळी संशोधन केंद्र, -------------------- यावल (जळगाव)
  7. हळद संशोधन केंद्र, -------------------- डिग्रज (सांगली)
  8. राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, हिरज ---केगांव (सोलापूर)
  9. राष्ट्रीय कांदा- लसून संशोधन केंद्र -----राजगुरूनगर (पुणे)

भारतातील प्रमुख शिखरे


हिमालय पर्वतातील प्रमुख शिखरे

शिखराचे नाव:- उंची (मीटर):- देश
  1. माऊंट एव्हरेस्ट:- 8,850:- नेपाळ
  2. के2 (गॉडविन ऑस्टिन):- 8,611:-भारत
  3. कांचनगंगा:- 8,598:- भारत
  4. धौलगिरी:- 8,172:- नेपाळ
  5.  नंगा पर्वत:- 8,126:- भारत
  6. नंदादेवी:- 7,717:- भारत
  7. राकापोशी:- 7,788:- भारत
  8. त्रिशूल:- 7,140:- भारत
  9. बद्रीनाथ:- 7,138:- भारत

सर्वोच्च न्यायालय

  • भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची माहिती:
भारतीय संविधानाच्या 5 व्या आणि 6 व्या भागामध्ये कलम 124 ते 146 मध्ये न्यायपालिकेची तरतूद करण्यात आलेली आहे. या तरतुदीमध्ये भारतीय संघ राज्यात स्वतंत्र न्यायपालिका राहील अशी तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळेच स्वतंत्र भारतामध्ये 26 जानेवारी 1950 रोजी भारताची राज्यघटना अंमलात आल्यानंतर त्याच दिवशी भारतीय सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली.
 इंग्रजांच्या कालावधीमध्ये 1773 मध्ये नियामक कायद्याच्या माध्यमातून कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती आणि 1862 मध्ये मुंबई, मद्रास, कलकत्ता या विभागामध्ये उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली.
 भारतीय लोकशाही व्यवस्थेमध्ये कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ ही तीन प्रमुख अंगे म्हणून ओळखली जातात. त्यापैकी न्यायमंडळाला

भारतीय राज्यघटनेचे स्वरूप

भारतीय राज्यघटना:

एकूण २२ भाग आणि १२ परिशिष्टे

भाग :
  1. भाग I (कलम १-४): संघराज्य व त्यांचे राज्य क्षेत्र
  2. भाग II (कलम ५-११): नागरिकत्व
  3. भाग III (कलम १२-३५): मूलभूत अधिकार
  4. भाग IV (कलम ३६-५१): मार्गदर्शक तत्वे
  5. भाग IV (A) (कलम ५१A): मूलभूत कर्तव्ये
  6. भाग V (कलम ५२-१५१) - केंद्र सरकार (संघराज्य)
  7. भाग VI (कलम १५२-२३७) - राज्य सरकार
  8. भाग VII (कलम २३८) - अनुसूचित राज्य सूची (ब)
  9. भाग VIII (कलम२३९-२४१) - केंद्रशासित प्रदेश क्षेत्र
  10. भाग IX (कलम २४२-२४३) - पंचायतराज
  11. भाग X (कलम २४४-२४४A) - अनुसूचित जाती व जमाती प्रदेश/क्षेत्र
  12. भाग XI (कलम २४५-२६३) - केंद्र - राज्य संबंध
  13. भाग XII (कलम २६४-३००A) - महसुल - वित्त

राज्यपाल : अधिकार

भारतीय संविधानाने राज्‍यपालास दिलेले महत्त्वपूर्ण अधिकार:-


अ) कार्यकारी अधिकार:-
मुख्‍यमंत्र्यांची नेमणूक करणे व मुख्‍यमंत्र्यांच्‍या सल्‍ल्‍याने इतर मंत्र्यांची नेमणूक करणे. राज्‍याचा महाधिवक्‍ता, राज्‍य लोकसेवा आयोगाचे अध्‍यक्ष व सदस्‍य यांची नेमणूक, राज्‍यातील उच्‍च न्‍यायालयातील न्‍यायाधीशांची नियुक्‍ती करतांना राष्‍ट्रपती राज्‍यपालांचा सल्‍ला घेतात. जिल्‍हा न्‍यायालयातील न्‍यायाधीशांच्‍या नेमणुका करणे हे राज्‍यपालांचे कार्यकारी अधिकार आहेत.
ब) कायदेविषयक अधिकार:-
राज्‍यविधि‍मंडळाचे अधिवेशन बोलावणे, ते स्‍थगित करणे, त्‍याच्‍यासमोर अभिभाषण करणे, विधानसभा बरखास्‍त करणे, निवडणुकीनंतर विधानसभेच्‍या पहिल्‍या बैठकीला संबोधित करणे. विधिमंडळाने पारित केलेल्‍या विधेयकाला राज्‍यपालाच्‍या स्‍वाक्षरीशिवाय कायद्याचे स्वरूप प्राप्‍त होत नाही. तो एखादे विधेयक पुर्नविचारार्थ परत पाठवू शकतो किंवा राष्‍ट्रपतीच्‍या सहमतीसाठी राखून ठेवू शकतो.