Post views: counter

How to join eMPSCkatta telegram channel ?

eMPSCkatta टेलिग्राम  चॅनेल वर जॉईन कसे व्हायचे ?


  • आमच्या ब्लॉग वरील अपडेट्स तुमच्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आताच जॉईन करा आमचे eMPSCkatta टेलिग्राम चॅनेल .
  • eMPSCkatta टेलिग्राम  चॅनेल जॉईन करणे एकदम सोपे आहे . 
  • eMPSCkatta टेलिग्राम चॅनेल मध्ये आपण जॉईन होण्यासाठी whats App प्रमाणे , कुठेही admin ला msg वगैरे करत बसावं लागत नाही , कि माझा नंबर तुमच्या ग्रुप ला add करा . 
  • तुम्ही स्वतः eMPSCkatta टेलिग्राम चॅनेल जॉईन करू शकता , तेही 2 ते 3 सोप्या स्टेप मध्ये .
Post views: counter

Current Affairs April 2016 Part - 4


  • अभियान:-
उमेद:-
• मानवाचा सर्वागीण विकास करण्याच्या दृष्टीने ग्रामविकास व महिला आणी बालविकास विभागाची अत्यंत महत्वाची भूमिका आहे. गरीबी दूर करून त्यांना आत्मसन्मानाचे व प्रतिष्टेचे जीवन जगता यावे, गरीबांना सकस अन्न, अंगभर वस्रे पक्का निवारा,आरोग्याच्या उत्तम सुविधा आणी दर्जेदार शिक्षण मिळावे आणी त्यांची जीवनोंन्ती व्हावी या उद्देशाने शासनाने उमेद अभियान सुरु केले
• या अभियानात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूबातील\ महिला व युवक- युवती तसेच शेतमजूर , मजूर भूमिहीन, कामगार आणी आदिवासी आदी कुटूबातील किमानएक महीलेचा बचतगटात समावेश करण्यात येणार आहे.

 खेलो इंडिया’:-
• भारतातील क्रीडा विकास आणि प्रसार यासाठी केंद्र सरकारने आपल्या योजनेचे ‘खेलो इंडिया’ असे नव्याने नाव ठेवले यापूर्वी ही योजना ‘राजीव गांधी खेल अभियान’ या नावाने प्रचलित होती.
• यापूर्वीच्या काँग्रेस सरकारने देशातील क्रीडा विकासासाठी ‘राजीव गांधी खेल अभियान’ योजनेखाली सर्वांना एकत्र आणले होते.
• काँग्रेस सरकारने २०१४ मध्ये ही योजना पंचायत युवा क्रीडा आणि खेल अभियान या योजनेच्या जागेवर सुरू केली होती.
• या योजनेअंतर्गत ‘अर्बन स्पोर्टस इन्फ्रास्ट्रक्चरर’ आणि राष्ट्रीय क्रीडा गुणवत्ता शोध हे दोन प्रकल्प ‘खेलो इंडिया’ मध्ये वर्ग करण्यात आले आहेत.

चर्चित खेळाडू:-
* रोहिणी राऊत:-
• नागपूरची आंतरराष्ट्रीय महिला धावपटू रोहिणी राऊत उत्तेजक द्रव्य सेवन चाचणीत दोषी आढळून आली
• राष्ट्रीय उत्तेजकविरोधी संघटनेने (नाडा) फेब्रुवारी महिन्यात दिल्ली मॅरेथॉनदरम्यान घेतलेल्या चाचणीत रोहिणीने बंदी असलेले व कामगिरी उंचावणारे उत्तेजक घेतल्याचे निष्पन्न झाले. त्यात रोहिणीच्या मुत्राच्या नमुन्यात नॅनड्रोलोन हे उत्तेजक असल्याचा अहवाल ‘नाडा’ने दिला

Current Affairs April 2016 Part - 3

  • देशातील तीन वारसा स्थळांचे अस्तित्व धोक्यात
" डब्लूडब्लूएफ 'चा अहवाल; वृक्षतोड , खाण उद्योगाचे संकट  कोची - नैसर्गिक वनसंपदेने नटलेले पश्चिम घाट , सुंदरबन राष्ट्रीय उद्यान आणि मानस अभयारण्य या तिन्ही जागतिक वारसा स्थळांचे अस्तित्व खाण आणि तत्सम स्वरूपाच्या उद्योगांमुळे धोक्यात आल्याचे "वर्ल्ड वाईल्डलाईफ फंड ' (डब्लूडब्लूएफ ) या संस्थेने केलेल्या ताज्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे . खाण उद्योगाप्रमाणेच बेकायदा वृक्षतोड , तेल आणि नैसर्गिक वायूच्या शोधासाठी सुरू असलेले सर्वेक्षण यामुळे 229 पैकी 114 नैसर्गिक वारसा स्थळांना थेट धोका निर्माण झाला असून , यामध्ये सुंदरबन, पश्चिम घाट आणि आसाममधील मानस अभयारण्याचा समावेश आहे.
सुंदरबनमधील वाघ आणि "मानस ' मधील गेंड्यांची यामुळे घुसमट होऊ लागली आहे . पश्चिम घाटाची व्याप्ती ही गुजरात , महाराष्ट्र , गोवा , कर्नाटक , तमिळनाडू आणि केरळ या राज्यांमध्ये दिसून येते . या ठिकाणी खाण उद्योग आणि नैसर्गिक वायूच्या शोधासाठी सुरू असलेल्या सर्वेक्षणामुळे पर्यावरणचक्र बिघडण्याचा धोका आहे . मानस अभयारण्यास धरणे आणि पाण्याचा होत असलेला वारेमाप वापर यांचा फटका बसत असल्याचे हे सर्वेक्षण सांगते . सुंदरबन अभयारण्य हे पश्चिम बंगाल आणि बांगलादेशाच्या सीमेवर असून , येथेही पाण्याचा अतिरेकी वापर , धरणांचे बांधकाम , वृक्षतोड, अतिरिक्त मासेमारी , मासेमारीसाठी मोठ्या प्रमाणावर खोदले जाणारे चर यामुळे पर्यावरणासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
वन्य प्राण्यांवर संकट
पश्चिम घाट परिसर हा आशियाई सिंह , रानगवे यांचे हक्काचे निवासस्थान म्हणून ओळखले जाते . येथील वृक्षराजी झपाट्याने संपत असल्याने या प्राण्यांसमोर आता जायचे कोठे , असा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे . नेमकी हीच अवस्था सुंदरबनमधील वाघांची झाली असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे .
वारसा स्थळांची संपत्ती
" युनेस्को ' ने तयार केलेल्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमधील दोन तृतीयांश स्थळे ही नैसर्गिक साधनसामग्रीने परिपूर्ण आहेत. त्यांच्यामुळेच पूर, भूस्सखलनासारख्या संकटांची तीव्रता कमी होते . देशातील 11 दशलक्ष एवढे लोक अन्न , पाणी, निवारा आणि औषधांसाठी थेट या वारसा स्थळांवर विसंबून असल्याचे " डब्लूडब्लूएफ ' च्या पाहणीतून स्पष्ट झाले आहे .
मानवी अस्तित्व आणि चिरंतन विकासामध्ये या वारसा स्थळांची मोठी भूमिका असून , त्यांच्याशिवाय आपण जगू शकत नाही , त्यामुळे त्यांच्या संरक्षणासाठी आपल्याला प्रयत्न करणे गरजेचे आहे .
  • राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कारांचे वितरण :
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते (दि.12) 56 दिग्गजांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले.

राष्ट्रपती भवनात हा कार्यक्रम पार पडला.

Current Affairs April 2016 Part - 2


  • क्रिकेट स्टेडियमला डॅरेन सॅमीचे नाव :
वेस्ट इंडीजला टी-20 वर्ल्डकप जिंकून देणारा कर्णधार डॅरेन सॅमी याचे नाव सेंट ल्युसिया येथील एका क्रिकेट स्टेडियमला दिले जाणार आहे. ब्युसेजोर क्रिकेट मैदान आता ‘डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट ग्राऊंड’ नावाने ओळखले जाईल. एका भागाला सेंट ल्युसियाचाच अन्य एक खेळाडू जॉन्सन चार्ल्स याचेही नाव असेल. जॉन्सन चार्ल्सदेखील टी-20 वर्ल्डकप जिंकणाऱ्या संघाचा सदस्य आहे. वेस्ट इंडीज क्रिकेट मंडळानुसार, सेंट ल्युसियाचे पंतप्रधान कॅनी डी अँथोनी यांनी याबाबतची घोषणा केली. वेस्ट इंडीजने 2012 मध्ये जेव्हा टी-20 वर्ल्डकप जिंकला होता, तेव्हाही सॅमी हाच कर्णधार होता.
  • स्मार्ट फोनवर विना इंटरनेट पहा दूरदर्शन सेवा :
सध्याच्या टेक्नोसॅव्ही युगाच मोबाईल युझर्सची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. तसेच ही बाब लक्षात घेऊन 'दूरदर्शन' चॅनेलने एक पाऊल पुढे टाकत नवी सुविधा आणली असून त्याद्वारे आता मोबाईलवरही 'दूरदर्शन' चॅनेल पाहता येणार आहे.  देशांतील 16 शहरांमध्ये दूरदर्शनतर्फे ही सुविधा विनाइंटरनेट उपलब्ध करून देण्यात आली आहे. 25 फेब्रुवारीपासून दिल्ली, मुंबई, औरंगाबाद, कोलकाता, चेन्नी, गुवाहाटी, पाटणा, रांची, लखनऊ, जालंधर, रायपूर, इंदौर, भोपाळ, बंगळुरू आणि अहमदाबाद या शहरांमध्ये दूरदर्शनची डिजीटल टेलिव्हिजन सेवा सुरू झाली असून आता ग्राहकांना मोबाईलवरही दूरदर्शनचे कार्यक्रम पाहता येणार आहेत.
  • चीनकडून 'विज्ञान उपग्रहा'चे प्रक्षेपण :
गुरुत्वाकर्षण (मायक्रोग्रॅव्हिटी) आणि अवकाशामधील विविध घटकांचा अभ्यास करण्याच्या उद्देशार्थ चीनने (दि.6) एका उपग्रहाचे (SJ-10) प्रक्षेपण केले. चीनमधील गोबीच्या वाळवंटातील जिउकान उपग्रहण उड्डाण केंद्रामधून या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. तसेच हा उपग्रह विशिष्ट काळानंतर पुन्हा पृथ्वीवर परतणार असून या काळात अवकाशात मिळविलेल्या माहितीचे

Current Affairs April 2016 Part - 1

  • * ज्येष्ठ नागरिक व 45 पेक्षा अधिक वयाच्या महिला, तसेच गर्भवती महिलांसाठी रेल्वेमधील आरक्षण ५० टक्क्यापर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रत्येक रेल्वेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना 90 बर्थ उपलब्ध होणार आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी 1 एप्रिलपासून करण्यात येणार आहे
  • * होलिकोत्सवाची पर्वणी साधून केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी सहा टक्के महागाई भत्त्याचा हप्ता देण्याची घोषणा केली.
  • * मराठवाड्याच्या वेगळ्या राज्याला आपला पाठिंबा असेल, असे वादग्रस्त विधान केल्याने सरकारला अडचणीत आणणारे ज्येष्ठ विधिज्ञ श्रीहरी अणे यांनी आज महाधिवक्तापदाचा राजीनामा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे दिला
  • * येत्या एक एप्रिलपासून आणखी दहा राज्यांमध्ये अन्नसुरक्षा कायद्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरणमंत्री रामविलास पासवान यांनी जाहीर केले. यामुळेया कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या राज्यांची एकूण संख्या 21 होणार आहे.
  • * राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण धोरण (एनटीसीपी) तयार करण्याची आवश्यकता असल्याची शिफारस यासंदर्भातील संसदीय समितीने केली आहे.समानता असलेले आणि सुधारणावादी राष्ट्रीय धोरण तयार करण्याची आवश्यकता असून, या धोरणात उद्दिष्ट्ये आणि ध्येय निश्चित करण्याची गरज असल्यावर संसदीय समितीने भर दिला आहे.