- देशातील तीन वारसा स्थळांचे अस्तित्व धोक्यात
" डब्लूडब्लूएफ 'चा अहवाल; वृक्षतोड , खाण उद्योगाचे संकट कोची - नैसर्गिक वनसंपदेने नटलेले पश्चिम घाट , सुंदरबन राष्ट्रीय उद्यान आणि मानस अभयारण्य या तिन्ही जागतिक वारसा स्थळांचे अस्तित्व खाण आणि तत्सम स्वरूपाच्या उद्योगांमुळे धोक्यात आल्याचे "वर्ल्ड वाईल्डलाईफ फंड ' (डब्लूडब्लूएफ ) या संस्थेने केलेल्या ताज्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे . खाण उद्योगाप्रमाणेच बेकायदा वृक्षतोड , तेल आणि नैसर्गिक वायूच्या शोधासाठी सुरू असलेले सर्वेक्षण यामुळे 229 पैकी 114 नैसर्गिक वारसा स्थळांना थेट धोका निर्माण झाला असून , यामध्ये सुंदरबन, पश्चिम घाट आणि आसाममधील मानस अभयारण्याचा समावेश आहे.
सुंदरबनमधील वाघ आणि "मानस ' मधील गेंड्यांची यामुळे घुसमट होऊ लागली आहे . पश्चिम घाटाची व्याप्ती ही गुजरात , महाराष्ट्र , गोवा , कर्नाटक , तमिळनाडू आणि केरळ या राज्यांमध्ये दिसून येते . या ठिकाणी खाण उद्योग आणि नैसर्गिक वायूच्या शोधासाठी सुरू असलेल्या सर्वेक्षणामुळे पर्यावरणचक्र बिघडण्याचा धोका आहे . मानस अभयारण्यास धरणे आणि पाण्याचा होत असलेला वारेमाप वापर यांचा फटका बसत असल्याचे हे सर्वेक्षण सांगते . सुंदरबन अभयारण्य हे पश्चिम बंगाल आणि बांगलादेशाच्या सीमेवर असून , येथेही पाण्याचा अतिरेकी वापर , धरणांचे बांधकाम , वृक्षतोड, अतिरिक्त मासेमारी , मासेमारीसाठी मोठ्या प्रमाणावर खोदले जाणारे चर यामुळे पर्यावरणासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
वन्य प्राण्यांवर संकट
पश्चिम घाट परिसर हा आशियाई सिंह , रानगवे यांचे हक्काचे निवासस्थान म्हणून ओळखले जाते . येथील वृक्षराजी झपाट्याने संपत असल्याने या प्राण्यांसमोर आता जायचे कोठे , असा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे . नेमकी हीच अवस्था सुंदरबनमधील वाघांची झाली असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे .
वारसा स्थळांची संपत्ती
" युनेस्को ' ने तयार केलेल्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमधील दोन तृतीयांश स्थळे ही नैसर्गिक साधनसामग्रीने परिपूर्ण आहेत. त्यांच्यामुळेच पूर, भूस्सखलनासारख्या संकटांची तीव्रता कमी होते . देशातील 11 दशलक्ष एवढे लोक अन्न , पाणी, निवारा आणि औषधांसाठी थेट या वारसा स्थळांवर विसंबून असल्याचे " डब्लूडब्लूएफ ' च्या पाहणीतून स्पष्ट झाले आहे .
मानवी अस्तित्व आणि चिरंतन विकासामध्ये या वारसा स्थळांची मोठी भूमिका असून , त्यांच्याशिवाय आपण जगू शकत नाही , त्यामुळे त्यांच्या संरक्षणासाठी आपल्याला प्रयत्न करणे गरजेचे आहे .
- राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कारांचे वितरण :
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते (दि.12) 56 दिग्गजांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले.
राष्ट्रपती भवनात हा कार्यक्रम पार पडला.