Post views: counter

Current Affairs Aug 2016 Part -3


चालू घडामोडी:-
---------------------------------
१) गुजरात भाजपा ने----------------------- यांना गुजरात चे नवीन मुख्यमंत्री म्हणून निवड केली:- विजय रूपाणी

२) 23 वां राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार ------------ यांना जाहीर झाला - शुभा मुदगल

३) -------------------- या भारतीय महिलेचीप्रथमच अंतरराष्ट्रीय ओलंपिक समिति चे सदस्य म्हणून निवड केली - टीना अंबानी

४) रियो-डि-जेनेरो येथे सुरूअसलेली---------------- व्या क्रमांकाची स्पर्धा - 3 वी

५) रियो ओलंपिक स्पर्धेत भाग घेणारी सर्वात कमी वयाची खेळाडू --- यादेशाचीआहे:- गौरिका सिंह (नेपाळ वय:- १३वर्ष)

६) नेपाळ चे प्रधानमंत्री म्हणून ---------------- यांची आत्ताच निवड करण्यात आली :- पुष्प कमल दहल/प्रचंड

७)2014-15 पर्यटन पुरस्कारामध्ये सर्वश्रेष्ठ राज्यचा पुरस्कार ------------ याला जाहीर झाला:- मध्य प्रदेश

८) ‘आर डी बर्मनिया: पंचमेमोयर्स’ या पुस्तकाचे लेखक:- चैतन्य पादुकोण

९) भारतीय महिला क्रिकेट टीम ची उप-कप्तान हरमनप्रीत कौर ------------ या देशाची ‘महिला बिग बैश टी-20 लीग’ ही स्पर्धा खेळणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटरबनली:- ऑस्ट्रेलिया

१०) इंडिया राइजिंग: फ्रेश होप, न्यू फीयर्स’ या पुस्तकाचे लेखक:- रवि वेल्लूर
११) प्रो-कबड्डी सीज़न-4 चा विजेता:- पटना पायरेट्स

१२) न्यायमूर्ति दिलीप बाबा साहेब भोसले ने ---------- याउच्च न्यायालयाच्या के मुख्य न्यायाधीश पदाची शपथघेतली:- अलाहाबाद उच्च न्यायालय

१३) ऑक्टोंबर २०१६ मध्ये होणाऱ्या कबड्डी विश्वकप स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशामध्ये होणारआहे:- भारत

१४) चिंधी रॅग्स टू रिचेस आणी विदाऊट फायरिंग सिंगल बुलेट’ या पुस्तकाचे ---- हे लेखक :-ज्योतिर्मय डें(जे.डे.)

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹मराठीप्रश्नी गोवा सरकारची डबलगेम

मराठीला राजभाषेचा दर्जा द्यावा असा डिचोलीचे अपक्ष आमदार नरेश सावळ यांनी मांडलेला खासगी ठराव शुक्रवारी विधानसभेत सर्वानुमते संमत झाला तरी मराठी राजभाषेचा प्रश्न संपलेला नाही. केवळ
Post views: counter

Current Affairs Aug 2016 Part - 4


महत्वाचे:-
* केरळ राज्याने देशातील प्रथमच फॅट टॅक्स लागू केलाआहे.बर्गर , पिझा. सारख्या खाद्य पदार्थावर १४.५%  फॅट टॅक्स

* सुशीला कार्की नेपाळ ची पहिली महिला मुख्य न्यायाधीश

* राधिका मेनन पुरस्कार IMO (International Meritime Organisation) जिंकणारी जगातील पहिली  महिला

* केंद्र सरकानेबिहारच्यामोतीहारी(पूर्वचम्पारण) येथे कृषी व डेअरी विकास केंद्राची स्थापना

* नीती आयोगाने पंतप्रधान कार्यालयाला एक२० पाणी दस्तऐवज सादर केला आहे ज्यानुसार रेल्वे अर्थसंकल्प सादर करण्याची परंपरा समाप्त करावी अशी शिफारस करण्यात आली

* जीएसटी विधेयक एकमताने मंजूर करणारे आसाम  हे देशातील पहिले राज्य ठरले

* जागतिक आर्थिक मंच च्या २०१६ या वर्षातील वार्षिक बैठकीची  चौथी औद्योगिक क्रांती  ही थीम होती

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹प्रतिष्ठित औषध कंपन्यामध्ये भारत आघाडीवर

ब्लूबाइट्स या संस्थेने टीआरए रिसर्च या संस्थेबरोबर केलेल्या सर्वेक्षणानुसार जगातील प्रतिष्ठित औषध कंपन्यामध्ये भारतीय कंपन्या आघाडीवर आहेत.
‘इंडियाज् मोस्ट रेप्युटेड ब्रँड्स’ असे या सर्वेक्षण अहवालाचे नाव आहे.
सर्वाधिक प्रतिष्ठित औषध कंपनी म्हणून १९६८पासून कार्यरत असणाऱ्या व ३०२९.५ कोटी रुपये महसूल असणाऱ्या ल्युपिन कंपनीची निवड झाली आहे.
Post views: counter

Current Affairs August 2016 part - 2


#eMPSCkatta_Current_Affairs

🔹इराणच्या अणू शास्त्रज्ञाला दिली गुप्तरीत्या फाशी ?

हेरगिरी करणारा इराणचा अणू शास्त्रज्ञ शहराम अमिरी याचा गुप्तरीत्या मृत्यू झाला आहे. अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने 2010मध्ये हेरगिरी करताना त्याला अटक केले होते. त्यानंतर त्याला इराणला परत पाठविण्यात आले. त्यानंतर तो रहस्यमयरीत्या गायब झाला होता. बीबीसीनं दिलेल्या वृत्तानुसार, अमिरी याला याच आठवड्यात गुप्तरीत्या फाशी दिली गेली आहे.
अमिरीच्या मृतदेहाच्या गळ्याला फास लावल्याचा खुणा होत्या. त्यामुळे त्याला फाशी देण्यात आली असावी, अशी माहिती त्याच्या आईनं दिली आहे. अमिरीचा 1977मध्ये जन्म झाला होता. त्यानंतर 2009साली गेलेल्या मक्का यात्रेत तो बेपत्ता झाला होता. तो इराणमधला नावाजलेला अणू शास्त्रज्ञ होता.
अमेरिकेच्या गुप्तचर विभागानं अटक केल्यानंतर त्यासंदर्भात एक व्हिडीओही व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओमध्ये त्याला एका निर्जनस्थळी ठेवले असून, भूल देणारनं इंजेक्शन दिल्याचं त्यानं सांगितले होते.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹NSG साठी पाठिंबा देण्यास नकार देणा-या चीनला हवी आहे भारताची मदत

न्यूक्लियर सप्लायर ग्रुप (एनएसजी) देशांच्या गटात भारताच्या समावेशाला आव्हान देणा-या चीनने दक्षिण चीन समुद्राचा मालकी हक्क मिळवण्यासाठी भारताची मदत मागितली आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी तीन दिवसांच्या भारत दौ-यावर येत आहेत. 12 ऑगस्टपासून त्यांच्या दौ-याला सुरुवात होणार आहे. या दौ-यात वांग यी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार असून जी20 बैठकीत भारताने दक्षिण चीन समुद्राचा मुद्दा उचलू नये यासाठी प्रयत्न करणार आहे. भारताने आपल्या बाजूने उभे राहावे अशी चीनची अपेक्षा आहे.

दक्षिण चीन समुद्रावर चीनने केलेला मालकी हक्काचा दावा अयोग्य असून त्याला कायदेशीर व ऐतिहासिक आधार नाही, असा निकाल द हेग येथील आंतरराष्ट्रीय लवादाने दिला होता. फिलिपिन्सने दाखल केलेल्या या खटल्यावरील निकाल जाहीर होताच चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग आणि चिनी परराष्ट्र मंत्रालयाने तो मान्य करण्यास साफ नकार दिला. आंतरराष्ट्रीय लवाद बेकायदेशीर असून दक्षिण चीन समुद्रातील वाद हा त्याच्या अधिकार कक्षेतील विषय नाही, असे चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग आणि चिनी परराष्ट्र मंत्रालय यांच्या वतीने सांगण्यात आले होते.

आंतरराष्ट्रीय लवादाने दिलेल्या या निकालानंतर अमेरिकेसह अनेक देश हा मुद्दा उचलून धरतील याची चीनला भीती वाटत आहे.

चीनने १९४७ साली प्रसिद्ध केलेल्या नकाशांमध्ये सर्वप्रथम ‘नाइन डॅश लाइन’ नावाने साधारण अर्धगोलाकार सीमा आखून दक्षिण चीन समुद्राच्या ९० टक्क्यांहून अधिक भागावर आपल्या मालकी हक्काचा दावा केला. शेकडो वर्षांपूर्वी चीनच्या सम्राटांनी या भागातील बेटांचा शोध लावला आणि तेथे पूर्वापार चीनचे मच्छीमार व्यापार करीत आहेत. त्यामुळे तो भाग आपलाच आहे, असा चीनचा दावा आहे. त्याला शेजारील फिलिपिन्स, व्हिएतनाम, मलेशिया, इंडोनेशिया, तैवान, ब्रुनेई आदी देशांचा विरोध असून या सर्व देशांनीही या प्रदेशावर आपापल्या मालकी हक्काचा दावा केला आहे.

गेल्या काही वर्षांत चीनने अन्य सर्व देशांचे दावे धुडकावून संपूर्ण दक्षिण चीन समुद्रावर आपला हक्क सांगितला आहे. तसेच तेथे भराव टाकून कृत्रिम बेटे तयार करण्याचा सपाटा लावला आहे. जानेवारी २०१३ मध्ये चीनच्या नौदलाने फिलिपिन्सच्या लुझॉन बेटांजवळील स्कारबरो शोल नावाने ओळखल्या जाणाऱ्या बहुतांशी पाण्याखाली असलेल्या खडकाळ बेटांच्या रांगेचा जबरदस्तीने ताबा घेतला. तत्पूर्वी दोन्ही देशांत १७ वर्षे वाटाघाटी सुरू होत्या. पण त्यातून मार्ग न निघाल्याने फिलिपिन्सने २०१३ साली हा प्रश्न द हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेला होता. त्यावर सुनावणी होऊन मंगळवारी निकाल देण्यात आला. तो चीनने धुडकावल्याने हा प्रश्न चिघळण्याची शक्यता आहे. अमेरिका, जपान आणि अन्य देशांनी या प्रदेशात चीनच्या अरेरावीला उत्तर देण्यासाठी आघाडी उघडली असून नौदलाच्या हालचाली वाढवल्या आहेत.

Current Affairs August 2016 Part - 1


#eMPSCkatta_Current_Affairs

🔹स्पर्धा परीक्षांची पुस्तके आता ब्रेल , ऑडिओमध्येही

प्रज्ञाचक्षू (अंध) मुलांना स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणे सोपे जावे यासाठी दीपस्तंभ फाउंडेशनच्या " मनोबल ' या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रथमच ब्रेल आणि ऑडिओ स्वरूपात स्पर्धा परीक्षांची पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या आगळ्या उपक्रमाचा लाभ परीक्षांची तयारी करणाऱ्या असंख्य प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांना होत आहे . असा प्रयोग करणारी "दीपस्तंभ ' ही पहिली संस्था ठरली आहे .

अंध, अपंग आणि कर्णबधिर मुलांनादेखील स्पर्धा परीक्षा देता याव्यात, त्यांच्यातून चांगले अधिकारी घडावेत हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून यजुर्वेंद्र महाजन यांनी "मनोबल ' हा आगळा उपक्रम साकारला . मनोबलमध्ये आजमितीस विविध ठिकाणचे विद्यार्थी निवासी आहेत. या विद्यार्थ्यांकडून स्पर्धा परीक्षांची तयारी करवून घेतली जाते. चतुर्थ वर्ग ते प्रथम दर्जाचा अधिकारी होण्यासाठी जी पुस्तके आवश्यक असतात ती सर्व पुस्तके "मनोबल ' मध्ये ब्रेलमध्ये उपलब्ध आहेत. मुंबईच्या ब्रेल लिपी प्रकाशन आणि पुण्याच्या निवांत प्रकाशनाने ही पुस्तके प्रकाशित केली आहेत. यामध्ये चालू घडामोडी , इंग्रजी, इतिहास , अर्थशास्त्र , समाजशास्त्र आदी विषयांच्या पुस्तकांचा समावेश आहे . विशेष म्हणजे ही पुस्तके हिंदी , मराठी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांत आहेत.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹आनंदीबेन यांना हवी स्वेच्छानिवृत्ती

गुजरातचे नेतृत्व नव्या दमाच्या नेत्याकडे देण्याची वेळ आली असल्याचे सांगत मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी दाखविली आहे . हे पत्र पक्षश्रेष्ठींकडे पाठवून नंतर "फेसबुक' द्वारे त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

" मी नोव्हेंबरमध्ये वयाची पंच्याहत्तर वर्षे पूर्ण करत आहे . त्यामुळे पुढील विधानसभा निवडणुकीपूर्वी आणि 2017 मधील व्हायब्रंट गुजरात परिषदेपूर्वी राज्याला नवे नेतृत्व मिळणे आवश्यक आहे ,' असे आनंदीबेन पटेल यांनी " फेसबुक' वर म्हटले आहे . 75 वर्षे पूर्ण केलेल्या नेत्यांनी सक्रिय राजकारणातून संन्यास घ्यावा , असे भाजपचे धोरण आहे . पदमुक्त करण्याची विनंती दोन महिन्यांपूर्वीच पक्षनेतृत्वाला केली असल्याचे आनंदीबेन यांनी सांगितले . राज्याच्या मुख्यमंत्रिपदासाठी निवड केल्याबद्दल आनंदीबेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. त्यांच्या तुलनेत प्रभावीपणे काम करता आले नसले तरी त्यासाठी पूर्ण प्रयत्न केल्याचेही त्यांनी नमूद केले आहे .

current Affairs July 2016 Part - 5


🔹काही संयुक्त कवायती / युद्धाभ्यास

इंद्र २०१५:-
स्थळ :- बिकानेर (राजस्थान)
भारत आणी रशिया यांच्यातील इंद्र या सामरिक कसरतीची सातवी आवृती. या कसरती ऐकून १४ दिवस सुरु होत्या.

मलबार :-
२०१५ भारताच्या पूर्व किनारपट्टीवर अमेरिका, जपान आणी भारत यांच्या नौदलामध्ये या सयुक्त कसरतीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्येयुद्धनौका, विनाशिका आणी विमानवाहू नौंकाचा सहभाग होता.

 मित्र शक्ती:-
स्थळ :- पुणे
भारत आणी श्रीलंका यांच्या लष्करामध्ये २९ सप्टेंबर ते ११ आक्टोंबर या कालावधीत सयुक्त कसरत पार पडली.
___________________________________
Join our telegram channel telegram.me/empsckatta

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹प्रसिद्ध सर्च इंजिन असलेल्या YAHOO ची होणार विक्री!

जगातील मोठ्या सर्च इंजिन्सपैकी एक असलेल्या ‘याहू’ ची विक्री होणार आहे. याहूचा व्यवसाय ३३ हजार ५०० कोटी रूपयांना व्हेरिझॉन कम्युनिकेशन्स विकत घेणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ‘याहू’ ला गुगल आणि फेसबुककडून कडवी झुंज मिळत आहे. या कंपन्यांमुळे ‘याहू’च्या नफ्यात देखील गेल्या अनेक वर्षांपासून घट होत आहे.

Current Affairs July 2016 Part - 4

★|| eMPSCkatta ||★
#eMPSCkatta_Current_Affairs

🔹नमामि चंद्रभागा प्राधिकरणाची स्थापना करणार

विधिमंडळात 2016 - 17 चा अर्थसंकल्प सादर करताना चंद्रभागेच्या पावित्र्याचे व निर्मळतेचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेऊन " नमामि चंद्रभागा' मोहीम राबवून 2022 पर्यंत चंद्रभागा नदी निर्मळ , पवित्र व प्रदूषणमुक्त करून तिचे संवर्धन करण्याचा संकल्प राज्य सरकारने केला होता . यासाठी प्राधिकरण स्थापन करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली . यासाठी 20 कोटी रुपयांचा निधी सरकारने मंजूर केला आहे . पंढरपूर शहरातून वाहणाऱ्या चंद्रभागा नदीचे पावित्र्य राखणे व ही नदी प्रदूषित होऊ नये म्हणून उपाययोजना करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारच्या "नमामि गंगे ' या अभियानाच्या धर्तीवर "नमामि चंद्रभागा ' ही मोहीम राबविण्याचा संकल्प सरकारने जाहीर केला होता . "नमामि चंद्रभागा ' ही मोहीम जिल्हास्तरावर राबविण्यात येणार असून , चंद्रभागा नदी व त्यासाठी वसलेल्या पंढरपूर या तीर्थक्षेत्राचे महत्त्व लक्षात घेऊन ही मोहीम राबविण्यात येणार आहे .

चंद्रभागा नदीच्या पात्रातील पाण्याची पातळी कायम राहावी , यासाठी बंधारे बांधणे , नदीचा किमान पर्यावरणीय प्रवाह अबाधित ठेवणे , पंढरपूर यात्रेच्या दरम्यान आळंदी , देहू यांसारख्या वारकऱ्यांची संख्या अधिक असलेल्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात सार्वजनिक स्नानगृहे व शौचालये उपलब्ध करून देणे , पंढरपूर वारीच्या मार्गिकेवरील मुक्कामांच्या ठिकाणावर पुरेशा प्रमाणात स्वच्छतागृहे , स्नानगृहे , निवारा , पिण्याच्या पाण्याची सुविधा कायमस्वरूपी तयार करणे , पंढरपूर शहराची लोकसंख्या ; तसेच येणाऱ्या यात्रेकरूंची लोकसंख्या विचारात घेऊन पुरेशा प्रमाणात फिरती जैविक पद्धतीची शौचालये उपलब्ध करून देणे , चंद्रभागा नदीच्या वरील भागातील भीमा नदीच्या उपनद्यांवरील नागरी वस्त्यांमधून निघणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रियेसाठी यंत्रणा उभारणे व नागरी घनकचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावणे आदी कामांचा या मोहिमेत प्रामुख्याने समावेश आहे .

या मोहिमेसंदर्भात चंद्रभागा नदीसंवर्धन व संरक्षण प्राधिकरण स्थापन करण्यात येत असून , त्यास " नमामि चंद्रभागे प्राधिकरण ' असे संबोधण्यात येणार आहे . मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापित करण्यात येणाऱ्या या प्राधिकरणाचे सहअध्यक्ष अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहणार आहे .
____________________________
join us @ChaluGhadamodi

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹देशात वाय-फाय सर्व ठिकाणी!
.
देशभर अधिकाधिक सार्वजनिक स्थळी वाय-फाय सुविधा विपुल प्रमाणात उपलब्ध व्हावी, यासाठी टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथॉरिटी (ट्राय)ने पुढाकार घेतला आहे. सार्वजनिक व्हायफायचा अधिकाधिक विस्तार करण्याच्या या संकल्पनेला पंतप्रधान कार्यालयाचाही पूर्ण पाठिंबा आहे. नव्या प्रयोगात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कंपन्यांकडून १0 आॅगस्ट पर्यंत ट्रायने प्रस्ताव मागितले आहेत. विचाराअंती सार्वजनिक व्हाय फाय योजनेविषयी नवे धोरण ठरेल, असे संचार मंत्रालयाच्या सूत्रांकडून समजते.

Current Affairs July 2016 Part - 3

★|| eMPSCkatta ||★
#eMPSCkatta_Current_Affairs

🔹' एमआयएम' सह 191 पक्षांची मान्यता रद्द

नोटीस बजावूनही आयकर विवरण व लेखा परीक्षण लेखा परीक्षणाची प्रत सादर न करणाऱ्या 191 अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांची नोंदणी राज्य निवडणूक आयोगाने रद्द केली असून , ओवैसी बंधूंच्या ' एमआयएम' पक्षाचा समावेश आहे , अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज ( बुधवार ) दिली .
राज्य निवडणूक आयोगाकडे एकूण 359 राजकीय पक्षांची नोंदणी आहे . यामध्ये 17 मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचा समावेश असून , 342 अमान्यताप्राप्त राजकीय पक्ष आहेत. या पक्षांना नोंदणी आदेशानुसार आयकर विवरणप्राप्त भरल्याची व लेखा परीक्षणाची प्रत दरवर्षी आयोगाकडे सादर करणे बंधनकारक असते . परंतु , ही कागदपत्रे सादर न केल्यामुळे 326 राजकीय पक्षांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या . कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी त्यांना मुदतही देण्यात आली होती . परंतु , 191 पक्षांनी कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे पक्षांची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे , अशी माहिती सहारिया यांनी दिली .
Source: sakaal news paper portal

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹आता गुगल हॅंगआउटवरही व्हिडिओ कॉलिंगची सुविधा

 मेसेजिंग ऍपमधील सध्याच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी गुगलने हॅंगआउटमध्ये व्हिडिओ कॉलिंगची सुविधा सुरू केली असून , व्ही .11 .0 या अपडेटद्वारे तुम्हाला या सेवेचा लाभ घेता येणार आहे . तब्बल दोन वर्षांपूर्वी ऍपल मोबाईलधारकांसाठी आलेली ही सुविधा आता अँड्राइडधारकांनाही उपलब्ध करून देण्यात आली आहे .

Post views: counter

How to prepare state service mains exam in 45 days ?




नमस्कार मित्रहो,
मी यापूर्वी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2016 साठी साधारण 120 दिवसांचे नियोजन आखून दिले होते , त्यानंतर बऱ्याच मित्रांनी त्याचा फायदा झाल्याचे सांगितले.

परवाच आपल्या राज्यसेवा पूर्व 2016 चा निकाल लागला , आणि आता शेवटच्या 40 दिवसांसाठी पूर्व परिक्षेप्रमाणे वेळापत्रक आखून देण्याची मागणी करत आहेत , त्या मित्रांसाठी खास राज्यसेवा मुख्य 2016 साठी हा लेख.