Post views: counter

Current Affairs October 2016 Part-4

★|| 🇪🇲 🇵 🇸 🇨 🇰🇦 🇹 🇹🇦  ||★
.
#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹कुपोषण निर्मूलनासाठी शासनाची विशेष मोहीम

मुंबई - कुपोषण निर्मूलनासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघांच्या आदिवासी भागांमध्ये काम करणाऱ्या वनवासी कल्याण आश्रम , जनकल्याण समिती, आरोग्य भारती या संघटनांना राज्य सरकार सहकार्य करणार आहे . इतर कॉर्पोरेट संस्थांबरोबर संघाच्या या संस्था कुपोषण निर्मूलनासाठी राज्य सरकारला मार्गदर्शन आणि सहाय्य करणार आहेत.

राज्यातील पालघर , तसेच इतर आदिवासी जिल्ह्यांतील दुर्गम भागांत भेडसावणाऱ्या कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत विशेष मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले . कुपोषणाच्या समस्येच्या मूळ कारणांचा शोध प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन सर्वेक्षणाद्वारे घेण्यासाठी तज्ज्ञ समिती नेमण्यात आली असून , येत्या 20 ऑक्टोबरपासून पालघरपासून सुरवात केली जाणार आहे . या मोहिमेत " युनिसेफ ' या संस्थेसोबतच आरोग्य विज्ञान विद्यापीठही सहभागी होणार आहेत.

या समितीमध्ये वैद्यकीय शिक्षण विभागाचे स्त्रीरोगतज्ज्ञ व बालरोगतज्ज्ञांसोबत खासगी क्षेत्रातील नामांकीत वैद्यकीय तज्ज्ञ , सेवाभावी संस्थांचे प्रमुख , समाजसेवक यांचा समावेश आहे . तपासणी समूहातून करण्यात येणार आहे . त्यात कुमारिका , गरोदर महिला व लहान मुले अशांची स्वतंत्र तपासणी होईल व त्यानुसार उपचार करण्यात येतील .
समितीमध्ये डॉ . मृदुला फडके , डॉ . मोहन खामगावकर , डॉ . तात्याराव लहाने , डॉ . संजय ओक , डॉ . मुकुंद कसबेकर यांचा समावेश असणार आहे .

यासाठी टाटा ट्रस्ट , हिंदुजा ट्रस्ट , एम्पथी फाउंडेशन व पॅथॉलॉजी असोसिएशन औषधपुरवठ्याबाबत सहकार्य करणार आहेत. टाटा ट्रस्टकडून पालघर जिल्ह्यातील 70 हजार बालकांसाठी आहार दिला जाणार असल्याचेही महाजन यांनी सांगितले . समितीने पाहणी केल्यानंतर नेमक्या कशा प्रकारच्या आहाराची गरज आहे , याचा अभ्यास केल्यानंतर टाटा ट्रस्टकडून बालकांना आहार दिला जाणार आहे .

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹संचालक अपात्रता अधिनियम लागू

न्यायालयाच्या निर्णयानंतर अंमलबजावणी ; सहकारी बॅंकांतील भ्रष्ट संचालकांवरील बंदीचे प्रकरण

मुंबई - अनियमित कामकाजामुळे सहकारी बॅंका आर्थिक दिवाळखोरीत येण्यास कारणीभूत ठरलेल्या संचालकांना दहा वर्षांसाठी अपात्र ठरविणारा सुधारीत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम राज्यात नुकताच लागू झाला आहे .
हा अधिनियम पूर्वलक्षीप्रभावाने मागील दहा वर्षांपासून राज्यात लागू होणार आहे . त्यामुळे राज्यात यासंदर्भात जारी करण्यात आलेला वटहुकूम मागे घेण्याचा निर्णय मंगळवारी राज्यमंत्री परिषदेने घेतला .
Post views: counter

Current Affairs October 2016 Part- 3


#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹" ईबीसी ' सवलत सहा लाखांपर्यंत - मुख्यमंत्री

मुंबई - आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीची ( ईबीसी ) उत्पन्नमर्यादा सहा लाख रुपयांपर्यंत वाढवून उच्च आणि व्यावसायिक शिक्षणासाठी राजर्षी शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना लागू करण्याचा निर्णय गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाने घेतल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत दिली . या योजनेबरोबरच " भाऊसाहेब डॉ . पंजाबराव देशमुख योजना आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना सुरू केल्याचेही त्यांनी सांगितले .

फडणवीस म्हणाले , की राज्यातील शैक्षणिक क्षेत्रातील ऐतिहासिक निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला . या महत्त्वपूर्ण योजनांच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रातील गुंतवणूक वाढवून उत्तम मनुष्यबळ निर्माण होण्यासाठी राज्य शासनाने प्रयत्न केले आहेत.

राजर्षी शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेच्या माध्यमातून उच्च व व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या सर्व घटकांतील विद्यार्थ्यांचे शुल्क सरकार भरणार आहे . या योजनेसाठी वार्षिक उत्पन्न सहा लाख रुपयांपर्यंत असणे आवश्यक असून , विद्यार्थ्याला प्रवेशासाठी किमान 60 टक्के गुण मिळणे आवश्यक आहे . अडीच लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना विनाअट लाभ मिळणार आहे . या दोन अटींव्यतिरिक्त कुठलीही अट योजनेसाठी लागू नाही. या योजनेमुळे सर्व घटकांतील विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे . मध्यंतरीच्या काळात राज्यात निघालेल्या मराठा समाजाच्या मोर्चांमध्ये अनेक मागण्यांपैकी ही एक मागणी होती . शासनाने सुरू केलेल्या या योजनेचा फायदा मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही होणार आहे .

ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतकरी , तसेच रोजगार हमी योजना आणि अन्य योजनांवर नोंदणीकृत मजुरांच्या पाल्यांना शहरांमध्ये व्यावसायिक शिक्षण घेणे शक्य व्हावे , यासाठी भाऊसाहेब डॉ . पंजाबराव देशमुख योजनेच्या माध्यमातून अशा मुलांची मोठ्या शहरांमध्ये निवासाची व्यवस्था केली जाणार आहे . मोठ्या शहरांमध्ये निवास व्यवस्थेसाठी प्रतिवर्ष 30 हजार रुपये , तर जिल्ह्याच्या ठिकाणी 20 हजार रुपये या योजनेच्या माध्यमातून दिले जाणार आहेत. शुल्क प्रतिपूर्तीची योजना खासगी महाविद्यालयांसोबतच शासकीय महाविद्यालयांना लागू असणार आहे . या योजनेमुळे व्यावसायिक अभ्यासक्रम घेणाऱ्या तीन लाख 35 हजार विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे . वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या आणि ज्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच ते सहा लाख रुपयांदरम्यान आहे , अशा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कर्जावरील व्याज शासन आदा करणार आहे , अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिली .

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹कुपोषणमुक्तीसाठी कृती आराखडा

मुंबई - कुपोषणग्रस्त भागातील दारिद्रयनिर्मूलन हाच कुपोषणावर प्रभावी उपाय असल्याने कुपोषणमुक्तीसाठी सर्वांगीण कृती आराखडा तयार करण्याचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी झालेल्या बैठकीत दिला . राज्याचे पोषण आहार धोरण येत्या 15 दिवसांत तयार करावे , असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले .

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी राज्यातील कुपोषणनिर्मूलनाबाबत आज आढावा बैठक घेण्यात आली . त्या वेळी फडणवीस बोलत होते . या बैठकीला आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा , अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट , आरोग्यमंत्री डॉ . दीपक सावंत , महिला व बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर आदी उपस्थित होते . या वेळी मुख्यमंत्र्यांनी पालघर, ठाणे , नंदुरबार , नाशिक, धुळे, अमरावती , यवतमाळ , गडचिरोली , नगर येथील जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधून परिस्थिती जाणून घेतली .

Current Affairs October 2016 Part - 2

★|| 🇪🇲 🇵 🇸 🇨 🇰🇦 🇹 🇹🇦  ||★

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर पालघरमध्ये बाल उपचार केंद्र

मुंबई - मोखाडा, जव्हार तालुक्यांतील कुपोषणग्रस्त बालकांवर उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर आठ नवीन बाल उपचार केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ . दीपक सावंत यांनी आज येथे दिली .
कुपोषण निर्मूलन आणि कुपोषित बालकांच्या उपचाराबाबत आरोग्य विभागामार्फत करण्यात आलेल्या उपाययोजनांबद्दल माहिती देताना आरोग्यमंत्री म्हणाले , की पालघर जिल्ह्यात सध्या मोखाडा, विक्रमगड , वाडा, डहाणू येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये बाल उपचार केंद्रे कार्यान्वित आहेत. साधारण 20 खाटांचे हे उपचार केंद्र असून , उपजिल्हा जव्हार येथे पोषण व पुनर्वसन केंद्र सुरू आहे . त्या माध्यमातून कुपोषित बालकांवर उपचार सुरू आहेत.

जव्हार , मोखाडा तालुक्यांत आठ नवीन बाल उपचार केंद्रे या भागात सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला . जव्हार तालुक्यातील जामसर , साकूर , नांदगाव, साखरशेत येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये तर मोखाडा तालुक्यातील खोडाळा , आसे, मोऱ्हांडी, वशाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांत नवीन बाल उपचार केंद्रे कार्यान्वित करण्यात येतील .
याबरोबरच या भागातील कुपोषित बालकांच्या तपासणीसाठी बालरोग तज्ज्ञांमार्फत आठवड्यातून दोन वेळेस शिबिरे आयोजित केली जात आहेत. मनोर , पालघर , विक्रमगड , वाडा, तलासरी , मोखाडा , जव्हार येथे अशा प्रकारची शिबिरे आयोजित केली जात आहेत. बाल उपचार केंद्र, पोषण व पुनर्वसन उपचार केंद्र, व्हीसीडीसी आणि आरोग्य शिबिरांमध्ये तपासणी झालेल्या बालकांच्या घरी एएनएम, आशा , आरोग्य सेविका यांच्या माध्यमातून दररोज फेरतपासणी करण्याचे आदेश आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत. यात प्रामुख्याने आजाराची लक्षणे, वजन , उंची यांच्या साप्ताहिक नोंदी ठेवल्या जातील . या बालकांमध्ये होणाऱ्या साप्ताहिक बदलांच्या नोंदीदेखील ठेवल्या जाणार आहेत आणि त्यानुसार उपचार करण्याच्या सूचना आरोग्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹अपारंपरिक ऊर्जानिर्मिती वाढविण्याचे उद्दिष्ट

मुंबई - देशातील विजेच्या एकूण गरजेमध्ये अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा वाटा 2022 पर्यंत वाढवण्याचे केंद्र सरकारचे नियोजन आहे ; तर 2030 पर्यंत एकूण वीजपुरवठ्यात सौरऊर्जेचा 40 टक्के वाटा असेल, अशी माहिती केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांनी बडोदा येथील " स्वीच 2016 ' परिषदेत दिली .
Post views: counter

Current Affairs October 2016 Part 1

★|| 🇪🇲 🇵 🇸 🇨 🇰🇦 🇹 🇹🇦  ||★

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹मद्याच्या बाटलीवर सरकारी ' होलोग्राम'

बनावटीला आळा घालण्यासाठी मोबाईल ऍप , टोल फ्री क्रमांकाचे उद्घाटन
मुंबई - शौकिनांकडून रिचवल्या जाणाऱ्या देशी - विदेशी लाखो बाटल्यांमधील मद्य बनावट असण्याची शक्यता नाकारता येत नाही . हे टाळून मद्याची अस्सल गुणवत्तेचे प्रमाणपत्र म्हणून प्रत्येक बाटलीवर सरकारी " होलोग्राम' चिकटविण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे . हे " होलोग्राम' सरकारी प्रेसमध्ये छापण्याचा विचार सरकार करीत आहे . या निर्णयामुळे वर्षाकाठी हजार ते बाराशे कोटींचा वाढीव महसूल विनासायास सरकारी तिजोरीत पडेल, असा दावा मंत्रालयातील सूत्रांनी व्यक्त केला आहे .

मद्याच्या बाटल्यांवर "होलोग्राम ' सक्तीचा करण्याचा निर्णय माजी उत्पादन शुल्क मंत्री एकनाथ खडसे यांच्या अल्पशा कारकिर्दीतच घेण्यात आला होता . तथापि , हा " होलोग्राम' खासगी कंपनीमार्फत निविदा काढून छापून घेण्याची योजना होती . दरम्यान , खडसे मंत्रिपदावरून पायउतार झाले आणि ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे या खात्याचा पदभार आला . " होलोग्राम' बाबतची काढली जाणारी निविदा रद्द करण्यात आली आणि नव्याने जागतिक निविदा काढण्याची सरकारने घोषणा केली . मात्र त्यामध्येही काही अडचणी आणि समस्या उद्भवू शकतात , असे सरकारी अधिकाऱ्यांच्या लक्षात आले आहे . खासगी कंपनीच्या मार्फत " होलोग्राम' छापून घेतले , तर त्यातही मद्य उत्पादक कंपन्या, वितरक यांच्यामध्ये साटेलोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही . सरकारचे नियंत्रण असले, तरीही त्यामुळे हा उपाय ही तितकासा परिणामकारक ठरत नाही .

अशाच प्रकारे "होलोग्राम' छपाई खासगी कंपनीला देऊन केरळ उत्पादन शुल्क विभागाने प्रयोग केला होता . मात्र त्यामध्ये मोठा गैरव्यवहार झाला होता . परदेशातून आयात केलेले मद्य , राज्यात व राज्याबाहेरून येणारे मद्य यातून सरकारला करापोटी कोट्यवधी रुपये मिळतात . वर्षाला हजार कोटींच्यावर महसूल " होलोग्राम' मुळे वाढणार आहे , असेही सूत्रांचे म्हणणे आहे . त्यामुळे होलोग्राम छपाई सरकारी प्रेसमध्येच करण्याचा सरकारचा विचार आहे . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लवकरच याबाबतीत सादरीकरण केले जाणार आहे , असे सूत्रांनी सांगितले .

" होलोग्राम ' म्हणजे काय ?
" होलोग्राम' हे असे तंत्रज्ञान आहे , की त्यामध्ये वस्तू , खाद्य - पेय , औषध अथवा इतर कोणतेही उत्पादन याची अस्सल गुणवत्ता राखण्यासाठी चिकटवलेला थ्रीडी ( त्रिमिती ) कागद चिकटवला जातो . विदेशात याबाबत जागरूकता आहे .

ऍप व टोल फ्री क्रमांकाचे उद्घाटन

राज्यातील बनावट विशेषतः हातभट्टीची दारू तयार करून त्यांची विक्री होते . तसेच मद्यनिर्मिती , वितरण, भेसळ आदी अनेक प्रकार होत आहेत. यासंदर्भात तक्रारी नोंदविण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने मोबाईल ऍप तयार केले आहे . 8422001133 या किंवा 18008333333 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करण्याचे आवाहन केले आहे . त्याचे उद्घाटन रविवारी ( ता. 2) ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते मुंबईत होणार आहे . उत्पादन शुल्क आयुक्त व्ही . राधा आणि दक्षता संचालक अंमलबजावणी सुनील चव्हाण यांची ही संकल्पना आहे .

भरारी पथकाची कामगिरी

गुन्हे नोंद - 16353 ,
अटक आरोपी - 7247
मुद्देमालाची किंमत - 25 कोटी 23 लाख 90 हजार

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹भारत - चीनच्या सहकार्यावरच आशियाचे भवितव्य अवलंबून - नरेंद्र मोदी

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चीनच्या नागरिकांना 67 व्या राष्ट्रीय दिनानिमित्त आज शुभेच्छा देत भारत आणि चीन यांच्या परस्पर सहकार्यांच्या जोरावरच आशियात शांतता आणि स्थिर भविष्य प्रस्थापित होईल .

चीनच्या लोकप्रिय मायक्रोब्लॉग वाईबो मोदी यांनी शुभेच्छा देत म्हटले, की भारत - चीन संबंध अनेक काळापासून आहेत . त्यात अध्यात्मक , शिक्षण , कला , व्यापार आणि परस्परांच्या सभ्यतेचा आदर करणे

Current Affairs Sept 2016 Part 5


#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹आश्विनच्या 37 कसोटींमध्येच 200 विकेट्स

कानपूर : अफलातून सूर गवसलेला ऑफस्पिनर रविचंद्रन आश्विनने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी आज ( रविवार ) वकार युनूस आणि डेनिस लिली या महान गोलंदाजांचा विक्रम मोडला . सर्वांत कमी कसोटी सामन्यांमध्ये 200 बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत आश्विनने वकार आणि लिली यांना मागे टाकले. या यादीत आश्विन आता दुसऱ्या क्रमांकावर आहे .

न्यूझीलंडविरुद्धचा सामना सुरू होण्यापूर्वी आश्विनचे कसोटीमध्ये 193 बळी होते . या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आश्विनला एकही विकेट मिळाली नाही . पण तिसऱ्या दिवशी आश्विनने चार फलंदाजांना बाद केले. त्यानंतर आज न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावातही आश्विनने आतापर्यंत तीन बळी मिळविले आहेत. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनला बाद करत आश्विनने कसोटीतील 200 बळींचा टप्पा गाठला . ही आश्विनची 37 वी कसोटी आहे . वकार युनूस आणि डेनिस लिली या दोघांनीही 38 कसोटींमध्ये 200 बळी मिळविण्याची कामगिरी केली होती . सर्वांत कमी कसोटींमध्ये 200 बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा माजी लेगस्पिनर क्लॅरी ग्रिमेट अव्वल स्थानी आहेत . त्यांनी 36 कसोटींमध्ये ही कामगिरी केली होती .

आर . आश्विनची कामगिरी :
कसोटी : 37 सामन्यांत 200* बळी
वन - डे : 102 सामन्यांत 142 बळी
ट्वेंटी - 20 : 45 सामन्यांत 52 बळी

#eMPSCkatta_Telegram_Updates

🔹व्याघ्र संरक्षणासाठी भारताचे महत्त्वपूर्ण पाऊल

नेक कॉलर , ड्रोननिर्मिती आता भारतात होणार

नवी दिल्ली - छुपी शिकार, अवयवांची तस्करी यांमुळे लुप्त होत चाललेल्या वाघांच्या संरक्षणासाठी भारत सरकारकडून ठोस पावले उचलली जात आहेत. त्यांच्या

Current Affairs Sept 2016 Part- 4


#eMPSCkatta_Current_Affairs

🔹महाराष्ट्रातील वृक्षारोपणाची लिम्का बुकमध्ये नोंद

मुंबई- महाराष्ट्रामध्ये राबविण्यात आलेल्या वृक्षारोपण उपक्रमाअंतर्गत 1 जुलै रोजी 2 कोटी 80 लाख रोपे लावण्याच्या विक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे.


राष्ट्रीय विक्रम म्हणून लिम्का बुकमध्ये हा विक्रम नोंदविण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्याचे वन खाते आणि सामाजिक वनीकरण विभागाने संयुक्तपणे हा उपक्रम राबविला. यामध्ये 1 जुलै रोजी केवळ बारा तासांमध्ये 2 कोटी 81 लाख 38 हजार 634 रोपे लावण्यात आली. त्यामध्ये राज्यातील जनतेने उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. सर्वसामान्य नागरिकांसह, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था आणि इतर सरकारी, खासगी संस्था, संघटनांनी वृक्षारोपण केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विक्रमाची नोंद झाल्याचे ट्विटरवरून आज जाहीर केले आहे. पर्यावरण रक्षणासाठी हातभार लावल्याबद्दल वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, वन सचिव, शासकीय अधिकारी व राज्यातील नागरिकांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले.


उल्लेखनीय बाबी -

सर्वाधिक म्हणजे 153 वृक्षांच्या प्रजाती लावल्या12 तासांत केले

 वृक्षारोपण एकावेळी 65,674 ठिकाणी

 वृक्षारोपण6 लाख 14 हजार 482 लोकांचा सहभाग

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹'महानदी'वरून ओडिशा-छत्तीसगड आमनेसामने

भुवनेश्‍वर - कावेरी नदीच्या पाणीवाटपावरून तमिळनाडू आणि कर्नाटकमधील संघर्ष शिगेला पोचला असताना, आता महानदीच्या पाण्यावरून छत्तीसगड आणि ओडिशा ही दोन राज्ये आमनेसामने आली आहेत.


या वादावर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय जलस्रोतमंत्री उमा भारती यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झालेल्या