महाराष्ट्रातील अक्षरश: लाखो विद्यार्थी आयोगाच्या परीक्षांना बसतात. त्यातील काहींना यश मिळते, तर काहींना फक्त अनुभव. असा हा अनेकांची स्वप्ने मुठीत घेऊन फिरणारा आयोग आहे तरी कसा ते बघायचा प्रयत्न आपण करू.
नागरी सेवेतील नोकरभरतीसाठी समान संधी मिळण्याबाबतचा मुलभूत अधिकार भारतीय राज्यघटनेने अनुच्छेद १६ (१)अन्वये प्रत्येक नागरिकाला बहाल केला आहे. भारताचे नागरिक हे बहुभाषिक व विविध धर्मांचे आहेत. त्यामध्ये काही अल्पसंख्यांक तर काही मागासवर्गीय यांचादेखील समावेश आहे. अशा परिस्थितीत नागरी सेवेतील नोकर भरतीकरिता समानतेची संधी प्रत्येक नागरिकाला मिळावी आणि ही नोकरभरती राजकीय दबाव, वैयक्तिक हितसंबंध यापासून अलिप्त रहावी, तसेच नागरी सेवेत सुयोग्य उमेदवारांची गुणवत्तेवर निःपक्षपातीपणे निवड व्हावी, या उद्देशाने अनुच्छेद ३१५अन्वये राज्य लोकसेवा आयोगाची निर्मिती भारतीय घटनेने केली आहे.
कलम ३२०नुसार एमपीएससीकडे पुढील कार्य सोपवण्यात आले आहेत. महाराष्ट्र सरकार व इतर संलग्न संस्थांसाठी नेमणुका करण्यासाठी परीक्षा घेणे, राज्य सरकारने