पृथ्वीची कंपनशक्ती
काही आठवडय़ांपूर्वी मणिपूर येथे मोठा भूकंप झाला. या धरणीकंपात जरी फार मोठी वित्तहानी झाली असली तरी फारशी जीवितहानी झाली नाही. भूकंप प्रभाव क्षेत्रात फार मोठी लोकसंख्या अस्तित्वात नव्हती ही एक जमेची बाजू होती. भूकंपांची संख्या सद्या वाढताना दिसत आहे व त्याच्या धक्क्याने जीवित व वित्तहानीही वाढताना दिसत आहे. धरणीकंपनाने निसर्ग आपली शक्ती किती तीव्र आहे हे सप्रमाण दाखवून देत आहे.
EARTHORBITमानवाची उत्पत्ती होऊन लाखो र्वष झाली असली तरी निसर्गाच्या ज्या काही गतिकीय प्रक्रिया सुरू आहेत त्याचा उलगडा अजूनही मानवाला झालेला नाही. या क्रिया-प्रक्रियांचा आलेख आपण काही शतकांपासून जमा करत आहोत; पण आतापर्यंत साठवलेली माहिती फार अपुरी आहे. या माहितीच्या आधारे या नैसर्गिक घडामोडींचा आलेख अचूकपणे मांडणे फार कठीण काम आहे. पण जी माहिती आपण आतापर्यंत जमा केलेली आहे. ती एका प्रकारे जिगसॉ पझलसारखी आहे. काही रकाने योग्य प्रकारे भरले गेले आहेत, तर इतर खाली रकाने अजूनही भरावयाचे आहेत.