#eMPSCkatta_Current_Affairs
🔹‘ ओबीसीं ’मध्ये १५ जातींचा समावेश
नवी दिल्ली - केंद्रीय ओबीसी यादीमध्ये महाराष्ट्रासह आठ राज्यांमधील १५ नव्या जातींचा समावेश करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने आज घेतला . त्याचबरोबर मुंबई वाहतूक प्रकल्पाच्या ( एमयूटीपी ) तिसऱ्या टप्प्यालाही मंजुरी देण्यात आली . याशिवाय पाकव्याप्त काश्मीरमधील निर्वासितांसाठी केंद्र सरकारने आज दोन हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले . पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत हे निर्णय झाले .
राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाने ( एनसीबीसी ) केलेल्या शिफारशीनुसार केंद्रीय ओबीसी यादीमध्ये समावेशांसाठी २४७९ जातींबद्दलची अधिसूचना केंद्र सरकारने सप्टेंबरमध्ये केली होती . यामध्ये नामसाधर्म्य असलेल्या जाती , उपजातीदेखील आहेत. परंतु , यादरम्यान महाराष्ट्रासोबतच आसाम, बिहार , हिमाचल प्रदेश , झारखंड , मध्य प्रदेश , जम्मू आणि काश्मीर तसेच उत्तराखंड या राज्यांकडून जवळपास २८ बदल करण्याची मागणी झाली . या यादीमध्ये १५ नव्या जाती , नऊ नामसाधर्म्य असलेल्या जाती , उपजाती आणि चार दुरुस्त्यांचा समावेश आहे . केंद्राच्या सुधारित अधिसूचनेनंतर या जातींना शिष्यवृत्ती त्याचप्रमाणे सरकारी नोकऱ्या , शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षणाचे लाभ मिळतील.
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹‘एमयूटीपी ’ साठी दहा हजार कोटी
महाराष्ट्रातील मुंबईसह ठाणे , पालघर, आणि रायगड या चार जिल्ह्यांना लाभ पोचविणाऱ्या मुंबई शहरी वाहतूक प्रकल्पाच्या ( एमयूटीपी ) तिसऱ्या टप्प्याला केंद्रीय मंडळाने मान्यता दिली आहे . मुंबईतील वाहतुकीसाठी महत्त्वाचा असलेला ‘एमयूटीपी टप्पा ३ ’ येत्या पाच वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित असून त्यासाठी अंदाजे १० ,९४७ कोटी रुपये खर्च येऊ शकतो. याअंतर्गत पश्चिम रेल्वेच्या विरार -डहाणू रोड यादरम्यान अतिरिक्त दुहेरी मार्ग तयार करण्याच्या प्रस्तावाला होकार मिळाला आहे . यामुळे चर्चगेट ते डहाणू रोड उपनगरीय रेल्वे वाहतूक सेवेचा विस्तार होणार आहे . पश्चिम रेल्वेचा सर्वाधिक वर्दळीचा विरार ते डहाणू दरम्यानचा मार्ग मुंबई -अहमदाबाद व दिल्ली या प्रमुख रेल्वे मार्गाचा हिस्सा आहे .
याशिवाय , पनवेल- कर्जत या मार्गाच्या दुहेरीकरणाचीही यात तरतूद आहे . यामुळे पनवेल मार्गे कर्जत ते छत्रपती शिवाजी टर्मिनस ( सीएसटीएम ) हा मार्ग सुरू होणार आहे . कल्याण मार्गे कर्जत ते छत्रपती शिवाजी टर्मिनस या विद्यमान मार्गापेक्षा हे अंतर २३ किलोमीटरने कमी होणार असून , धीम्या लोकलचा प्रवास ३५ ते ४० मिनिटांनी कमी होईल . कल्याणहून वाशी किंवा पनवेल ला जाणाऱ्या प्रवाशांना ठाण्याला उतरून हार्बर लाइनने उलटा प्रवास करावा लागतो . परिणामी ठाणे स्थानकावर प्रवाशांची गर्दी असते . ऐरोली -कळवा कॉरिडॉरमुळे प्रवाशांना ठाण्याला उतरण्याची गरज भासणार नाही .
#eMPSCkatta_Current_Affairs
🔹ज्येष्ठ समाजसेविका सुलभा ब्रह्मे यांचं निधन
जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, थोर विदुषी व अर्थतज्ज्ञ प्रा. सुलभा ब्रह्मे यांचं आज पुण्यातील राहत्या घरी निधन झालं. त्या ९० वर्षांच्या होत्या. पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांच्या त्या भगिनी होत.